<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-21257775</id><updated>2012-01-24T05:04:22.933-08:00</updated><category term='अनुभव'/><category term='कथा'/><category term='स्फुट'/><category term='लेख'/><category term='विनोद'/><title type='text'>मनात आलं ... लिहिलं</title><subtitle type='html'>मनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>77</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-7307220370317430458</id><published>2012-01-24T05:04:00.000-08:00</published><updated>2012-01-24T05:04:22.942-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>हिची, तिची कहाणी</title><content type='html'>'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्‍या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची समजूत घालत बसणं. वेळ असतो कुठे तेवढा?&lt;br /&gt;'ही'चा नवरा मुलांना उठवून तयार करत असतो तेव्हा 'ही' स्वतःची तयारी करता करता मुलांचे डबे भरत असते. मुलांना शाळेत सोडलं की 'ही'सुद्धा ऑफिसच्या दिशेने सुसाट निघते. गडबडीत 'ही'चा ब्रेकफास्ट कधीच होत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;रस्त्यात ट्रॅफिक जॅम नेहमीचाच. बुडाखाली गाडी असली म्हणून वेळेत पोहोचणं शक्य आहे असे थोडेच असते? पण मग गाडीत कोंडलेली हीच काय ती वेळ 'हिची' स्वतःची असते. अचानक आज तिला १५-२० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवतो. हिची नवी पहिली नोकरी आणि वरळीला हिच्या ऑफिसच्या फूटपाथवर बसणारी "ती". पथारी टाकून काहीबाही प्लास्टीकचे कंगवे, फण्या, आरसे विकायला बसलेली. बाजूला तिची ३-४ वर्षांची पोरगी खेळत असायची आणि मांडीत ६-८ महिन्यांचं दुसरं पोर. मध्येच कधीतरी गिर्‍हाईक आलं तर ते बाळ, त्या मुलीच्या मांडीत जाई. तिची मांडी ती केवढी! ते बाळ अर्धवट जमिनीला टेकलेलं. धुळीने माखलेल्या मुठी चोखत असायचं. ते विरलेले कपडे, पिंजारलेले केस, वाहणारी नाकं; पोरांचा अगदी अवतार असे.पोरांच्या नाकातून वाहणारा शेंबूड पुसायलाही आईला उसंत नसायची. उन्हा-तान्हात सुकायला घातल्यागत दिवसभर ती पोरं फुटपाथवर बसलेली असत. राग यायचा तेव्हा. 'सांभाळायला जमत नसेल तर कशाला जन्माला घालतात हे लोक ही पोरं?' असं वाटून जायचं. कधीतरी, रडणार्‍या मुलीला वसावसा ओरडताना आणि फटके देताना पाहिलं की जाऊन 'तिलाच' समज द्यावी असं वाटायचं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण मग कधीतरी समोरच्या चहावाल्याकडनं घेतलेला चहा फुंकून पोरीला देणं, दुपारच्या वेळी भाकरी पावाचा तुकडा भरवणं आणि भर रस्त्यावर पदराच्या आडोशाखाली बाळाला घेणं... तिच्यातल्या "आई"ची जाणीव करून द्यायचं. कदाचित इतरवेळेस, ज्यांच्यासाठी कमवतो त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ होत नसावा तिला. प्रत्येकाची अडचण असते. मागून हल्का हॉर्न ऐकू येतो. ही भानावर येते. ट्रॅफिक सुटलं आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतकं करूनही ऑफिस गाठेपर्यंत उशीर होतो. नेहमीचंच आहे. रोज फक्त कारणं बदलतात. मस्टर वगैरेची भानगड नसली तरी आजूबाजूच्यांचे डोळे बरंच काही बोलून जातात. परवा तर मिटींगमध्ये उशीर झाला तेव्हा बॉसने 'पुढल्यावेळी तुमच्याकडून सर्वप्रथम अपडेट्स घेणार हं!' असा टोमणा मारला.&lt;br /&gt;ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या अर्ध्या तासात शाळेतून फोन येतो. 'मुलीचं अंग गरम आहे. घरी घेऊन जा.' ती नवर्‍याचा नंबर फिरवते पण तो मिटींगमध्ये आहे. फोन बंद. गेल्या आठवड्यात मुलगा घरी राहिला होता. सडकून ताप भरला होता तेव्हाही ऑफिसला दांडी मारावी लागली होती. नवरा टूरवर बाहेरगावी गेला होता. मुलाला शाळेतून 'पिक-अप' केलं, डॉक्टरकडे नेलं आणि पुढले दोन दिवस घरातून काम केलं. सर्व मिटींग्जना डायल-इन केलं. मुलाला हवं नको ते बघत कामही केलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुलाचं डोकं दुखत होतं, तापाने अंग फणफणलं होतं. पाच वर्षांचा तर आहे. त्याला तू एकट्याने खोलीत झोप सांगितलं तर पटत नाही. आई जवळ लागते. 'ही'चा हात अंगावर ठेवलेला असला की शांत राहतो पण त्याला जवळ घेऊन मिटींगला डायल-इन कसं व्हायचं? खूपच पंचाईत झाली होती. शेवटी टीव्ही लावून दिला, कोंडून घातलं त्याला खोलीत आणि फोन लावला. नजरसारखी खोलीकडे जात होती. टीव्हीच्या आवाजात त्याच्या कण्हण्याचा आणि रडण्याचा आवाज पोहोचला नाही तर?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि आता पुन्हा मुलीचं आजारपण. 'ही' बॉससमोर उभी राहते. नजर ओशाळवाणी. 'मी घरी जाऊ का? मुलीला बरं नाहीये.' ही हळूच विचारते.&lt;br /&gt;'आजही?? ३ वाजता क्लायंटबरोबर मिटींग आहे. डायल-इन करणं फारसं बरं दिसत नाही.' बॉस नाराजीने म्हणतो.&lt;br /&gt;'मुलीला ताप आहे. शाळेतून फोन आला होता.' सांगताना 'ही'च्या डोळ्यात पाणी तरळतं.&lt;br /&gt;'ठीक! पण ३ वाजता नक्की मिटींगला डायल-इन हो.' बॉसचा आवाज नरमतो पण डोळ्यातली नाराजी कायम राहते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'ही' पर्स उचलून तडक बाहेर पडते. डोकं भणभणतंय. हे सर्व चाललं आहे ते पोरांसाठीच. त्यांच्या भविष्यासाठी. एकाच्या पगारात नाही भागत. दोन मुलं. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायची ऐपत हवी म्हणून हा खटाटोप. मुलांना चांगलं आयुष्य जगायची सवय झाली आहे. भीती वाटते ती या आयुष्याला त्यांना मुकावं लागलं तर? संसाराची दोन्ही चाकं चालताहेत. एक चाक मोडलं तर? 'ही'ला नोकरी करायलाच हवी. मंदीचे दिवस आहेत. दोघांपैकी कोणाची नोकरी कधी सुटेल याचा नेम नाही. संसाराचं गाडं चालत राहायला हवं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'ही' मुलीला शाळेतून पिक-अप करते. मुलगी तापाने फणफणली आहे. शाळेतली नर्स विचारते 'मुलीला शाळेत पाठवतानाच ताप असावा. तुम्ही पाठवलीतच कशी?'&lt;br /&gt;&lt;br /&gt;'ही'च्याकडे उत्तर नसतं. सकाळच्या घाईत झोपाळलेल्या मुलीला शाळेत पाठवलेलं असतं. ती कुरकुरत होती किंवा तिचं अंग गरम होतं हे पाहिलेलंच नसतं. 'ही' पुन्हा ओशाळवाणी होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'ही' मुलीला उचलूनच घरी आणते. घरी आल्यावर तिचा ताप मोजते. १०४ भरतो. मुलीला ग्लानी आल्यासारखीही वाटते आहे. घरात दुसरं कोणी नाही. मुलीला हाका मारते पण ती 'ओ' देत नाही. तिची तब्येत खरंच खूप बिघडली असावी. 'हीला' काय करावं ते क्षणभर कळत नाही. 'ही'ला रडू फुटतं पण रडता येत नाही. सांत्वन करायला कोणी नाही. 'ही' एकटी. या घरात आणि या देशातही. ही नवर्‍याला फोन लावते. तो येतोच म्हणून सांगतो.. तू तिला इमर्जन्सीला ने... तशी 'ही' तडक निघते.&lt;br /&gt;मुलीला उचलते आणि सुसाट गाडी हाकत इमर्जन्सी रूममध्ये पोहोचते. नवराही येतो. दोघे काळजीत. डॉक्टर सांगतात फ्लू आहे. तिला पुढले ४-५ दिवस तरी शाळेत पाठवू नका. 'ही' नवर्‍याकडे बघते. तो नजर फिरवतो. परवा बाहेरगावी जायचं आहे म्हणतो. 'ही' मान हलवते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता मुलगी बरी आहे पण डॉक्टरांनी ओव्हरनाइट हॉस्पिटलला राहायला सांगितलं आहे. 'ही'ला आठवतं की मुलगा शाळेतून घरी यायची वेळ झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;'ही' पुन्हा सुसाट घरी. नवरा मुलीजवळ थांबतो. 'ही' मुलाला शाळेतून घेऊन येते. त्याला दूध गरम करून देते आणि जरा सोफ्यावर टेकते. सकाळपासून 'ही'च्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही... 'ही'चं डोकं गरगरतं. अचानक नजर घड्याळाकडे जाते. ४ वाजायला आलेले असतात. ३ वाजताची मिटींग चुकलेली असते.... तिला फारसं काही वाटत नाही कारण डोकं आधीच "ज्यांच्यासाठी कमवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो खरा!" या विचाराने भरून गेलेलं असतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;------------&lt;br /&gt;&lt;div sizcache="0" sizset="16"&gt;&lt;em sizcache="0" sizset="16"&gt;हा प्रतिसाद मूळ मनस्वी राजन यांच्या &lt;a href="http://www.ailpail.com/node/427"&gt;ऐलपैलवरील स्फुटाला&lt;/a&gt; दिला होता. मूळ लेख मला आतिशय आवडला होता.&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-7307220370317430458?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/7307220370317430458/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=7307220370317430458' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/7307220370317430458'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/7307220370317430458'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2012/01/blog-post_24.html' title='हिची, तिची कहाणी'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-8616595425661296039</id><published>2012-01-20T05:36:00.001-08:00</published><updated>2012-01-20T07:41:18.311-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>गूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स</title><content type='html'>&lt;span style="color: #0000cc;"&gt;गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते. ज्या गोष्टी भयोत्पादक आहेत, मग त्या पारलौकिक, अतींद्रिय, परग्रहसंबंधित असोत की मानवी, त्यांना भयकथेमध्ये स्थान दिले जाते. कथेची मांडणीही अशी असते, की त्यातून भयाचीच निर्मिती व्हावी. जगभरच्या वाङमयात अशा उत्तम भयकथा पुष्कळ आहेत, त्यांच्यावर अनेक ग्राफिक नॉव्हेल्स, चित्रपट वगैरेही आलेले आहेत. आपल्याकडे नारायण धारपांनी 'चंद्राची सावली' सारख्या अनेक उत्कृष्ट दीर्घ भयकथा लिहिल्या आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: blue;"&gt;गूढकथेमध्ये, कधीतरी, अनपेक्षित म्हणून गूढ असलेल्या भीतीचा वापर अवश्य केला जातो; पण तिच्यात अशा इतर अनेक तत्त्वांचा समावेश होतो, जी अनोळखी, नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळी असल्यामुळे अर्तक्य आणि गूढ असतात. उदाहरणार्त्य, मंत्रचळेपणा. कुलूप पक्के लावलेले आहे, हे माहित असताही परत परत ओढून पाहणे, एक जिना उरतल्यावरही परत वर जाऊन पाहण्याचे कष्ट घेणे, हे नेहमीच्या सवयींपैकी दिसणारे आहे. माणूस असे का वागतो? - उत्तर नाही. ते गूढ आहे; पण ते भयप्रद नाही. जे समजण्याच्या पलीकडे आहे, अर्तक्य आहे, ते सार गूढ आहे. नेहमीच्या पाहण्यातले नाही, त्याची कदाचित भीती वाटू शकेलः पण ते मूलतः भीतिदायक नाही, ते गूढ आहे. ते वास्तव असू शकते. तरीही नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे ते वेगळे वाटते, अनाकलनीय वाटते, गूढ वाटते.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="color: #0000cc;"&gt;&lt;span style="color: blue;"&gt;&lt;span style="color: black;"&gt;-&lt;/span&gt;&lt;span style="color: blue;"&gt; रत्नाकर मतकरी.&lt;br /&gt;प्रस्तावना - अंतर्बाह्य&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;रत्नाकर मतकरींनी मांडलेले मत; गूढकथा आणि भयकथेतील फरक वाचकांना सहज कळून येत नाही याचा अनुभव मला अनेकदा आला आहे. बर्‍याच वेळा वाचकांना "ही भयकथा नाही, ही गूढकथा आहे." असे स्पष्टपणे सांगावे लागते. त्यानंतरच वाचक त्याकडे गूढकथा म्हणून पाहतात.परंतु तरीही, गूढकथेचा बाज त्यांना कळतो का याविषयी शंका वाटते. वरील परिच्छेदावरून गूढकथा आणि भयकथेतील फरक समजण्यास वाचकांना मदत होईल अशी अपेक्षा करते आणि गूढकथेच्या आणखी एका उदाहरणासाठी माझ्या एका आवडत्या चित्रपटाची ओळख येथे करून देते. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;काळ आहे दुसर्‍या महायुद्धाच्या वेळचा. युद्ध जवळ जवळ संपल्यात जमा आहे. ग्रेस स्टेवर्ट या स्त्रीचा नवरा फ्रान्समध्ये लढाईवर होता पण तो अद्याप परतलेला नाही. ग्रेस आणि तिची दोन लहान मुले, ऍनी आणि निकोलस हे एका मोठ्या इस्टेटीवर बांधलेल्या प्रचंड हवेलीत राहतात. ग्रेस अतिशय पापभिरू बाई आहे आणि मुलांनीही तसेच असावे यावर तिचा भर आहे. ऍनी हट्टी आहे. तिचं आणि ग्रेसचं पटत नाही. ग्रेस तिच्यावर कडक बंधने घालून शिस्त लावायचा प्रयत्न करते. निकोलस त्या मानाने खूपच बुजरा आहे. आठवड्याभरापूर्वी मायलेकीत काहीतरी झालं आहे आणि त्यावरून ऍनी ग्रेसवर नाराज आहे. ग्रेसच्या दोन्ही मुलांची कातडी प्रकाश संवेदनशील आहे त्यामुळे सूर्यप्रकाशापासून त्यांना दूर ठेवण्याची धडपड ग्रेस करते. घरातील पडदे सतत ओढलेले असतात आणि मंद दिवे किंवा मेणबत्तीच्या प्रकाशातच घरातले व्यवहार चालतात. ग्रेसला नवीन नोकर हवे आहेत कारण तिचे जुने नोकर नुकतेच काही कारणास्तव नोकरी सोडून गेलेले आहेत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;तिने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीवरून एके दिवशी तीन नोकर तिच्या दाराशी येतात. त्यांत मि.टटल हा म्हातारा माळी, मिसेस मिल्स ही मध्यमवयीन स्त्री, आणि एक मुकी तरुण मुलगी; लिडिया आहे. ग्रेस त्यांना आपल्या मुलांच्या परिस्थितीची ओळख करून देते आणि मुलांना प्रकाशापासून दूर राखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे त्याची कल्पना देते. ग्रेसला नोकर आणि नोकरांना नोकरी पसंत असते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;table class="image" style="border-bottom: #ccc 1px solid; border-left: #ccc 1px solid; border-right: #ccc 1px solid; border-top: #ccc 1px solid; float: right; margin: 0.1em; width: 1%;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="चित्र विकिपीडियावरून साभार." src="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/4/4c/TheOthers.jpg" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;परंतु एके दिवशी ग्रेसच्या लक्षात येते की तिने वर्तमानपत्रात दिलेली जाहीरात छापून आलेलीच नाही. ती मिसेस मिल्सकडे विचारणा करते. त्यावर मिसेस मिल्स सांगतात की ग्रेस या घरात राहायला येण्यापूर्वी जुन्या मालकांकडे ते तिघे नोकर कामाला होते पण नंतर नोकरी गेली. तरीही या घरात आणि इस्टेटीवर काम करणे त्यांना आवडत असे. एके दिवशी सहज नोकरी शोधायला म्हणून स्वतःहून त्यांनी येथे येऊन पाहिलं तर नोकरी मिळून गेली. जाहीरातीबद्दल फार उहापोह न झाल्याने त्यांनीही फार भर दिला नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;हळूहळू ग्रेसला घरात काहीतरी विचित्र अनुभव येऊ लागतात. ऍनी येऊन तक्रार करते की तिच्या खोलीत तिला व्हिक्टर नावाचा एक मुलगा दिसतो. तिला घरात इतर माणसेही कधीतरी दिसतात पण व्हिक्टर अधिक वेळा दिसतो. घरात कोणीतरी बोलते आहे, कुजबुजते आहे असे भास होतात. कधीतरी काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज येतो. ग्रेसला वाटते की ऍनी तिच्यावर रागावलेली असल्याने खोटे बोलते आहे आणि ऍनीला आणखी कडक शिक्षा होते. परंतु, मिसेस मिल्स ऍनीवर विश्वास ठेवतात आणि एक दिवस तुझ्या आईलाही या प्रकारांची प्रचिती येईल असे सांगून ऍनीची समजूत काढतात. हवेलीच्या आवारात तीन ग्रेव्हस्टोन्स आहेत. मि. टटल त्यावर वाळकी पाने टाकून त्यांना लपवायचा प्रयत्न करतात.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;एके दिवशी ग्रेसला खरेच घरात काहीतरी वावगे दिसते. त्या प्रकाराने त्रस्त होऊन ग्रेस घराला ब्लेस करून घ्यायचे ठरवते आणि प्रीस्टच्या शोधासाठी घराबाहेर पडते. मिसेस मिल्स ग्रेसला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ती जुमानत नाही. वाटेत धुकं पडलं आहे. ग्रेसला त्यातून वाट काढताना नाकी नऊ येतात पण त्याच धुक्यातून तिच्यासमोर अचानक तिचा नवरा, चार्ल्स, उभा ठाकतो. ग्रेस आनंदाने नवर्‍याला घरी घेऊन येते पण तिच्या लक्षात येते की तिचा नवरा पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो अबोल झाला आहे ,अतिशय थकलेलाही आहे. त्याचा भ्रमनिरास झाला असावा. "बहुधा तो कोठे आहे हे देखील त्याला माहित नसावे"असे त्याच्याकडे पाहून मिसेस मिल्स म्हणतात.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;घरातील विचित्र घटना सुरूच राहतात. ऍनी ग्रेसला व्हिक्टर आणि त्याच्या आईवडिलांचे चित्र काढून दाखवते. चित्रात त्यांच्यासोबत एक आंधळी म्हातारीही दिसते. ते चित्र पाहून ग्रेस चकित होते आणि घरात काही सापडते का हे पाहण्यासाठी घराची तपासणी सुरू करते. तशात तिला मृत्यूसमयी काढलेल्या फोटोंचा एक अल्बम दिसतो. त्यातले काही फोटो गहाळ आहेत. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;एके दिवशी ग्रेस आणि ऍनी, ऍनीचा एक ड्रेस शिवत बसलेल्या असतात. काही कारणास्तव ग्रेसला खोलीबाहेर जावे लागते. ती परतते तेव्हा ऍनी तो जवळपास पूर्ण झालेला ड्रेस घालून जमिनीवर बसलेली असते पण ती ऍनी नसते. त्या ड्रेसमध्ये ती आंधळी म्हातारी असते. ग्रेसचा थरकाप उडतो आणि संतापही अनावर होतो. ती त्या मुलीला पकडून बदडून काढते. या झटापटीत ड्रेस फाटतो आणि ग्रेसच्या लक्षात येतो की तिला झाला तो भास होता. प्रत्यक्षात ती ऍनीलाच मारते आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;ग्रेस नवर्‍याच्या खोलीत जाते. तो शांतपणे तिला सांगतो की आठवड्याभरापूर्वी तू काय केलेस हे ऍनीने मला सांगितले आहे. हे ऐकल्यावर ग्रेस ढेपाळते आणि आपली चूक नव्हती, भावनेच्या भरात कृत्य झाले असे सांगण्याचा प्रयत्न करते. लवकरच ग्रेसचा नवरा घरातून निघून जातो. ग्रेस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो बधत नाही. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;दुसर्‍या दिवशी सकाळी घरातले सर्व पडदे गायब होतात आणि घर प्रकाशाने भरून जाते. ग्रेसची मुलं घाबरून आरडाओरडा करतात. ग्रेस संतापाने वेडीपिशी होते. तिला हे नोकरांचे कारस्थान वाटते. ती त्यांच्यावर बंदूक रोखते. ग्रेसचा हा अवतार पाहून मुले भेदरतात. त्या रात्री ती घरातून पळून जाऊन वडलांचा शोध घेण्याचा बेत आखतात आणि खिडकीतून खाली उरतरात. रागाने वेडीपिशी झालेली ग्रेस घरभर पडदे शोधते आहे. ती पडदे शोधायला नोकरांच्या खोलीत जाते आणि तेथे तिला एक पाकिट सापडते. त्या पाकिटात मृत्यूसमयी मृत शरीरांचे काढलेले तीन फोटो मिळतात. १८९१ साली वारलेल्या माळी, मिसेस मिल्स आणि लिडियाचे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;एव्हाना घराबाहेर पडलेल्या ऍनीला आवारात तीन ग्रेव्हस्टोन्स दिसतात. घरातल्या तीनही नोकरांचे. ऍनीला रहस्याचा उलगडा होतो आणि तेव्हाच मि.टटल, मिसेस मिल्स आणि लिडिया मुलांच्या दिशेने येताना दिसतात. ऍनी आणि निकोलस जीव घेऊन घराच्या दिशेने धावत सुटतात आणि....&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;त्या हवेलीत नेमकं रहस्य काय असतं? ते तिघे मृत नोकर ग्रेस आणि मुलांपर्यंत पोहोचतात का? व्हिक्टर त्याचे आईवडिल आणि त्या आंधळ्या म्हातारीचं काय रहस्य असतं? ग्रेसचा नवरा कुठे नाहीसा झालेला असतो या अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा चित्रपट वाचकांनी अवश्य पाहावा.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;२००१ साली प्रदर्शित झालेल्या "द अदर्स" चित्रपटात निकोल किडमनची प्रमुख भूमिका आहे आणि तिने ती अतिशय ताकदीने पेलली आहे. राग, भीती, कुतूहल या सर्व भावना निकोल आपल्या डोळ्यांतून अतिशय प्रभावीपणे व्यक्त करते. चित्रपट पाहताना कोठेही किळस, ओंगळवाणे काहीतरी पाहिल्याचा प्रत्यय येत नाही. फारशी भीतीही वाटत नाही. किंबहुना, दचकवणारा एकमात्र प्रसंग ड्रेसमध्ये ग्रेसला ऍनीऐवजी म्हातारी दिसते तो असावा. तरीही, समोर जे सुरु आहे ते कुतूहल जागवते. प्रेक्षकांना बांधून ठेवते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;वातावरण निर्मिती, सशक्त रहस्य आणि कलाटणी हे गूढकथेचे मुख्य भाग असायला हवेत. या तीनही विभागांत हा चित्रपट सरस वाटतो. प्रचंड मोठी धुक्यात वेढलेली इस्टेट, प्रकाशाची ऍलर्जी असणारी मुले आणि त्यांची विशेष काळजी घेणारी ग्रेस, अचानक उपटलेले तीन नोकर, घरात वेळी अवेळी दिसणार्‍या व्यक्ती, ग्रेसच्या नवर्‍याचे येणे आणि जाणे आणि अर्थातच कथेला मिळणारी शेवटची कलाटणी.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;हा चित्रपट सुमारे १० वर्षांपूर्वीचा असल्याने अनेकांनी पाहिला असावा. चित्रपटाविषयी त्यांचे विचार ऐकायला आवडतील. भय हा मुद्दा गूढकथेमध्ये मुख्य नसतो पण तो हळूच शिरकाव करतो. या चित्रपटातही रहस्याचा पत्ता शेवटपर्यंत प्रेक्षकांना न लागू देण्यात पटकथा यशस्वी ठरते. द अदर्स या चित्रपटावर काही तद्दन टुकार हिंदी चित्रपटही आले आहेत. तरीही, गूढकथेचा अस्सल आणि परिपूर्ण नमुना म्हणून "द अदर्स"चे नाव घेता यावे. या चित्रपटाची शिफारस मी आतापर्यंत अनेकांना केली आहे आणि त्या सर्वांना हा चित्रपट आवडला आहे हे विशेष.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: right;"&gt;&lt;span style="color: blue;"&gt;.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-8616595425661296039?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/8616595425661296039/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=8616595425661296039' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/8616595425661296039'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/8616595425661296039'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2012/01/blog-post.html' title='गूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-8201896022473340054</id><published>2011-07-18T04:56:00.000-07:00</published><updated>2011-07-18T04:58:33.579-07:00</updated><title type='text'>एका येडपटाची पत्रे</title><content type='html'>कोर्‍या चेहर्‍याने विनोद करणार्‍या व्यक्तींची मला नेहमीच गंमत वाटत आली आहे कारण ते विनोद करतात की गांभीर्याने काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात चटकन लक्षात येत नाही आणि असे माझेच का इतरांचेही होत असावे असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या मुलीला शाळेत इंग्लीशच्या एका गृहपाठासाठी "यडपटाची पत्रे" असा विषय होता. "लेटर्स फ्रॉम ए नट" हे पुस्तक तिने लायब्ररीतून आणले होते त्याचे थोडेफार वाचन केले आणि हसून हसून मुरकुंडी वळणे या वाक्प्रचाराची प्रचिती घेतली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;टेड नॅन्सी हे बॅरी मार्डर या विनोदी नटाचे टोपण नाव. या नावाने त्याने अनेक कंपन्यांना, व्यवसायांना आणि व्यावसायिकांना पत्रे लिहिली. पत्रांची धाटणी गंभीर पण आशय अतिशय बावळट अशा स्वरूपाची ही पत्रे ज्यांना गेली त्यातील काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले तर काहींनी त्याची गांभीर्याने उत्तरेही दिली. ही पत्रे त्याने "लेटर्स फ्रॉम ए नट" आणि इतर पुस्तकांत संकलित केली आहेत. जेरी साईनफेल्डची प्रस्तावना या पुस्तकांना आहे. त्यापैकी काही पत्रांचे संक्षिप्त रूप आणि अनुवाद येथे देते -&lt;br /&gt;&lt;br /&gt;टेड नॅन्सीची पत्रे निळ्या रंगात आणि उत्तरे लाल रंगात टाकली आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पत्र पहिले - नॉर्डस्टॉर्म या प्रसिद्ध दुकानाला लिहिलेले&lt;br /&gt;&lt;br /&gt;पत्राचा थोडक्यात आशय असा -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="COLOR: #339"&gt;&lt;em&gt;ब्रुस नॉर्डस्टॉर्म,&lt;br /&gt;नॉर्डस्टॉर्म&lt;br /&gt;गेल्यावेळी तुमच्या दुकानात फेरफटका मारताना दुकानात ठेवलेला एक पुतळा (mannequin)दृष्टीस पडला. हा पुतळा मला विकत घेण्याची इच्छा आहे कारण माझ्या दिवंगत मित्राच्या चेहर्‍याशी मिळता जुळता चेहरा मला तिथे सापडला. तो त्याच्या कुटुंबाला भेट देण्याचा मनसुबा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तरी मला पुतळ्याची किंमत कळवणे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;टेड नॅन्सी.&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;या पत्राला ब्रुस नॉर्डस्टॉर्मकडून व्यवस्थित उत्तर आले -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="COLOR: #900"&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;टेड नॅन्सी,&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुमची मागणी अतिशय रोचक वाटली. खरे सांगायचे तर, आपल्या जीवलगाच्या मृत्यूनंतर त्याचा पुतळा अशाप्रकारे घरी ठेवण्याची कल्पना त्यांच्या कुटुंबाला रुचेल असे वाटत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तरीही, आमच्या सर्व गिर्‍हाईकांना सकारात्मक उत्तरे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याने हे कळवू इच्छितो की आम्ही दुकानातले पुतळे जोपर्यंत वापरतो तोपर्यंत ते विकत नाही. परंतु जेव्हा ते बदलायची वेळ येईल तेव्हा ज्या किंमतीला आम्ही ते विकत घेतले त्याच किंमतीला आम्ही ते तुम्हाला विकत देऊ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अधिक माहितीसाठी आपल्या घराजवळील स्टोर मॅनेजरशी संपर्क साधावा. मी हे पत्र त्यांनाही पाठवतो आहे.&lt;br /&gt;ब्रुस नॉर्डस्टॉर्म&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;पत्र दुसरे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="COLOR: #339"&gt;&lt;em&gt;प्रशासन,&lt;br /&gt;द कोका कोला कंपनी,&lt;br /&gt;अटलांटा&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी एक नवे पेय शोधले आहे - काएट डोक. हे पेय तुमच्या डाएट कोक या पेयामध्ये हस्तक्षेप करेल का हे जाणून घ्यायचे आहे. अर्थातच माझ्या पेयाची चव कोकसारखी नाही!! (ती पेप्सीसारखी आहे.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी हे पेय बांधकाम मजूरांना विकतो आणि त्यातील एकाने मला सांगितलेही होते की ते अजिबात कोकसारखे वाटत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी हे पेय राजरोस विकू शकतो का हे मला कृपया कळवावे. सोबत आपण कोका कोलामध्ये कॅरमेल घालता का हे ही कळवावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;धन्यवाद,&lt;br /&gt;टेड नॅन्सी.&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;याला कोकाकोलाचे उत्तर (संक्षिप्त)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="COLOR: #900"&gt;&lt;em&gt;टेड नॅन्सी,&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या पत्राबद्दल धन्यवाद.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डाएट कोक हा आमचा ट्रेड मार्क असून आम्ही तुम्हाला काएट डोक या नावाने पेयविक्रीची परवानगी देत नाही. काएट डोक हे नाव आमच्या डाएट कोकशी मिळतेजुळते असून ते बाजारात गोंधळ निर्माण करेल अशी आम्हाला शंका वाटते आणि आमच्या गिर्‍हाइकांचा हे कोका कोला कंपनीने मान्यता दिलेले उत्पादन आहे असा गैरसमज होऊ शकतो. यामुळे आपण काएट डोकचे उत्पादन ताबडतोब बंद करावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ट्रेडमार्क काउन्सिल,&lt;br /&gt;द कोका कोला कंपनी&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;याला टेड नॅन्सीनी आणखी विक्षिप्त उत्तर पाठवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="COLOR: #339"&gt;&lt;em&gt;द कोका कोला कंपनी&lt;br /&gt;अटलांटा,&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी ठरवले आहे की मी काएट डोक या पेयाची विक्री करणार नाही. मी माझे बँकेतले पैसे आणि काएट डोकचे उरलेले ११ कॅन घरी नेले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला कळून चुकले आहेत की ही एक कमजोर कल्पना होती. माझा मूर्खपणा दुसरे काही नाही. म्हणजे असे बघा की तुम्ही ७-११ मध्ये जाऊन डॉ.पेपर, ऑरेंज क्रश, विंक आणि काएट डोक पाहिलेत तर तुम्ही काएट डोक थोडेच विकत घेणार? मला तसे वाटत नाही. माझ्या वाह्यात कल्पनेने मी शरमिंदा झालो आहे. तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल क्षमा मागतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तरी तुम्ही माझ्या नव्या पेयाकडे लक्ष ठेवून राहावे - पाएट डेप्सी. त्याचे घोषवाक्य ओळखीचे आहे - 'इट टेस्ट्स नथिंग लाइक कोक!'&lt;br /&gt;&lt;br /&gt;बरं, मी ते कोकमध्ये कॅरेमेल असण्याबद्दल विचारले होते त्याला तुम्ही उत्तर दिले नाही. शक्य असल्यास कळवावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;टेड नॅन्सी.&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;img class="imagecache imagecache-250px_width imagecache-default imagecache-250px_width_default" title="बॅरी मार्डर" alt="बॅरी मार्डर" src="http://www3.pictures.gi.zimbio.com/Barry+Marder+Premiere+DreamWorks+Animation+Fb1MXWpJW8Cl.jpg" width="250" /&gt; ही अशाप्रकारे अनेक पत्रे टेड नॅन्सीच्या "लेटर्स फ्रॉम ए नट", "एक्स्ट्रा लेटर्स फ्रॉम ए नट" या पुस्तकांत आहेत. कधी एखाद्या हॉटेलला पत्र पाठवून माझा दात तुमच्या हॉटेलात पडला होता तो कृपया शोधून मला पार्सल करावा अशी मागणी तर कधी दुसर्‍या हॉटेलला मी अब्राहम लिंकनसारखा दिसत असल्याने माझे संरक्षक दल सोबत घेऊन येऊ शकतो का अशी विचारणा. एका रेस्टॉरंटला या गृहस्थाने मी माझा खाजगी वेटर सोबत घेऊन येऊ का? अशी विचारणा केली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. तर याप्रकारचा गृहपाठ करायचा आहे पण टेड नॅन्सीच्याच कल्पना जशाच्या तशा लिहायच्या नाहीत. काल आम्ही तीन कल्पना शोधल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, एलिस आयलंड फाउंडेशनला एका रंगारी कंपनीकडून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी रंगवून देण्याचे पत्र लिहायचे. त्यात त्यांच्याकडून लिबर्टी देवतेच्या पोशाखाचे रंग कळवावे अशी मागणी करायची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२. टॅटू पार्लरला मानेवर टॅटू काढून घ्यायचा आहे असे पत्र पाठवायचे. पत्रात टॅटू मानेवर कुठे हवा, किती मोठा हवा, तो काढून घेताना दुखेल का वगैरेची विचारणा करावी. शेवटी मी माझ्या शहामृगाला ठरवलेल्या वेळी घेऊन येतो असे कळवायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. हे पत्र शहराच्या झू ला पाठवायचे. माझ्या बहिणीचा १६ वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त पार्टी आयोजित केली आहे. पत्रात पार्टीबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आणि बहिणीला लहानपणापासून "टेडी बेअर्स" आवडतात. तिला तिच्या वाढदिवसाला सरप्राईझ द्यायचे आहे त्यासाठी दोन तास एखादे पोलर बेअर भाड्याने मिळेल का? अशी विचारणा करायची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;* चित्र जालावरून साभार&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-8201896022473340054?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/8201896022473340054/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=8201896022473340054' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/8201896022473340054'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/8201896022473340054'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2011/07/blog-post.html' title='एका येडपटाची पत्रे'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-2956868265007165398</id><published>2011-05-02T05:59:00.000-07:00</published><updated>2011-05-02T06:17:57.248-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>चुकलेली वाट</title><content type='html'>&lt;span style="color:#999999;"&gt;सूचना: खालील लेखनप्रकार हा केवळ अनुभव असून सत्यकथा आहे. केवळ पात्रांची नावे बदलली आहेत. असे अनुभव अनेकांनी आयुष्यात अनुभवल्याची शक्यता असल्याने त्यात नावीन्य मिळणे कठिण आहे. कथा त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून असल्याने एकांगी आहे. त्यात दोन्हीकडील बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही. ही भयकथा किंवा गूढकथा नाही.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;८:३२ ची गाडी आज नक्की चुकणार होती; गाडी चुकली की १० वाजताची मीटिंगही. घरातून निघायलाच उशीर झाला. जेव्हा वेळा साधायच्या असतात तेव्हा हमखास काहीना काही गडबड असतेच. आज काय? कामवालीला उशीर झाला. तिचं काम होईपर्यंत मला खोळंबून राहावं लागलं. तरी स्टेशन फार लांब नाही. पायी दहा मिनिटं लागतात पण हल्ली पायी स्टेशनपर्यंत पोहोचणं म्हणजे मोठं कठिण काम. रिक्शा, बाइक्स, बसेस, फेरीवाले यांनी रस्ता असा अडवलेला असतो की त्यातून वाट काढत चालणं तारेवरल्या कसरतीपेक्षा वेगळं नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पिंपळाच्या पारापाशी नितीश आळसावून बसलेला दिसला. मळकटलेले कपडे, विस्कटलेले केस, पायाला बांधलेलं चिंध्या झालेलं बँडेज. त्याच्या अंगाला गेला महिनाभर तरी पाण्याचा स्पर्श झाला नसावा. मी पारापासून चार हात दूरून जायचं ठरवलं. आधीच उशीर आणि त्यात भल्या सकाळीच याचं नको असलेलं दर्शन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ए मला वीस रुपये दे ना! काल सकाळपासून काही खाल्लं नाही. प्लीज, डोंट से नो. " त्या गर्दीत वाट काढत, लंगडत तो कसा माझ्यापाशी पोहोचला देवजाणे. आपले पिवळे पडलेले दात दाखवत आणि चेहर्‍यावर वाढलेले खुंट खाजवत तो ओशाळवाणे हसून मला विचारत होता. त्याच्या अंगाला येणार्‍या त्या घाणेरड्या भपकार्‍याने मला मळमळून आले.&lt;br /&gt;माझ्या चेहर्‍यावरचे त्रासिक भाव लपवणे मला शक्य नव्हते. "हे बघ! मला आधीच उशीर झाला आहे आणि मी तुला अजिबात पैसे देणार नाही. याआधीही दोनदा दिले आहेत. दूर हो आता! "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ए नाही नको ना म्हणू! दे ना. भूक लागली आहे. " त्याने केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत हात पसरला. रस्त्यावरचे लोक आता वळून तमाशा पाहत होते. मला आणि नितीशला या भागात ओळखणारेही अनेक होते. मला उगीचच लाजल्यासारखं वाटलं. मी पुढे एक चकार शब्द न काढता पर्समधून चटकन वीस रुपयांची नोट काढली, त्याच्या दिशेने फेकली आणि तिथून पळ काढला. ८:३२ ची लोकल चुकली होतीच. मनातल्या मनात दोनचार शिव्या हासडून मी पुढली लोकल पकडली. पाठ टेकवून उभं राहायला मिळालं हेच खूप होतं. ट्रेन हलली आणि डोळ्यांसमोर पुन्हा नितीश उभा राहिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;***&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गोरेगावला आम्ही इमारतीत राहायला आलो तेव्हा मी फक्त दीड वर्षांची होते. मोजून ३० कुटुंबे होती इमारतीत; बरीचशी तिशी-चाळिशीची नोकरदार मंडळी. पै-पै जमवून, गृहकर्ज काढून आपल्यासाठी मुंबईत हक्काचा निवारा मिळवण्यास धडपडणारी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तळमजल्यावर नायकांचे कुटुंब राहायला आले होते. सुरेशकाका आणि सुमनकाकींचा सुसज्ज दोन बेडरूमचा फ्लॅट होता. त्यांचा मुलगाही माझ्या एवढाच, दीड वर्षांचा होता. आसपास याच वयाची आणखीही बरीच मुलं इमारतीत होती. गाडी, फोन, उंची फर्निचर या चैनीच्या आणि श्रीमंतीच्या गोष्टी समजल्या जात असा तो काळ होता आणि राष्ट्रीय बँकेत उच्चपदस्थ असणारे सुरेशकाका फोन, गाडी, ड्रायव्हर सर्व बाळगून होते. तळमजल्यावर राहत असल्याने सुरेशकाकांची गाठभेट अनेकदा होई. सर्वांशी अदबाने बोलणारे, आमचा फोन खुश्शाल वापरा, कधी गरज लागली तर आपली गाडी आहे हं! असे आवर्जून सांगणारे सुरेशकाका इमारतीत सर्वांना आवडत. सुमनकाकीही मिळून मिसळून वागणार्‍या होत्या. लोकांना पहिले काही दिवस एका गोष्टीचे कुतूहल होते, ते म्हणजे हे दांपत्य चाळिशीला आलेले होते पण त्यामानाने त्यांचा मुलगा फार लहान होता. लवकरच या गोष्टीचा उलगडा लोकांना झाला. नितीश हा त्यांचा दत्तक मुलगा होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नितीश काका-काकूंचा मुलगा नाही ही गोष्ट मला लहानपणीच माहीत झाली होती. नेमकी कुणी सांगितली ते आठवत नाही पण काही मोठ्या मुलामुलींकडून समजली असावी. मुलांनी या गोष्टीला खूप महत्त्व दिल्याचे आठवत नाही. या गोष्टीवरून इमारतीतील मोठ्यांमध्येही फार चर्चा झाल्याचे आठवत नाही. सर्वांनी तो सुरेश आणि सुमनकाकींचाच मुलगा आहे हे मनापासून स्वीकारले होते. खुद्द नितीशला या गोष्टीची कल्पना नसावी बहुधा आणि कधी त्याला कुणी दुखवून सांगितले असेही आठवत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहान बाळं सर्वांनाच गोड, गोजिरी वाटतात आणि आवडतात पण जसजशी मुलं मोठी होतात तसतशी प्रत्येक मुलातले गुणदोष इतरांना कळू लागतात. नितीशसारख्या गुटगुटीत, गबदुल लहान बाळाचे कौतुक सर्वांनी केले तरी थोड्याच काळात या बाळाचे रुपांतर अंगाने अस्ताव्यस्त सुटलेल्या खादाड मुलात होईल याची कल्पना कुणाला नव्हती. ५-६ वर्षांच्या नितीशचे कौतुक होण्यापेक्षा मुलांमध्ये हसू होऊ लागले आणि केवळ त्याचा जाडेपणाच त्याला कारणीभूत होता असे नाही. नितीशचे गुण-दुर्गुणही हळूहळू लोकांच्या नजरेत येऊ लागले. माझ्या ५ व्या वाढदिवसाची घटना...&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या काळी आतासारखे वाढदिवसानिमित्त मोठ्ठे खर्च करायची पद्धत पडली नव्हती. आईने इमारतीतल्या लहान मुलांना बोलावले होते. घरी केक केला होता आणि बटाटेवडे तळले होते. केक कापायची वेळ झाली तशी आईने केक आणून टेबलवर ठेवला आणि सुरी आणण्यासाठी ती आत गेली. परत येऊन पाहते तो काय नितीश केकचा भलामोठा ढलपा हाताने तोडून चापण्यात मग्न होता. बाकीची मुलं आ वासून बघत होती आणि मी भोकांड पसरलं होतं. इतक्या लहान मुलाला ओरडावं तरी कसं म्हणून आई गप्प बसली. असाच अनुभव थोड्याफार फरकाने अनेकांना आला होता. कधी कुणी खाण्याची सर्वांमध्ये ठेवलेली बशी एकट्याने हिसकावून त्यावर ताव मारणे, वाढदिवसाला, पूजेला कुणी बोलावले तर हावरटासारखा खाण्यावर आडवा हात मारणे, इतरांच्या प्लेटमधले पदार्थ हिसकावून घेणे अशा अनेक प्रसंगांतून लहान आणि मोठेही मागून त्याची चेष्टा करू लागले. गोष्ट केवळ इतक्यावरच राहती तर मोठा प्रश्न होता असे वाटत नाही पण...&lt;br /&gt;&lt;br /&gt;नितीशच्या अंगात उपजतच खोडकर गुण होते; आठ-नऊ वर्षांच्या कळत्या वयातही ते कमी झाले नाहीत. आपल्यापेक्षा लहान आणि दुर्बळ मुलांना बडवून काढणे, त्यांच्या अंगावर थुंकणे, त्यांच्या खोड्या काढणे, त्यांना शिव्या देणे अशा अनेक प्रसंगांतून तो लवकरच मुलांमध्ये अप्रिय होऊ लागला. लहान मुलांची न्यायशक्ती दांडगी असते म्हणे. ते काळ्याला काळे आणि पांढर्‍याला पांढरे म्हणायला कचरत नाहीत. यथावकाश मुलांनी नितीशला हळूहळू चोख उत्तर देणे सुरू केले. त्याला खेळातून कटाप केले जाई, घेतले तरी पकडापकडीचे, लपाछपीचे राज्य सतत त्याच्यावर दिले जाई. क्रिकेट खेळताना बॅटिंग आणि बोलिंग त्याच्या वाट्याला येत नसे. फक्त फिल्डिंग करशील तरच आमच्यात खेळ असे त्याला सुनावले जाई. अर्थातच, त्याचा फारसा उपयोग होत नसेच. मनात आले की नितीश कोणीतरी दुसरे गिर्‍हाईक शोधी किंवा एखाद्या मुलाला एकटे गाठून प्रसाद देई. एकदा त्याने खेळायला गेलेल्या तीन-चार वर्षांच्या लहान मुलांना झाडाच्या पडलेल्या फांदीने अंगावर वळ उठेपर्यंत सपासप फोडून काढले होते. त्या प्रसंगानंतर मोठेही नितीशपासून आपल्या मुलांना दूर राहण्याचा सल्ला देऊ लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नितीशच्या तक्रारी सतत त्याच्या आईवडीलांकडे जाऊ लागल्या. "काकी, नितीशने मारलं.", "काकू, नितीश बघा थुंकतो आमच्या अंगावर. आम्ही नाही घेणार त्याला खेळायला. " "अहो, समजवा तुमच्या नितीशला. काल मारलं त्याने आमच्या नमूला." नितीश असे का करत असेल, त्याला एखादी मानसिक व्याधी होती की नाही ते जाणून घेण्याचा आणि उपचार करण्याचा तो काळ नव्हता. कदाचित त्याला उपचारांची गरज असू शकते, समुपदेशन करावे लागेल हे इतरांना कधी जाणवलं नाही तसं त्याच्या आई-वडिलांनाही ते जाणवलं नसावं. आपल्या मुलाला इतर मुले नावे ठेवतात. त्याला खेळायला घेत नाहीत, त्याला चिडवतात या गोष्टींनी सुमनकाकी कानकोंड्या झाल्या. पोटचं मूल नसण्याचं दु:ख आणि नितीशच्या रूपाने आपले ममत्व प्रकट करायची त्यांना मिळालेली संधी यातून त्या इतरांच्या तक्रारींकडे पूर्ण दुर्लक्ष करू लागल्या. याचा परिणाम असा झाला की नितीश दिवसेंदिवस अधिकच निगरगट्ट होऊ लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एके दिवशी तक्रारी ऐकल्यावर वैतागाने सुमनकाकींनी पोरांची हजेरी घेतली. "तुम्ही सर्व नितीशला उगीच नावं ठेवता. मुद्दाम त्याला त्रास देता. त्याला तुमची गरज नाही. मी खेळेन त्याच्याशी. तुमची अरेरावी मी खपवून घेणार नाही. चल, नितीश, आजपासून आपण दोघे घरात खेळू. " असं म्हणून त्या तरातरा त्याला ओढत घेऊन गेल्या. आता हा पायंडाच पडला होता. नितीशची तक्रार गेली की सुमनकाकी आमच्यावरच करवादून त्याला खेचून घेऊन जात. मोठ्यांनीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. सुरेशकाकांच्या कानावरही नितीशच्या तक्रारी आल्या होत्या. ते समजूतदारपणे तक्रारी ऐकून घेत. नितीशला प्रेमाने, धाकाने समजवण्याचा प्रयत्न करत. सुरेशकाकांचा धाक नितीशला होता त्यामुळे तोही समजल्यासारखे दाखवी. आम्ही मुलेही समजूतदार होत असू; त्याला पुन्हा आमच्यात खेळायला घेत असू परंतु काही दिवसांनी... ये रे माझ्या मागल्या!&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहानांनी त्याचे क्रौर्य अनुभवलेले असले तरी मोठ्यांशी बोलताना नितीशचे बोलणे अतिशय अदबशीर असे. सुरेशकाकांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते आणि घरातही ते बरेचदा त्याच्याशी इंग्रजीतून बोलत. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार पाळण्याची सवय त्याला लागली होती. इंग्रजी माध्यमात त्या काळी आजच्या मानाने कमी मुले जात त्यामु़ळे नितीशच्या सफाईदार इंग्रजीचे कौतुक करणारे बरेचजण होते. अभ्यासातही नितीश तल्लख होता. दरवर्षी ७५-८० टक्के गुण सहज मिळवत असे. त्याच्या गुबगुबीत शरीरयष्टीमुळे इमारतीतील नाटकांत, फॅन्सी ड्रेस स्पर्धांत तो सर्वांना हवा असे. त्यामुळे कितीही नावडता असला तरी मुलांनी त्याला आपल्यात सामावून घेतले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वयाच्या ११-१२ व्या वर्षीच त्याला आम्हा मुलांपैकी कुणीतरी लपून सिगरेट ओढताना पाहिले. बातमी पोरांमध्ये कानोकानी पसरली. "ए त्याच्या आईला सांगायचं का? " हा प्रश्न ज्याने उपस्थित केला त्याला दटावण्यात आले. "त्याची आई मागे काय म्हणाली होती माहित्ये ना. तुम्ही मुद्दाम त्याला त्रास देता आणि त्याच्या खोट्या तक्रारी करता. आपण कशाला मध्ये पडायचं? " वयानुसार नितीशचा खोडकरपणा इतरत्र वळला होता. अक्कल नको त्या दिशेने वाहवत चालली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ए तुला माहित्ये, त्याच्याकडे ती तसली चित्रं असतात. "&lt;br /&gt;"तसली म्हणजे? "&lt;br /&gt;"तसली म्हणजे उघड्या नागड्या बायकांची. " नम्रता एक दिवस माझ्या कानात कुजबुजली.&lt;br /&gt;"तुला काय माहीत? "&lt;br /&gt;"अगं, माझी मामेबहीण आहे त्याच्या वर्गात. ती म्हणत होती. नितीशच्या दप्तरात पाहिली काही मुलांनी. "&lt;br /&gt;"होऽऽ? म्हणजे तो राजरोस जवळ बाळगतो? शाळेतही.. इइइ" मी डोळे विस्फारले. "शी! अशा घाणेरड्या मुलाशी फार बोलायचं नाही हं आपण. अंतर राखून राहिलं पाहिजे. " त्या वयात फार मोठा धक्का होता आमच्यासाठी.&lt;br /&gt;"अगं, शाळेतही त्याच्याशी फारसं कोणी बोलत नाही. त्याची कुणाशी मैत्री नाही. मधल्या सुट्टीत ना, तो शाळेजवळचे फेरीवाले, पानवाले यांच्याशी गप्पा मारत असतो. गुटखा-बिटखाही खात असणार."&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे कधीतरी नितीशला जवळच्या विडिओ पार्लरमधून बाहेर पडताना पाहिले. दुपारच्या वेळी तिथे एक्स-रेटेड चित्रपट दाखवले जात. शाळेतल्या लहान मुलाला तेथे खरेतर प्रवेश नव्हता पण असे नियम पाळतो कोण? बातमी आम्हा मुलांमध्ये लगेच कर्णोपकर्णी झाली.&lt;br /&gt;"बरं कुणाला सांगणार नसशील तर तुला एक गोष्ट सांगते. " नम्रता काळजीने सांगत होती.&lt;br /&gt;"कुठली गोष्ट? " मी उत्सुकतेने विचारलं.&lt;br /&gt;"माझी आईला चौथ्या मजल्यावरची सोनाली आहे ना तिच्या आईने सांगितलं. खूप रागात होती सोनालीची आई. "&lt;br /&gt;"का गं? "&lt;br /&gt;"अगं परवा लाइट गेले होते ना संध्याकाळी तेव्हा सोनाली क्लासमधून परत येत होती. लिफ्ट बंद होती ना त्यामुळे तिला चौथ्या मजल्यापर्यंत जिने चढावे लागले. त्या नितीशने तिला येताना पाहिलं असावं. तिच्या मागे मागे तो ही गेला आणि म्हणे तिला मागून करकचून मिठी मारली. ती घाबरून ओरडली ना तशी पळून गेला, घाणेरडा! "&lt;br /&gt;"इइइइ विकृत आहे. सोनालीची आई काही बोलली नाही का? "&lt;br /&gt;"ती घरी गेली होती ना नितीशच्या. पुढे मागे बघणार नाही. समोर आला तर दोन लगावून देईन म्हणाली. सुमनकाकीने हात जोडून क्षमा मागितली. डोळ्याला पदर लावला. सोनालीची आई गप्प झाली. "&lt;br /&gt;"बरं झालं सांगितलंस. आजपासून मी त्या घाणेरड्याला हाय सुद्धा म्हणणार नाही. आपण सावध राहायला हवं. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;एस. एस. सी. ला आम्ही एकाच वर्षी होतो. स्वतःच्या रिझल्टबरोबरच नितीशचे काय होईल हे सुप्त कुतूहलही मनात होते. परीक्षेत त्याला ७७% पडले. याचे पुढे कसे होणार याची काळजी करणार्‍या सर्वांच्या तोंडाला कुलुपं लागली. सुरेशकाका आणि सुमनकाकींनी आनंदाने सर्वांना पेढे वाटले. मार्क चांगले असले तरी उत्तम नव्हते परंतु बी. कॉम केले की आता वेगवेगळे कंप्युटर कोर्सेस करता येतात, एम. बी. ए किंवा सी. ए. करता येतं असं नितीशला पटवून सुरेशकाकांनी त्याला कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेऊन दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॉलेजला असताना सिगरेट ओढत, येणार्‍या जाणार्‍या पोरींच्या उभारीवरून आशाळभूत नजर फिरवणारा नितीश कधीतरी स्टेशनावर दिसायचा. कधी समोर आलाच तर त्याचे ते बेरकी हास्य डोक्याला त्रास देऊन जायचे. एक दिवस चौथ्या मजल्यावरचे काळे काका सांगत आले की त्यांनी नितीशला बाजारातल्या डान्सबारमधून तर्र अवस्थेत बाहेर येताना पाहिले. त्यानंतर कळले की ही गोष्ट इमारतीतल्या इतर काही मोठ्या मुलांना आधीच ठाऊक होती. १८व्या-१९व्या वर्षी त्याला हे सर्व करण्यास पैसे आणि प्रोत्साहन कसे मिळत होते कळण्यास मार्ग नव्हता. काळेकाकांनी ही गोष्ट तत्परतेने सुरेशकाकांच्या कानी घातली तसे सुरेशकाका हबकलेच. आपल्या मुलाचे गुण या आधी त्यांना कधी जाणवलेच का नाही हे गूढ होते. इमारतीतल्या लोकांच्या मते सुमनकाकींनी सुरेशकाकांना घरात काय चालते याचा कधी थांगपत्ताही लागू दिला नव्हता. त्याला पॉकेटमनीसाठी मोठी रक्कम हातात देणार्‍या, वेळोवेळी त्याला पाठीशी घालणार्‍या, त्याच्याविषयी येणार्‍या तक्रारींवर पांघरूण घालणार्‍या सुमनकाकीच होत्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या रात्री सुरेशकाकांच्या घरात मोठमोठ्याने आवाज येत होते. सुमनकाकींच्या रडण्याचा, नितीशच्या आणि सुरेशकाकांच्या भांडणाचा. आम्हाला अगदी दुसर्‍या मजल्यापर्यंत ऐकू येत होते. शेवटी इमारतीतील कुणीतरी मध्ये पडलं. सुरेशकाकांनी या प्रकरणानंतर नितीशच्या वागणुकीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तो कधी घरी येतो, कधी बाहेर पडतो, त्याची प्रगती, पॉकेटमनी यावर ते जातीने लक्ष देऊ लागले. परिस्थिती निवळल्यासारखी झाली. सर्व काही सुरळीत सुरू झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नितीशच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी सुरेशकाका रिटायर झाले पण लगेचच त्यांना फॉरेन बँकेत अ‍ॅडवायझर म्हणून बोलावणे आले. तिथे त्यांनी नितीशसाठी शब्द टाकला; तो नाकारला जाणे केवळ अशक्य होते. ग्रॅज्युएट झाल्याक्षणी नितीशला उत्तम पगाराची नोकरी हातात पडली. "चला! गंगेत घोडं न्हालं. आता हा मुलगा बिझी राहिल, चांगल्या संगतीत राहिल. हे असले उद्योग बरीच पोरे करतात या वयात पण जबाबदारीची जाणीव झाली की येतात सगळे लायनीवर." असे म्हणून सर्वांनी सुटकेचे निश्वास सोडले. पण नाही..तसं काही घडायचं नव्हतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नितीश आता स्वतंत्र झाला होता. पॉकेटमनीसाठी त्याला वडिलांवर अवलंबून राहावं लागत नव्हतं. लवकरच रोजचं पिणं, नशेत तर्र होऊन घरी येणं, डान्सबार, सिगरेटी सर्व पूर्ववत सुरू झालं. सक्काळी सातला इमारती समोरच्या पानवाल्याने शटर वर केलं की त्याचे पहिले गिर्‍हाइक नितीश असे. "याने कोणतंही व्यसन बाकी ठेवलेलं नाही." असं लोक म्हणू लागले. काही काळाने या सर्वाच्या सोबतीला नितीशची कोणी एक बाई आहे. तिच्याकडे तो नियमित जातो अशी बातमीही कानावर पडली. बातमी खरी का खोटी हे माहित नाही पण सुरेशकाकांच्या घरातून दररोज भांडणाचे आणि रडारडीचे आवाज ऐकू येत. आता शेजारपाजारचेही त्रासले होते. सुरेशकाका आणि सुमनकाकींची पुण्याई मोठी म्हणून सगळे गप्प होते एवढेच. अशातच एका भांडणानंतर अ‍ॅम्ब्युलन्सच्या आवाजाने सर्व चकीत झाले. सुरेशकाकांना हृदयविकाराचा झटका आला होता. इमारतीतील सर्वांनी वेळीच धावाधाव केली म्हणून प्रसंग निभावून नेता आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिवसेंदिवस नितीश अधिकच शिरजोर होत चालला होता. काकांच्या आजारपणामुळे धाक थोडा कमी झाला होता आणि पंचविशीच्या मुलाला आणखी किती धाकात ठेवणार होते काका? ते हॉस्पिटलमधून घरी आले होते. काठी घेऊन घरातल्या घरात, बाहेर अंगणात फिरत, आल्या गेलेल्याशी चार शब्द बोलत पण काका मनाने खचले होते. काकी तशाही नितीशला काही बोलत नसत. पुत्रप्रेमात गाढ बुडलेल्या काकींनी डोळ्यांवर झापडे ओढून घ्यायचेच ठरवले होते. या सर्व मनःस्तापात आपले काही खरे नाही हे काकांना कळून चुकले होते. त्यांनी तातडीने एक शहाणपणाची गोष्ट केली. आपले मृत्यूपत्र तयार केले. घर,ठेवी, विमा आणि जी काही संपत्ती होती ती आपल्या पश्चात केवळ आपल्या बायकोची आहे असे लिहून ठेवले. नितीशला हे कळल्यावर घरातला ताण आणखी वाढला. त्याची गलिच्छ शिवीगाळ नेहमीची झाली होती पण आता त्याने काका-काकींवर हात उगारणेही सुरु केले होते. अशाच एका भांडणात सुरेशकाका त्राग्याने बोलून गेले -&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तू पोटचा मुलगा असतास तर असा नसता वागलास पण वळचणीचे पाणी वळचणीला जायचे. आमचे रक्त असते तर असे झाले नसते." सुरेशकाकांच्या बोलण्याला फारसा अर्थ नव्हता. पोटची पोरंही बिघडतात, वाया जातात हे त्यांना पुरेपुर माहित होते पण त्राग्यातून शब्द निघून गेले. नितीश नेमका कुणाचा मुलगा आहे याची कल्पना त्यांना होती का याची कल्पना नाही पण आपण आपल्या आईवडिलांचे पोटचे मूल नाही ही बातमी नितीशला आणखीनच वेडेपिसे करणारी ठरली. त्याने साफ ताळतंत्र सोडून दिले. कोणी म्हणायचे तो कधी बँकेत जातो, कधी जात नाही. त्याची फोरासरोडला कुणी बाई आहे. तिच्याकडेच पडलेला असतो. एक दोनदा त्याला इमारतीतल्या लोकांनी रस्त्यात दारू पिऊन अक्षरशः लोळताना पाहिला आणि घरी आणून सोडला. या सर्वाचा परिणाम व्हायचा तो झाला. काकांना आलेला पुढला झटका प्राणघातक ठरला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरात आता सुमनकाकी आणि नितीश दोघेच होते. नितीशला पगाराचे पैसे पुरे पडत नसत. तो काकींकडे पैशांसाठी तगादा लावत असे. त्याची नोकरीही सुटली होती. कोणी म्हणत त्याने बँकेत अफरातफर केली होती. रक्कम खूप मोठी नव्हती आणि सुरेशकाकांच्या पुण्याईमुळे बँकेने ते प्रकरण कसेबसे गुंडाळले होते आणि नितीशला नोकरीतून कमी केले. नोकरी गेली तरी नितीशचे शौक कमी झाले नव्हते; अंगात कली तर फार पूर्वीच घुसला होता. तर्र होऊन, झोकांड्या खाणार्‍या नितीशपासून लोक चार हात दूर राहत. त्याला स्वतःचे मित्र-मैत्रिणी असे कधी नव्हतेच त्यामुळे त्याला सांभाळेल, समजावेल असे कोणी उरलेच नव्हते. सुमनकाकींना आता तो पैशांसाठी धमकावत असे. भांडत असे, मारहाणही करत असे पण काकींनी स्वतःहून कधी तोंड उघडून लोकांकडे तक्रारच केली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक दिवस मात्र बांध फुटला. मध्यरात्री घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या सुमनकाकींनी शेजार्‍यांची ठणाठणा बेल वाजवली. शेजार्‍यांनी दार उघडलं तसं त्या झटकन आत शिरल्या आणि धाय मोकलून रडू लागल्या. नितीश गेले काही दिवस त्यांच्या मागे लागला होता की हे घर विकून टाक आणि पैसे देऊन मला मोकळा कर. काकींनी नकार दिल्यावर त्यांना मारहाण करत होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी काकी कसेबसे हे सर्व सहन करत होत्या. मुकाट्याने सर्व सहन करत होत्या. त्या रात्री उशीरापर्यंत नितीश घरी आला नव्हता. रात्री साडे अकराच्या सुमारास तर्र होऊन परतला तसा काकींनी त्याला जेवणाबद्दल विचारले. त्याने नकार दिला म्हणून काकी जाऊन आपल्या खोलीत झोपल्या. मध्यरात्री उलटून गेली असावी. काकींना झोप लागली होती. अचानक नितीशने काकींच्या बेडरूममध्ये घुसून त्यांच्या नाकातोंडावर उशी दाबली. काकींच्या कृश शरीरात कसे कोणजाणे पण नशेत लडखडणार्‍या नितीशला धक्का देण्याचे बळ आले. त्या जोराचा हिसडा देऊन पळाल्या आणि थेट शेजारच्यांकडे पोहोचल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रकरण आता अतिशय गंभीर झालं होतं. पांढरपेशा मध्यमवर्गीय फ्लॅट संस्कृतीत लोक शेजार टिकवून असले तरी एक विशिष्ट मर्यादा राखून असतात. फ्लॅटच्या बंद दारांचा आडोसा अनेक गुपिते लपवून ठेवतो. काकींच्या घरातले हे गुपीत आता बाहेर पडले होते. काकींनी यापुढे नितीशसोबत राहणे धोक्याचे होते. इमारतीतल्या लोकांनी आता एकत्र व्हायचे ठरवले आणि पोलिसांत तक्रार केली. त्या रात्रीच नितीशला अटक झाली, पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुलांवर केलेलं प्रेम इतकं घट्ट असतं की तिथेही ती माऊली पोलिसांना डोळ्यांत पाणी आणून इन्स्पेक्टरना विनंती करत होती, "त्याला मारू नका हां, त्याला उपाशी ठेवू नका हां. तो सुधारेल, त्याला समजून घ्या."&lt;br /&gt;&lt;br /&gt;नितीशला अटक झाली आणि एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. नितीशने सुमनकाकींना कफल्लक करून सोडले होते. नितीश जबरदस्तीने त्यांच्या सह्या चेकवर घेई. त्यांची फिक्स्ड डिपॉझिट्स त्याने तोडायला लावली होती. दागिने नेऊन कधीच्या कधी विकले होते. सर्व हिशेब केला तेव्हा काकींच्या नावावर घर आणि केवळ ८०० रुपये शिल्लक होते. आता काय करायचे? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. काकींची जबाबदारी कोण घेणार? त्यांचा मोठा भाऊ होता पण तोच वृद्ध होता आणि आपल्या मुलांकडे राहत होता. घर विकण्यावाचून पर्याय नव्हता. इमारतीतील लोकांनी त्यांच्या भावाला बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून घर विकून टाकण्याचा निर्णय घेतला. काकींची काळजी घेतली जाईल अशा एका वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले आणि घर विकून मिळालेले पैसे त्यांच्या खर्चासाठी ठेवण्यात आले. काकींच्या इच्छेनुसार पैशांचा काही हिस्सा नितीशलाही देण्यात आला. अनेकांनी या गोष्टीला विरोध केला होता पण काकी बधल्या नाहीत. त्यांनी नितीशवर केसही केली नव्हती त्यामु़ळे नितीश लवकरच बाहेर आला. त्याचा हिस्सा त्याला देऊन लोकांनी त्याला मोकळा केला. काकींची रवानगी कोठे होत आहे याची त्याला खबर लागू दिली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या घटनेनंतर मिळालेले पैसे घेऊन नितीशने तोंड कुठे काळे केले ते कळले नाही. कोणी म्हणत त्याने कुठल्याशा चाळीत जागा घेतली आहे. कुणी म्हणत तो त्या बाईकडे फोरासरोडला राहतो. कालांतराने लोकांना नायक कुटुंबातील सनसनाटी गोष्टींचा विसर पडला. ८-१० महिने निघून गेले. अचानक नितीश पुन्हा इमारतीच्या आसपास घुटमळताना दिसू लागला. रया गेली होती. घाणेरडा झाला होता. त्याला कसल्यातरी गुप्त रोगांची लागण झाली आहे असे लोक म्हणत. अनेक दिवसांत पाण्याचा स्पर्श नसलेले घाणेरडे शरीर, मळकटलेले फाटके कपडे आणि पायाला बांधलेले बँडेज घेऊन तो भ्रमिष्टागत भटकताना दिसे. त्याच्या पायाला गँगरिन झाले आहे असे कोणीतरी म्हणे. दोन बोटे कापली होती. कधी इमारतीतील कुणी दिसले तर त्यांच्याकडे तो पैसे मागत असे. लोकांच्या मनात तिरस्कार आणि करूणा एकत्रच दाटून येत असे. कधीतरी कुणी पैसे देई तर कधीतरी त्याला हाकलून लावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोपर्‍यावरच्या बंगलीतले दिक्षितकाका एके दिवशी माझ्या वडिलांना म्हणाले - "तो तुमच्या इमारतीतला नायकांचा मुलगा हो, तो रात्रीचा आमच्या अंगणात घुसून आंब्याच्या झाडाखाली झोपतो. हे सगळे दुर्दैवाचे दशावतार बघायच्या आधी नायक गेले ते बरे झाले म्हणायचे. मी एकदा दोनदा हटकला त्याला पण देतो झोपायला कधीतरी. चांगल्या घरचा मुलगा ना म्हणून वाईट वाटतं पण आमच्या सूनबाईला आवडत नाही ते. जांघेत खाजवत असतो सारखा. नाती ११-१२ वर्षांच्या झाल्यात. त्यांच्यावर याची नजर नको असं म्हणते. तिचंही बरोबर आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;दादर स्टेशनाला गाडी लागली तशी माझ्या विचारांची शृंखला गळून पडली. 'माणूस तरी किती नको ते ताप डोक्याला लावून घेतो.' एक सुस्कारा सोडून मी थांबत आलेल्या गाडीतून उडी मारली आणि जिन्याच्या दिशेने धाव घेतली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;***&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखाद दोन महिने उलटून गेले असतील वरल्या घटनेला. कधीतरी धावपळीत स्टेशनाकडे येता-जाताना नितीश पारापाशी बसलेला दिसायचा. कधी नाही दिसायचा. मनाने त्याची नोंद ठेवणे सोडून दिले होते. नकोशा असणार्‍या तिर्‍हाईत गोष्टींकडे आपण आपसूक दुर्लक्ष करू लागतो तसेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज वेळेवर ऑफिसात येऊन टेकले होते. सकाळीच डेस्कवरला फोन वाजला तसा मी रिसिव्हर कानाला लावला.&lt;br /&gt;"आहे का गं वेळ ५-१० मिनिटं? मोबाईलवर फोन करत होते पण लागला नाही म्हणून इथे करून पाहिला." नम्रताचा आवाज कानावर आला.&lt;br /&gt;"आहे ना. सेलफोन सायलंटवर आहे बहुधा. इतकं काय अर्जंट काम काढलंस?"&lt;br /&gt;"अगं, अर्जंट असं काही नाही पण मनाला रुखरुख लागली होती म्हणून तुझ्याशी बोलावसं वाटलं. नितीश गेला काल."&lt;br /&gt;"गेला म्हणजे?" नितीश प्रकरणाची परिणीती अशीच होईल याची कल्पना होती तरीही अचानक आलेल्या बातमीने आश्चर्य वाटायचे ते वाटलेच.&lt;br /&gt;"अगं, काल रात्री आम्ही जेवायला गेलो होतो. ऋषीचा वाढदिवस होता ना. परतताना रात्रीचे १० वाजून गेले होते. पारापाशी गर्दी जमली होती म्हणून विचारलं तर कळलं की नितीशची बॉडी होती. म्युनिसिपल्टीची गाडी आली होती. बे..." नम्रताने आवंढा गिळला. "बेवारशी प्रेतांना उचलून न्यायला येते ना."&lt;br /&gt;"अरेरे!" मला पुढे काय बोलावे ते कळेना. काळजात सूक्ष्म कळ उमटली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुलं बिघडतात. एका विशिष्ट वयांत अनेक उद्योग करून पाहतात. त्यातली बरीचशी मुलं चुकलेली वाट सुधारून पुन्हा मार्गी लागतात. कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांची मदत घेतात किंवा एके दिवशी काहीतरी चुकतंय ही जाणीव झाल्याने स्वतःच मार्ग बदलतात. मध्यमवर्गी पांढरपेशा वातावरणात माणसं एकमेकांना दबून राहतात. अशा परिस्थितीत सर्व बंधनं झुगारून स्वतःला गर्तेत झोकून देणारे विरळाच. सोबत वाढलेला, खेळलेला, शिकलेला, नंतर निगरगट्ट झालेला, व्यसनी आणि शेवटी भ्रमिष्टागत भीक मागत फिरणारा नितीश डोळ्यासमोरून पुन्हा तरळून गेला. कधीकधी एखादी नकोशी व्यक्तीसुद्धा हुरहुर लावून जाते खरी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;***&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-2956868265007165398?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/2956868265007165398/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=2956868265007165398' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/2956868265007165398'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/2956868265007165398'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='चुकलेली वाट'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-5335700910119806467</id><published>2010-11-07T13:35:00.000-08:00</published><updated>2010-11-07T13:40:10.177-08:00</updated><title type='text'>पशू</title><content type='html'>हे घर भाड्याने घेतलं तेव्हा सुहासी थोडीशी कुरबुरत होती. या बायकांना प्रत्येक गोष्टीत खोड काढायची सवय का असते हेच कळत नाही. मनातून घर तिलाही आवडलं होतं पण उगीच काहीतरी लहानसहान खोड्या काढत बसली होती. घराचं तोंड पूर्वेला नाही, विहीरीवर जाळी नाही, स्वयंपाकघराचा ओटा अरुंद आहे आणि काय ना काय. तिला बराच वेळ समजावलं तेव्हा एकदा घर पसंत आहे म्हणाली. आज विचार केला तर वाटतं की उगीच तिला भरीला पाडलं मी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुलाच्या बांधकामाचं प्रोजेक्ट मिळालं होतं. त्यासोबत आणखीही काही बांधकामे मिळणार होती. किमान वर्षभर तरी काम चालणार होतं. सुहासी नोकरी करत नव्हतीच. वर्षभर स्वतंत्र राहायला मिळणार याचा आनंद दोघांनाही होता. माझ्या बांधकामापासून मैलभरावरच हे घर मिळत होतं. घराचा मालक पुण्याला राहत होता. तो मूळचा या इथलाच. त्याची वडिलोपार्जित जमीन होती. त्यावर त्याने घर बांधले. सरकारी पाहुणे इथे बरेच वेळा मुक्काम ठोकून असत. इथे येण्यापूर्वी मी त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटलो. घर भाड्याने द्यायचे असले तर त्याला घरात लग्न झालेलं जोडपं हवे होते त्यामुळे सौदा झटक्यात ठरला. घर तसं थोडंसं एकाकी होतं पण अगदीच काही जंगलात नव्हतं. नवी वस्ती बनत होती म्हणून आजूबाजूला थोडी मोकळी जागा होती. हाकेच्या अंतरावर इतर घरं होती. मुख्य म्हणजे साईटपासून घर जवळ होतं आणि दिमतीला बाइक होतीच की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;घर अगदी टुमदार होतं. पांढर्‍या शुभ्र भीतींवर लालचुटुक कौले, घराच्या बाहेर थोडंसं अंगण, प्रशस्त ओसरी, आत बैठकीची खोली, दोन बेडरूम्स आणि स्वयंपाकघर. हवेशीर आणि प्रसन्न. आम्हा दोघांना पुरून उरेल असं घर होतं. मुख्य दरवाजा बैठकीच्या खोलीत उघडत होता आणि स्वयंपाकघरातून मागच्या अंगणात जायला दरवाजा होता. अंगणाला पुढून मागून सुरेख लाकडी कुंपण होतं. मागच्या कुंपणाला लहानसं फाटकही होतं; माळावर जाण्यासाठी. मागच्या अंगणामागे विस्तीर्ण पसरलेला माळ होता. मोकळीच मोकळी जागा. कुंपणापासून काही अंतरावर उंचचउंच वाढलेल्या गवताचा लांबलचक पट्टा होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'तो माळ वापरात नाही; ओसाड आहे' असं रंगराव म्हणाला होता. रंगराव म्हणजे धरणावरला मुकादम. त्यानेच गावातली ४-५ घरं दाखवली होती मला. त्याला गावची बरीच माहिती होती; काही हवं नको झालं तर मी त्यालाच विचारत असे. 'त्या वाढलेल्या गवतात कधीतरी कोल्ही-कुत्री निघतात. उगीच फिरायच्या निमित्ताने फार आतवर घुसू नका, एखादं जनावर बाहेर येऊन पोटरीचा चावा घ्यायचं.' असं सांगून गेला होता. तशी अडचण काही नव्हती. माळावर फिरण्यासारखं काही नव्हतंच. घरासभोवतीच्या भक्कम लाकडी कुंपणातून कुणी कुत्रं अंगणात घुसण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून मी दुर्लक्ष केलं. माणसाला एखादी गोष्ट हवी असली की तो तिच्याबाबतीत फार खोलवर जात नाही. मला काम सुरू करायचं होतं, सुहासीला इथे आणायचं होतं, घर लावायचं होतं. आता मात्र वाटतं की मी आणखी चौकशी करायला हवी होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही आता या घरात राहायला येऊन आठवडा उलटला होता. घराची लावालावी, थोडंसं प्लंबिंगचं, कुठे थोडंफार डागडुजीचं काम यातच सगळा आठवडा व्यस्त गेला. सुहासीला टापटीप, स्वच्छता यांची भारी आवड. घर तिने मस्त सजवलं होतं. आठवडाभर गावातल्याच खानावळीतून डबा आणत होतो. आता स्वयंपाकघर लागलं होतं. रविवारी आम्ही दोघांनी मस्त आराम केला. बाजारहाट केली आणि मी सुहासीला गावात, नदीवर फिरवूनही आणली. तिचाही मूड मस्त लागला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बरं झालं नै! वर्षभर सुट्टी साजरी करणार आपण असं वाटतं आहे. " ती उत्साहाने म्हणाली.&lt;br /&gt;"बघ हं! कंटाळशील लवकरच. मग म्हणशील कुठे या आडगावात येऊन पडलो. "&lt;br /&gt;"अगदीच काही आडगाव नाहीये हं! आपण राहतो तिथे वस्ती अद्याप नाही एवढंच. अरे पण तू आहेस ना, पुरा माझ्या ताब्यात. आणखी कोण पाहिजे? " ती खट्याळ हसत म्हणाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संध्याकाळी आम्ही बाहेरच जेवलो आणि मनसोक्त गप्पा मारल्या. आमच्या लग्नाला तीन वर्षे उलटली होती पण अद्याप नवलाई गेलेली नव्हती. सुहासीचा शांत, नीटनेटका स्वभाव मला आजही हवाहवासा वाटे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोमवारी सकाळी मी साईटवर निघालो तेव्हा सुहासी आंघोळपांघोळ आटोपून स्वयंपाकाच्या तयारीलाही लागली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ए तू बारा वाजेपर्यंत ये हं जेवायला! उशीर करू नकोस. तुझ्या आवडीचं वांग्याचं भरीत बनवते आहे. " तिचं ते लाडिक बोलणं कानावर पडलं आणि उंबरठ्यातून बाहेर पडणारा पाय थबकला.&lt;br /&gt;"जाऊच नकोस असं म्हण. हा बघ मी इथेच थांबतो की नाही ते. " मी हसून म्हटलं तशी ती तरातरा दारात आली आणि मला वेडावून म्हणाली, "निघ हं आता, नाहीतर रंगराव घरापर्यंत यायचा बोलवायला. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुपारी वेळेवर मी निघणारच होतो पण अचानक काही काम निघालं. सिमेंटच्या गोणी येऊन पडल्या त्याच्या पावत्यांवर सह्या हव्या होत्या. मला बाराच्या सुमारास निघताच येईना. घरातला फोन अद्याप सुरू झाला नव्हता. सुहासीला फोन करून सांगावं की 'तू जेवून घे' तर ते शक्य नव्हतं. मी मनातून वैतागलो पण हे काम हातावेगळं केल्याशिवाय निघणं बरं दिसत नव्हतं. दोनच्या सुमारास मी मोकळा झालो तशी धावतच जाऊन बाइक काढली. ऊन मी म्हणत होतं. मी सुसाट बाइक सोडली आणि एकदाचा घरी पोहोचलो. आत जाऊन आता बोलणी ऐकून घ्यायची आहेत अशी मनाची तयारी करून मी दार उघडलं. टळटळीत उन्हातून एकदम आत शिरल्यावर अंधारून आल्यासारखं वाटलं. मी डोळे किलकिले केले. आत सामसूम होती. घरात माणूस असल्याची अजिबात चाहूल लागत नव्हती. 'बाईसाहेब जाम वैतागलेल्या असाव्यात.' मी मनात म्हटलं आणि दबकतच आत गेलो. आधी बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. न जाणो, खाऊनपिऊन बायकोने मस्त ताणून दिलेली असायची आणि मी आपला उगीच हवालदिल. बेडरूममध्ये सुहासी नव्हती. आता राहिलं स्वयंपाकघर. मी स्वयंपाकघरात घुसलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वयंपाकघरातली खिडकी उघडी होती आणि खिडकीपाशी सुहासी स्तब्ध उभी होती. अगदी पुतळ्यासारखी. मी मागे उभा आहे याची किंचितही जाणीव तिला झाली नव्हती. कुतूहलाने ती खिडकीबाहेर बघत होती. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याने तिच्या बटा तेवढ्या हलत होत्या. फार सुरेख दिसत होती सुहासी. तिच्याकडे पाहिलं की मला नेहमी समाधान वाटे. सरळ नाक, नाजूक जिवणी, पाणीदार डोळे. खांद्यावर रुळणारे स्टाइलिश कापलेले केस आणि नजरेत भरणारा बांधा. या सर्वांत सुहासीचे डोळे मला फार आवडत. लहान मुलांसारखे टपोरे आणि निरागस. तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच डोळ्यांत माझा जीव गुंतला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सुहासी", मी तिच्या खांद्यावर हात टाकला तशी ती मागे वळली.&lt;br /&gt;"अरेच्चा! तू कधी आलास? " ती साफ गोंधळली होती. "चल जेवायला बसूया. " असे म्हणून तिने खिडकी बंद केली आणि ताटे काढली. जेवणाची वेळ टळून गेली आहे, दुपारचे दोन वाजून गेले आहेत याचा मागमूसही तिच्या तोंडावर नव्हता. शेवटी मीच म्हणालो.&lt;br /&gt;"सॉरी, अगं वेळेवर येताच आलं नाही. बराच उशीर झाला. "&lt;br /&gt;"उशीर झाला? " सुहासी आश्चर्याने पुटपुटली आणि तिने घड्याळाकडे नजर टाकली. "अय्या! दोन वाजून गेले. मला कळलंच नाही वेळ कुठे गेला ते. " ती चकीत झाली होती.&lt;br /&gt;"का गं? असं काय करत होतीस की तुला वेळेचं भान राहिलं नाही? "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काही नाही रे. स्वयंपाक, साफसफाई आटोपून तुझी वाट बघत बसले होते. वेळ जाईना म्हणून या खिडकीतून सहजच बाहेर बघत होते. ते मागच्या माळावरचं गवत वाऱ्यावर संथ डुलत होतं. एका लयीत. एका नादात. त्याच्या त्या हिरव्यागार रंगात सूर्याचे सोनेरी रंग मिसळले होते आणि वार्‍याने होणारी पात्यांची सळसळ ना अरे इथपर्यंत, अगदी घरात ऐकू येत होती. सर्व भानच विसरूनच गेले मी त्याच्याकडे बघताना. " ती भारावल्यासारखी बोलत होती. तिच्या आवाजातला तो बदल मला जाणवला होता खरा पण त्यावेळेस खटकला का नाही ते कळत नाही. खटकला असता तर आज ही पाळी आमच्यावर आली नसती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अगं, शहरातल्या माणसांना हा असा निसर्ग कुठे बघायला मिळतो? लक्की यू! मला तर इथे येऊनही मिळत नाहीये. तेच सिमेंट, रेती, कॉंक्रिट बघतो मी दिवसभर." मी हसून म्हटलं आणि भरभर जेवायला सुरुवात केली. मला साईटवर परतायचं होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर अनेकदा मी दुपारचा जेवायला घरी यायचो तेव्हा सुहासीला स्वयंपाकघराच्या खिडकीत, नाहीतर दारात उभी पाहायचो. ती टक लावून त्या गवताकडे बघत असायची. कित्येकदा मी तिच्या बाजूला जाऊन उभा राहिलो तेव्हा जाणवलं होतं की तिच्या डोळ्यांची पापणीही हलत नसे. असं काय आहे त्या गवतात हा प्रश्न मला पडत असे मात्र मी खोलात जायचं मनावर घेतलं नाही. का केलं मी असं? ...बेफिकीर होतो मी. संकटं वगैरे आपल्या चार हात लांबून निघून जातील या गैरसमजूतीत जगत होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संध्याकाळी माझ्या घरी पोहोचण्याच्या वेळेवर घरकाम करायला पद्मा आलेली असे. आमच्या साईटवरच्या हणम्याची बायको. संध्याकाळी सुहासी काम आटोपत तिच्या मागेमागेच असे. निदान त्यावेळी तरी ती त्या गवतात रमलेली नाही याचं मला बरं वाटे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच एके दिवशी संध्याकाळी मला साईटवरून यायला थोडा उशीर झाला. घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. मी अंगणात बाइक लावली. घरात मिट्ट काळोख होता. 'कुठे गेली असेल सुहासी यावेळेस?' असा विचार करतच मी घराचा दरवाजा उघडला आणि आतला दिवा लावला. प्रकाशाने संपूर्ण खोली उजळून निघाली. माझी पावलं तडक स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. माझ्या अपेक्षेप्रमाणेच स्वयंपाकघरातल्या काळोखात सुहासी खिडकीसमोर उभी होती. तशीच; दुपारी उभी असे अगदी तश्शीच. स्तब्ध. पुतळ्यासारखी. आजूबाजूच्या जगाला विसरून गेलेली. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा चेहरा मी निरखत होतो. कोड्यात पडलेला. कुतूहलाने खिडकीबाहेर माळाकडे पाहणारा. मी घाईने लाइट लावला तशी ती एकदम दचकली. "तू कधी आलास? "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"काय बघतेस सुहासी? " दुपारी मी जेवून साईटवर परतायच्या घाईत असे पण आज या प्रश्नाचा छडा लावायला बरी वेळ सापडली होती.&lt;br /&gt;"काही नाही रे. ते गवत चंद्रप्रकाशात इतकं सुरेख दिसत होतं की नजरच निघत नव्हती. बघत राहावसं वाटतं त्या गवताकडे. त्या गवताचे आणि माझे जणू काही ऋणानुबंध आहेत. मी ना एकदा त्या गवतापलीकडे जाऊन बघणार आहे. " ती झोपेत बोलणार्‍या माणसाप्रमाणे बोलत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी तिच्याकडे निरखून पाहिले. गेले काही दिवस सुहासीत काहीतरी बदल होतोय अशी शंका मला येऊ लागली होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. थोडीशी खंगल्यासारखीही वाटत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुला रंगरावने काय सांगितलं माहित आहे ना. तिथे उगीच रानटी कुत्री वगैरे असायची. नको ते स्टंट करू नकोस. उगीच अंगाशी नको यायला. हे गाव अजूनही आपल्याला अपरिचित आहे." मी तिला खडसावलंच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अरे, आपण इतके दिवस इथे राहतो. तू कधी कुठल्या कुत्र्याचं भुंकणं ऐकलं आहेस का? मी तर दिवसभर घरात असते. या खिडकीशी उभी असते. गवताची सळसळही मला ऐकू येते पण कधी त्या माळरानावर कुत्र्यांना पाहिलेलं नाही की त्यांचं भुंकणं ऐकलेलं नाही. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हे बघ! तुला माझं ऐकायचं नसेल तर तसं सांग. तुझ्याकडे मोबाईलही नाही. त्या माळावर जाऊन कुठे तरी हरवू नकोस म्हणजे झालं. " मी तिला थोड्या तुसडेपणाने म्हटले तशी ती हिरमुसली झाली. जेवून झोपायला जाईपर्यंत ती माझ्याशी फारशी बोलली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री सुहासी माझ्याकडे पाठ करूनच झोपली होती. मला वाईट वाटलं. इथे परक्या गावात आम्ही दोघेच एकमेकांचे सोबती आणि आता उगीच आमच्यातला संवाद बंद झाला. मी तिला जवळ ओढली आणि म्हणालो, "येत्या रविवारी जाऊ आपण त्या माळरानाच्या दिशेने. चक्कर मारून येऊ. एक दांडुका घेऊन जाऊ बरोबर. आलंच कुत्रं तर घालू पेकाटात. " सुहासी खुदकन हसली. "हो हो नक्की जाऊ. " असं म्हणून मला आणखीनच खेटली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी दुपारी जेवायला मी घरी आलो तर घरात पुन्हा सामसूम होती. आपोआप माझी पावलं स्वयंपाकघराकडे वळली. खिडकीपाशी दररोज उभी असणारी सुहासी आता मला सरावाची झाली होती. त्याच अपेक्षेने मी स्वयंपाकघरात पाय टाकला पण त्या दिवशी स्वयंपाकघर मोकळं होतं. मी बेडरूमकडे गेलो; तिथेही कुणी नव्हते मग दुसर्‍या बेडरूमकडे. नाही, सुहासीचा पत्ता नव्हता. ती घरात नव्हतीच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला कळेना ही यावेळेस कुठे गेली असावी? मी पुन्हा स्वयंपाकघराकडे वळलो. स्वयंपाकघराचा दरवाजा ओढून घेतलेला होता पण खिडकी उघडी होती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. मागल्या कुंपणाचे फाटक उघडे होते. त्या बाहेर विस्तीर्ण माळ पसरला होता. माळरानावरचं उंचच उंच वाढलेलं गवत वाऱ्यावर फेर धरून डोलत होतं. संथ; एका लयीत. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात हिरवीगार पाती चमचमत होती. मी स्तब्ध झालो. डोळ्यांच्या कक्षेत फक्त डोलणारं, संथ हेलकावे खाणारं गवत मावत होतं. त्याची ती मंद सळसळ कानावर पडत होती. अचानक माळरान रुंदावल्यासारखं भासलं. गवतही आणखीच उंच होत होतं. माळरान आता हळूहळू माझ्याजवळ सरकत होतं. जवळ येत होतं. त्याचा विस्तार पूर्वीपेक्षा वाढल्यासारखा वाटत होता. चकीत करणारे क्षण होते ते. मी आणि माळावरचं गवत सोडून आसमंतात दुसरं काहीच नाही असा विचार मनाला चाटून गेला. माझे डोळे त्या दृश्यावर खिळून होते... तिथे जायला हवं एक दिवस. त्या गवतात... ते गवत बोलवत होतं. एवढ्यात गवतात काहीतरी हललं आणि डोलणारं गवत एकदम स्तब्ध झाल्यासारखं वाटलं. माळाचा आकारही पूर्ववत झाला. माझी तंद्री मोडली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या गवतातून सुहासी धडपडत बाहेर पडत होती. विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे, घामाघूम शरीर; सुहासीचा हा अवतार बघून मी थक्क झालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी तिला पाहून चटकन मागचं दार उघडलं आणि बाहेर गेलो. ती कुंपण बंद करून आत येत होती. तिला दम लागला होता आणि चेहर्‍यावर भीतीचे सावट दिसत होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सुहासी? काय झालं? " काळजीने मी तिला विचारलं. ती धापा टाकत होती. तिच्या कुडत्यावर, सलवारवर केसांवर गवताचे तण चिकटले होते. पायांना चिखल लागला होता. काहीही न बोलता ती तरातरा घरात शिरली. मी तिच्यामागून घरात शिरलो तेव्हा दुपारचे तीनचे ठोके पडत होते. मी जेवायला घरी आल्यापासून इतका वेळ गेला होता याची जाणीव मला आत्ता होत होती. काहीतरी होतं त्या माळरानावर जे आधी सुहासीला खिळवून ठेवत होतं आणि आज मलाही त्याची प्रचिती आली होती. तो माळ संमोहन टाकत होता, आम्हाला खेचून घेत होता. मी घाईने खिडकी आणि दरवाजा बंद केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सुहासी, काय झालं? "&lt;br /&gt;"काही नाही. आज राहावलं नाही म्हणून मी त्या गवतात घुसले आणि रस्ता चुकले. उंच आहे ते गवत भारी. इथून जाणवत नाही पण खरंच खूप उंच आहे. परत कसं यावं तेच कळेना. वाटच मिळेना. पुढल्या वेळेस काहीतरी खुणा घेऊन गेलं पाहिजे. " ती आता शांत दिसत होती. शांतपणे बोलत होती. मगाशी तिच्या डोळ्यांतली भीती नाहीशी झाली होती. जसं काही घडलंच नव्हतं. मी मात्र धास्तावलो होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हे बघ, तिथे पुन्हा जायची अजिबात गरज नाही. पुन्हा या खिडकीतही उभी राहू नकोस. तुझ्या डोक्यातले माळाचे विचार आधी काढून टाक. हा वेडेपणा पुरे झाला." मी आवाज चढवून म्हणालो. त्या खिडकीतून पाहिल्यावर मला जे जाणवलं होतं ते तिला सांगावं की नको असा विचार मनात आला. न जाणो जे मला भासलं होतं ते तिला भासत नसलं तर ती उगीच मला वेड्यात काढायची असा विचार करून मी गप्प बसलो पण या माळरानाबद्दल खोलात चौकशी करणं गरजेचं होतं. डोळ्यांसमोर रंगराव आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी साईटवर पुन्हा परतलो तर रंगराव गायब होता. कामावरल्या दोघांकडून कळलं की त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना भेटायला तो गावी गेला होता. दोन दिवसांनी परत येणार होता. पुलाचा प्लॅन घेऊन असिस्टंट इंजिनिअर येताना दिसला आणि मीही कामाच्या धांदलीत माळरानाची गोष्ट विसरून गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर गेले दोन दिवस मी घरी आलो तर सुहासी घरीच दिसली. ती नेहमीप्रमाणे खिडकीतही उभी नव्हती. मला मनात कुठेतरी खूप बरं वाटलं आणि तेवढीच काळजीही वाटत होती. का कुणास ठाऊक? सुहासी बदलली होती. तिचा चेहरा उतरलेला दिसे. बोलण्यात-वागण्यात उत्साह नव्हता. काहीतरी विचार करत एकटीच बसलेली असे. केस विंचरलेले नसत. कपडे टापटीप नसत. मी तिला कितींदा विचारलं की कसला विचार करतेस? पण ती उत्तर टाळत होती. 'रविवारी जायचं का माळावर आपण?' असं मी तिला मुद्दाम खोचकपणे विचारून पाहिलं पण तिने नकारार्थी मान हलवून वेळ मारून नेली. मला मनात बरंच वाटलं. निदान ते माळरानाचं भूत तिच्या मानगुटीवरून उतरलं हेच खूप होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन दिवसांनंतरची गोष्ट. मध्यरात्र उलटून गेली असावी. कसलंतरी भयंकर स्वप्न पडलं होतं. मी दचकून जागा झालो तेव्हा सुहासी माझ्या बाजूला नव्हती. ती पाणी प्यायला उठली असेल किंवा बाथरूमला गेली असेल या विचाराने मी गादीवरून उठलो नाही पण पुन्हा डोळा लागत नव्हता. थोडा वेळ गेला, सुहासीची चाहूल लागली नाही. मला अस्वस्थ वाटू लागलं; मी उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो. घराचा मागचा दरवाजा आणि कुंपणाचं फाटक दोन्ही सताड उघडे होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्रीच्या अंधारात माळ निळसर-करडा दिसत होता. आकाशात चंद्रावर ढगांनी गर्दी जमा केली होती. ढगांच्या आडून कुठेतरी चांदणी उगीच लुकलुकत होती. मी डोळे फाडून माळाकडे बघत होतो पण काहीच दिसत नव्हतं. काय करावं काही सुचेना. सुहासी पुन्हा त्या गवतात तर गेली नसेल... काय करायचं? रात्रीच्या वेळी असं माळावर... तिथे ती भटकी कुत्री असली तर? मला कुत्र्यांची भीती वाटते पण माझी बायको तिथे गेली आहे... एकटीच. विचार डोक्यात मावेनासे झाले होते. माझे पाय आपोआप माळाच्या दिशेने पडू लागले. मी दरवाजा ओलांडून मागच्या अंगणात पोहोचलो असेन नसेन तोच गवतात काहीतरी हललं. गवतातून सुहासी वाकून बाहेर पडत होती. मी धावत कुंपणापाशी गेलो. तिला दम लागला होता, श्वासही फुलला होता. अंगाला गवत चिकटलं होतं. मी तिचा हात पकडला आणि तिला खेचून घरात आणली. क्षणभर, तिच्या नजरेला माझी ओळख पटत नसावी असं मला वाटून गेलं. ही तिथे कुणाला भेटायला तर जात नसावी? कुणी प्रियकर तर नसावा? असा चुकार विचार माझ्या मनात आला आणि मलाच स्वतःची लाज वाटली. सुहासी अशी नाही. खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर. तिचं काहीतरी बिनसलं आहे, तिचं चित्त थार्‍यवर नाही आणि ती त्या गवतात गेली असावी हे कळल्यावरही मी तिचा नवरा असून तिला शोधायला तिच्यामागे गेलो नाही. मला अपराधी वाटलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सुहासी. रात्री उठून तू तिथे गेली होतीस? बरं आहे ना तुला? अंधारात कुठे घुसलीस माळावर? तोंडचं पाणी पळवलंस माझ्या. खबरदार पुन्हा तिथे गेलीस तर. तिथे काहीतरी विचित्र आहे. त्या गवताच्या आसपासही फिरकू नकोस. " मी तिच्या अंगावर ओरडत होतो.&lt;br /&gt;"हो, तिथे काहीतरी आहे. " ती भारावल्यागत बोलत होती.&lt;br /&gt;"काय आहे? तुला काही दिसलं आहे का? " मी तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेऊन विचारलं तसं तिने नकारार्थी मान हलवली आणि हात सोडवून घेतले.&lt;br /&gt;"आई गं! सुहासी तुझी नखं किती वाढली आहेत. " हात सोडवताना सुहासीच्या नखाने माझ्या हातावर भलामोठा ओरखडा उमटवला होता. "काप ती. लागलं मला. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"उद्या सकाळी कापेन हं! " शांत आवाजात म्हणाली आणि मला एकट्याला तिथे सोडून काहीच न घडल्यासारखी बेडरूममध्ये झोपायला गेली. या प्रकरणावर आता वेळ काढून उपयोगाचे नव्हते. लवकरात लवकर या माळरानाचे रहस्य माहित करून घ्यायला हवं. मी सुहासीच्या मागोमाग बेडरूममध्ये गेलो. ती आपले पाय जवळ घेऊन झोपली होती. मला थोडंसं विचित्र वाटलं पण मी तिच्या अंगावर चादर घातली आणि झोपी गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन दिवसांचं सांगून रंगराव गेला होता तो ४-५ दिवस झाले तरी परतला नव्हता. त्याच्या भरवशावर राहणे उपयोगाचे नव्हते. मी धरणावर गेल्यागेल्या कामाला येणार्‍या काहीजणांकडे चौकशी करायला सुरुवात केली. पण त्यातून विशेष काही कळलं नाही. तशीही पोटापाण्यासाठी बांधकामावर आलेली माणसं होती ती. त्यांना कामधाम, पोट आणि पोरंबाळं यातून उसंतच नव्हती. एकंदरीत या विषयाविषयी औदासीन्य होतं. गावात माझ्या कोणाशी फारशा घनिष्ठ ओळखीही नव्हत्या. हणम्या गावातला होता त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यातल्या त्यात जास्त माहिती कळली. त्याच्या बोलण्यातून कळलं की दीड-दोन वर्षांपूर्वी गावात बरीच बेवारशी कुत्री झाली होती. या कुत्र्यांची पिडा टाळण्यासाठी काही टारगट पोरांनी कुत्र्यांना पकडून, गोणात घालून या माळावर आणून, त्यांच्या शेपटीला फटाके बांधून त्यांना माळाच्या दिशेने गवतात सोडून देण्याचा चंग बांधला होता. हे असं महिनाभर तरी चाललं होतं. त्यानंतर गावातली बेवारशी कुत्री बरीच कमी झाली. गावकर्‍यांनी सुटकेचे निःश्वासच सोडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुमारे ६ महिन्यांपूर्वी सावत्याचा मुलगा; तो ही याच टारगट पोरांतला. एके दिवशी बापाशी कडाक्याचं भांडण केलं आणि बापाने घराबाहेर काढला. रागारागात शिव्या घालत त्याला काही लोकांनी माळावर जाताना पाहिलं. कोणी म्हणतं तो घरातून चोरी करून बापाला तुरी देऊन पळाला. कोणी म्हणतं त्याला शहरात पाहिला तर कोणी म्हणतं तो त्या गवतात खपला. गायब झाला. पोरगा काही पुन्हा घरी परतला नाही. त्याचं काय झालं त्याची काळजी खुद्द सावत्यालाही नव्हती आणि हे सर्व सांगताना हणम्याच्या आवाजातही कसली काळजी नव्हती. मी विचारतो आहे म्हणून तो सांगत होता झालं. माझं मन मात्र शंकेने ग्रासलं होतं. हणम्या सांगतो तेवढाच इतिहास या माळरानाला नसावा. सुहासीला या माळरानाच्या वेडापासून दूर करणं अतिशय गरजेचं होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी संध्याकाळी घरी परतलो तेव्हा ऊनं उतरत आली होती. आज घरी गेल्यावर सुहासीला समजवून सांगायचं, तिला थांबवायचं, या वेडापासून परावृत्त करायचं अशी खूणगाठ मनाशी बांधूनच घरात शिरलो. नेहमीप्रमाणे घरात सामसूम होती.&lt;br /&gt;मी थेट स्वयंपाकघरापाशी गेलो. मागचा दरवाजा उघडा होता आणि कुंपणाचं फाटकही. मी समजायचं ते समजलो आणि मागचा पुढचा जराही विचार न करता सरळ फाटकातून बाहेर पडून समोरच्या गवतात घुसलो. गवत दाट होतं. मी जसजसा पुढे जात होतो तस तसं ते अधिकच दाट आणि उंच होत होतं. त्यातून वाट काढत जाणं जिकिरीचं होतं. मी कुठल्या दिशेने जातो आहे तेच मला कळत नव्हतं. गवत आता पुरुषभर उंचीचं तरी होती. मी सुहासीला हाका मारायला लागलो पण त्या गवतात त्या हाका विरून गेल्यासारख्या वाटत होत्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अचानक गवताची सळसळ सुरू झाली. जणूकाही त्या गवताला मी आल्याची जाणीव झाली होती. माझी छाती धडधडत होती पण तरीही मी वेड्यासारखा सुहासीला शोधत होतो. दिशेचं भान मला राहिलं नव्हतं. गवत तर इतकं उंच, इतकं दाट झालं होतं की त्यातून सूर्यप्रकाशही शिरणं कठीण होत होतं. मला त्या गवतात गुदमरल्यासारखं होऊ लागलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सुहाऽऽऽसी” मी जिवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न केला पण माझा आवाज आतच विरला. त्या दाट गवतात मी घुसमटत होतो. मागे काहीतरी सर्रकन आवाज झाला. कुठला तरी प्राणी आसपास असावा. मी मागे वळून पाहिलं तर कुणीच नव्हतं. "सुहाऽसी" मी आणखी एकदा आवाज दिला आणि पुढे सरकलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुणीतरी माझ्यामागून दबकत, खुरडत येतं आहे अशी जाणीव मला व्हायला लागली. मी वळून वळूनबघत होतो पण आजूबाजूला गवतच गवत दिसत होतं. माझ्या मनात अभद्र विचार येऊ लागले. णा कुत्र्याकोल्ह्यांनी माझ्या सुहासीचं काही केलं तर नसेल. किती नाजूक आहे ती. तिच्या त्या सुरेख शरीराचे त्या कुत्र्यांनी चावे, तिचे लचके... त्या विचारांनीसुद्धा अंगावर शहारा आला. माझ्या मागच्या खुरडण्याचा आवाज अगदी जवळ आला होता. मागे वळून पाहायची माझी हिंमतही झाली नाही. मी वेगाने वाट मिळेल तिथे धावू लागलो. किती वेळ मी त्या माळावर भरकटत होतो देव जाणे पण अचानक गवत विरळ झाल्यासारखं भासलं. गवताच्या पात्यांतून मला घराचं कुंपण दिसलं आणि मी हायसं वाटून श्वास घेण्यासाठी क्षणभर थांबलो. मागचा आवाज पुन्हा एकदा जवळ आला होता. मी धीराने मागे वळून पाहिलं – बाहेर अंधारून आलं होतं पण चंद्राच्या प्रकाशात सर्व स्पष्ट दिसत होतं. त्या गवतात सुहासी एखाद्या भुकेजल्या श्वापदासारखी हातापायांवर दबा धरून बसली होती. तिच्या हाताचे पंजे जनावरासारखे जमिनीत रुतले होते. छाती धपापत होती. माझ्याकडे बघून ती दात विचकत होती. तिच्या तोंडातून जीभ बाहेर आली होती आणि त्यातून लाळ गळत होती. तिचे विस्कटलेले केस चेहर्‍यावर चिकटले होते. त्यातून तिचे ते चमकदार हिंस्र डोळे चकाकत होते. त्यांत मनुष्यासारखी कोणतीही जाणीव नव्हती की तिला माझी ओळख आहे असं दिसत नव्हतं. क्षणभर माझ्या मनात किळस दाटून आली आणि तोंडातून अस्फुट किंकाळी फुटली. ती सावध श्वापदासारखी माझ्यावर गुरगुरली आणि पुढल्या क्षणाला मी घराच्या दिशेने धाव घेतली. कुंपण पार करून मी फाटक लावून घेतलं आणि तिथेच थोडावेळ रेंगाळलो. सुहासी गवताबाहेर आली नाही. गवतात खसफस आवाज येत होता. सुहासी माघारी फिरली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. मी खिसा चापापला. बाइकची चावी खिशातच होती. मी थेट पुढल्या अंगणात आलो, बाइक काढली आणि पोलिस स्टेशन गाठलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“साहेब नाहीयेत. तालुक्याच्या गावाला गेल्येत. उद्या येणार. काय कंप्लेंट आहे? ” हवालदाराने डोकं वर करायची तसदीही घेतली नाही.&lt;br /&gt;“मी पुलाच्या साईटवर चीफ इंजिनिअर आहे. माझी बायको आज संध्याकाळपासून बेपत्ता आहे. मी दुपारी जेवायला घरी आलो तेव्हा ती होती पण संध्याकाळी घरी आलो तर ती नव्हती. तिचा पत्ता नाही. ” मी चक्क खोटं बोलत होतो.&lt;br /&gt;हवालदाराने माझ्याकडे रोखून पाहिलं. “नाव काय तुमचं? बायकोशी भांडण झालं होतं का? कुठे गावात गेली असेल. आताशी ९ वाजतायत रात्रीचे. थोडावेळ वाट बघा. कुठे गेली असेल तर येईल परत.” काय घाबरट माणूस आहे असे भाव त्या हवालदाराच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाही हो. आमची गावात फारशी ओळख नाही. ती कुठे जाणार नाही. " त्या माळरानाचा प्रकार हवालदाराच्या कानावर घालावा की न घालावा तेच मला कळत नव्हते. "तुम्ही आमच्या घराच्या आजूबाजूचा भाग शोधून बघा प्लीज. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ते आता शक्य नाही. साहेब आणि बरोबर दोन हवालदार एका केसच्या कामानिमित्त शहरात गेले आहेत. ते उद्या पहाटे परततील. आम्ही इथे दोघेच आहोत आज. उद्या सकाळी बघू. आता तुम्ही कंप्लेंट लिहा आणि घरी जा. आम्ही उद्या सकाळी हजर होतो." मी बरीच गयावया केली पण हवालदार काही बधला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी घरी परतलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते. सुहासीशिवाय घर खायला उठत होतं. मी पलंगावर जाऊन कोसळलो. डोळे भरून आले होते. डोके भणभणत होते. ती मागे त्या गवतात एकटी... मी तिचा नवरा होतो. तिची साथ देण्याची शपथ घेतली होती पण तिला एकटीला तिथे सोडून आलो होतो. तिचं ते अमानवी, अभद्र रूप सारखं डोळ्यासमोर येत होतं. काय झालं होतं तिला? काय होतं त्या माळरानावर?... एखादी पाशवी शक्ती की एक वेगळं जग? मला जे दिसलं तसं काही तिलाही दिसलं होतं का? की आमच्या जाणीवा वेगळ्या होत्या? तिला तिथे काही वेगळं दिसलं होतं तर ती बोलली का नाही? विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. मी इतका थकललो होतो की माझा डोळा कधी लागला तेच कळलं नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी कुणीतरी दरवाजा ठोठावत होतं. मी खडबडून जागा झालो. घड्याळात पाहिलं. सकाळचे साडेआठ वाजले होते. मी इतका वेळ कसा झोपलो? सुहासीशिवाय... ती रात्रभर त्या गवतात... मला लाज वाटली. पुन्हा कुणीतरी दरवाजा ठोठावला तसा मी भानावर आलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाहेर इन्स्पेक्टर आणि पोलीस पार्टी उभी होती. इन्स्पेक्टरने सुहासीची चौकशी केली आणि पुन्हा नव्याने सर्व सवाल जवाब केले. मी त्यांना सुहासी मागच्या गवतात हरवली असेल, माळावर रस्ता चुकली असेल अशी शंका बोलून दाखवली. इन्स्पेक्टरना त्यावर फारसा विश्वास वाटला नाही पण ते स्वत: पोलीसपार्टीसह माळावर गेले. माझा जीव घशाशी गोळा झाला होता. काय मिळेल त्यांना तिथे? पशुवत सुहासी की माझी सुहासी... ती जिवंत तरी असेल का? तासाभराने पोलिस पार्टी हात हलवत घरात परतली. त्यांनी सर्व घर उलथेपालथे केले. वासकावासकी करतानाच इन्स्पेक्टरने माझ्यावर प्रश्नांची पुन्हा सरबत्ती केली. मला कळून चुकलं होतं की पोलिसांचा संशय माझ्यावरच आहे. उत्तरे देताना मी गोंधळलो होतो, गांगरून गेलो होतो. जे सत्य होतं, जे मी अनुभवलं होतं आणि स्वत:च्या डोळ्यांनी मी जे पाहिले होतं ते त्यांना सांगू शकत नव्हतो; त्यांनी मला वेड्यात काढला असता. बराच वेळ चौकशी करून आणि बाहेर एक हवालदार उभा करून पोलिस पार्टी परत गेली. ते लवकरच परततील याची मला खात्री होती... माझे अटक वॉरंट घेऊन पोलिस पुन्हा दारात हजर होणार होते. मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्या हातात काहीही पुरावे नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी पुरता खचलो होतो. सुहासी गेली. माझं काय होणार? अब्रूचे धिंडवडे निघणार. अटक टळणार नाही. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. सुहासीच्या आईवडीलांना काय सांगायचं? माझ्या आईवडीलांना काय सांगायचं? तिचं ते माळावरचं अमानवी रूप राहून राहून डोळ्यासमोर येत होतं. मी त्या स्थितीत तिला एकटीला टाकून आलो.... मी अस्वस्थपणे येरझारा घालत होतो. दोन मिनिटं सोफ्यावर विसावलो तेव्हा माझं लक्ष अचानक माझ्या हातांकडे गेलं. माझी व्यवस्थित कापलेली नखं एकदम अचानक वाढलेली दिसत होती. अणकुचीदार.. एखाद्या श्वापदासारखी. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. समोर मार्ग दिसू लागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी तडक स्वयंपाकघरात गेलो आणि मागची खिडकी उघडली. बाहेर कुंपणा पलीकडे गवत वार्‍यावर फेर धरून डोलत होतं. संथ, एका लयीत. एका नादात. मी स्तब्ध होऊन त्या गवताकडे बघत होतो. हळूहळू माळरानाचा आकार मोठा होऊ लागला, गवत आता डोळ्यांत मावत नव्हतं. त्याची सळसळ मला खुणावत होती. जवळ बोलावत होती. मनाला खूप बरं वाटलं...मी मागचा दरवाजा उघडला आणि माळाकडे धाव घेतली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;समाप्त&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-5335700910119806467?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/5335700910119806467/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=5335700910119806467' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/5335700910119806467'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/5335700910119806467'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='पशू'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-7434843416315786264</id><published>2010-06-16T05:17:00.000-07:00</published><updated>2010-06-23T17:37:44.971-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>ठेव</title><content type='html'>लाल दिवा लुकलुकत होता. स्मिताने प्ले बटण दाबलं तसा अंजूचा आवाज घरात घुमला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अजून आली नाहीस का गं? मला वाटलं घरी पोहोचली असशील म्हणून फोन केला होता. परवाही केला होता पण तेव्हाही नाही भेटलीस. इतक्यात पोहोचलीस तर फोन कर, मी वाट बघते....खट्ट"&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्मिताने क्षणभर डोळे मिटले. 'नको आता नकोच फोन करायला. नंतर करेन सावकाश. काहीतरी कारण सांगेन. आधीच उशीर झाला आहे, डोकं कावलं आहे आणि त्यात अंजूने नानाकाकांचा विषय सुरु केला तर... नकोच!'&lt;br /&gt;&lt;br /&gt;गॅसवर तिने चहाच आधण चढवलं आणि ती तोंड धुवायला वॉशबेसिनपाशी गेली. 'नानाकाकांबद्दल सांगायला हवं अंजूला. आई म्हणत होती की कानावर घाल तिच्या... पण नुसतं सांगून प्रश्न सुटणार आहे का?' स्मिताने चेहर्‍याला खसाखसा साबण लावला. 'इथे लांब राहून फक्त चिंता करत रहायच्या. विषय उगाळत राहायचे आणि डोळ्यातून पाणी काढायचं. पटकन जाऊन पाहून यावं म्हणायला मुंबई काही तासाभरावर नाही.' स्मिताने पाण्याचा हबका तोंडावर मारला आणि टॉवेलमध्ये चेहरा लपवला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;----&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अंजू तिची लहानपणापासून जिवाभावाची मैत्रिण. दोघी एकाच वयाच्या, एकाच इमारतीत राहणार्‍या, एकाच शाळेत आणि दहावीपर्यंत एकाच वर्गात होत्या. अभ्यास, खेळ, क्लास, खरेदी सगळीकडे दोघींची जोडी एकत्रच असे. जेवा-खायलाही अंजू अनेकदा स्मिताकडे असे पण त्यामानाने स्मिताचा अंजूच्या घरातला वावर कमी होता. कारण नानाकाका. अंजूच्या वडिलांचा करडा स्वभाव, माणूसघाणेपणा आणि कडक शिस्त हा सर्वांच्या नावडीचा विषय होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नानाकाका गरीबीत वाढलेले. त्यांचे वडिल लहानपणीच अपघातात गेले. नानांच्या आईने पोटाला चिमटा घेऊन इंटरपर्यंत त्यांना कसेबसे शिकवले. इंटरनंतर नाना नोकरीला लागले. नानांच्या मागे लग्नाची बहिण होती. एक धाकटा भाऊ होता. घरातल्यांचं करता करता नाना अबोल होऊन गेले. काटकसरीने राहण्यासाठी त्यांनी अंगाला शिस्त लावून घेतलीच पण स्वभावात तुसडेपणा शिरल्याचं त्यांच्या गावीही आले नाही. यथावकाश बहिणीचे लग्न आणि भावाचे शिक्षण त्यांनी करून दिले. नानांचेही लग्न झाले. रमाकाकूंनी नानांचा स्वभाव लवकरच ओळखला असावा. इतरवेळेस बोलक्या असणार्‍या गपिष्ट रमाकाकू नानांच्या समोर दबकून राहायच्या. घरातला नानांचा एकाधिकार मुलांच्याही अंगवळणी पडला होता. अंजू स्वभावाने गरीबच पण धाकट्या अमितलाही नानांनी जरबेत ठेवले होते. काही मोजके मित्र सोडता नाना कोणाशी हसूनखेळून बोलल्याचेही आठवत नव्हते. नोकरीत मात्र नाना हुशार आणि कामसू म्हणून ओळखले जात आणि शिक्षण कमी असले तरी जम बसवून होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दहावीनंतर अंजूने कॉमर्सला जावे असा निर्णय नानांनी घेतला. अंजूचे परीक्षेतले गुण बघता तिला सायन्सला प्रवेश सहज मिळाला असता परंतु "दोघांचे खर्च जमणार नाहीत. तू हुशार आहेस. कॉमर्सला गेलीस तरी तुझं अडणार नाही. तुझ्या शिक्षणाचा खर्च मला द्यावा लागणार नाही. अमितची शिक्षणातली बाजू लंगडी आहे; त्याला पैशांची मदत लागली तर आमच्या म्हातारपणाची ठेव म्हणून त्याला शिकवण्याकडे लक्ष अधिक द्यावे लागेल. तुझे लग्न झाले की तुझ्याकडून आम्ही अपेक्षा करू शकत नाही. तो मुलगा आहे. त्याला आता शिकवू, चांगले ठेवू तर तो आम्हाला म्हातारपणी बघेल." अशी अनेक कारणे देऊन अंजूला नानांनी कॉमर्सकडे जाण्याची गळ घातली. अंजू खट्टू झाली पण नानाकाकांना विरोध करण्याचं बळ तिच्याकडे आणि रमाकाकूंकडे नव्हतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बी.कॉम. झाल्यावर पुढे शिकण्याचीही अंजूची इच्छा होती पण नानांनी परस्पर आपल्या मित्राच्या पुतण्याशी तिचे लग्न करून देण्याचा घाट घातला होता. संजय अमेरिकेत होता. त्याच्या घरच्यांना त्याचे लग्न लवकर उरकून टाकायचे होते. रूपाने देखणी अंजू त्यांना पसंत होती. अंजूची मात्र इतक्या लांब लग्न करून जाण्याची इच्छा नव्हती. रमाकाकूही पोरीला इतक्या लांब पाठवायला तयार नव्हत्या. 'तिला अद्याप शिकू द्या. लहान आहे ती तशी.' असे त्यांनी सुचवूनही पाहिले पण नानांना अंजूच्या शिक्षणाच्या बाबतीत झालेली हयगय भरून काढायची होती. त्यांनी अंजूला समजावले की 'तिच्या शिक्षणाच्या बाबतीत ते कमी पडले असले तरी अमेरिकेचे स्थळामुळे ती जन्मभर सुखी राहील. भविष्यात कसलीही अडचण येणार नाही.' नानांनी अमितच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च करून त्याला इंजिनिअरींगला पाठवले होते. त्याच्या अभ्यासाचा, हॉस्टेलचा खर्च भागवून अंजूचे लग्न धूमधडाक्यात लावून देणे त्यांना जमणार नव्हते. संजयच्या घरच्यांची मोठ्या लग्नाची अपेक्षा नव्हती. मुलगा लहान सुट्टीवर येथे येणार आहे, चटकन लग्न उरकून टाकायचे म्हणत होते. सर्वकाही नानांच्या पथ्यावर होते. त्यांनी अंजू आणि रमाकाकूंना न जुमानता लग्नाची बोलणी करून टाकली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लग्न होऊन अंजू अमेरिकेला गेली तरी स्मिताला तिची नियमित पत्रे येत. संजयने अंजूला स्वतःहून पुढे शिकण्याची गळ घातली होती. अंजूची त्याला अर्थातच आनंदाने तयारी होती. आपले नवे आयुष्य, शिक्षण वगैरे यांत ती चटकन रमून गेली. आपल्या वडिलांनी आपल्यावर अन्याय केला आहे ही खंत तिच्या मनातून गेली नसावी. पत्रांतून स्मिताकडे अंजूला मन मोकळं करता येत होतं. नानांच्या अरेरावीने आपण आयुष्यात मागे पडलो ही उणीव तिला भरून काढायची होती. घरी ती अभावानेच पत्र लिहित असे किंवा फोन करत असे. केलाच तर रमाकाकूंची चौकशी करे. त्यांच्याशी बोलत असे. रमाकाकू तिला कधीतरी भारतात ये म्हणून सांगत पण ती ऐकून कानाआड करत असे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्मिताचे यथावकाश लग्न झाले आणि लग्नानंतर दोन वर्षांत सुधीरनेही आपले बस्तान अमेरिकेला हलवले. मधल्या वर्षांत अंजूने आपले शिक्षण पूर्ण केले, अमेरिकेत नोकरी धरली, तिला मुलगा झाला. दरवेळेस कसले ना कसले कारण पुढे करून ती भारतात येण्याचे टाळत गेली. अमितच्या लग्नालाही तिने सुट्टी मिळत नाही हे कारण सांगून टाळले. रमाकाकूंना या गोष्टीचा विलक्षण त्रास होत असे पण त्या बोलून दाखवत नसत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान, नानाकाका रिटायर झाले. त्यांना इतक्या वर्षांच्या नोकरीचा उत्तम फंड मिळाला. गावाकडली जमिनही त्यांनी विकली होती, त्याचे चांगले पैसे मिळाले होते. एकंदरीत रिटायर झाले तरी त्यांची परिस्थिती उत्तम होती. परंतु, नानांच्या स्वभावात झालेला बदल सर्वांना जाणवण्यासारखा होता. नानांच्या हेकट आणि माणूसघाण्या स्वभावाला अचानक मुरड पडल्यासारखी दिसत होती. घरातल्या सर्व गोष्टींत त्यांनी आपला अधिकार गाजवणे कमी केले होते. अमितशी आणि त्याच्या बायकोशी ते मिसळून राहण्याचा प्रयत्न करत. नातेवाईकांकडे येणेजाणे त्यांना पूर्वी आवडत नसे परंतु काही मोजक्या नातेवाईकांकडे रमाकाकूंबरोबर येणे-जाणे त्यांनी सुरू केले होते. अंजूचा फोन आला तर मागून घेत. तिच्याशी, जावयाशी, नातवाशी बोलत. तिने भारतवारी करावी म्हणून गळ घालत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रमाकाकू सोडून सर्वांना नानांच्या बदललेल्या स्वभावाचं आश्चर्य वाटे. रमाकाकू याविषयी बोलताना स्मिताच्या आईला एकदा म्हणाल्या, "जोपर्यंत नोकरी असते तोपर्यंत गुर्मी असते. पुरुष रिटायर झाला की त्याला विचारपूस करणार्‍या माणसांची गरज लागते. बदल झाला आहे ते बरेच झाले. मी म्हणून अशा स्वभावाला दबून राहीले. सून ऐकून घेईल का? त्यांनाच ते जाणवत असेल म्हणून बदलले म्हणायचे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;नानांच्या बदललेल्या स्वभावामुळे अंजूच्या मनातली अढीही कमी झाल्यासारखं स्मिताला वाटत होती. अनेक वर्षांनी अंजूने भारतवारी केली. आजी आजोबांनी नातवाला पाहिलेही नव्हते. दोघांचे खूप कोडकौतुक नानांनी केले. अंजू फोनवर स्मिताकडे पूर्वीपेक्षा दिलखुलासपणे नानांचे नाव घेई. नानांबद्दल तिच्या बोलण्यातला विशादही ओसरल्यासारखा वाटत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बरं झालं बाई. इतक्या वर्षांनी का होईना पण रमाकाकू आणि अंजू दोघी आनंदी आहेत ना, मग झालं तर!" स्मिताची आई म्हणालीही. परंतु, आनंद फार कमी काळ टिकतो म्हणतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नानाकाकांना एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली पण गादीवरून उठता येईना. अमितने आणि त्याच्या बायकोने धावाधाव केली म्हणून अनर्थ टळला. नानांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला होता. शरीराची एक बाजू लुळी पडली आणि वाचेवरही परिणाम झाला. जन्मभर वाघासारख्या वागलेल्या माणसाची अशी दयनीय अवस्था पाहणे सर्वांनाच कठिण होत होते. रमाकाकू होत्या म्हणून सर्व निस्तरत होते तरी अमितला आजारी बापाचे लोढणे दिवसेंदिवस नकोसे होत चालले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"म्हातारपणी मुलगा सांभाळेल म्हणून मला शिकू दिलं नाही नानांनी. त्याला शिकवलं. त्याची परिस्थिती चांगली झाली तर तो म्हातारपणाची ठेव बनेल म्हणून. आई सांगत होती की अमित त्यांच्या तोंडावर म्हणतो की 'अशा परिस्थितीत अजून किती वर्षे सांभाळायचे तुम्हाला? आमची कामेधामे सोडून नाही बघता येत तुमच्याकडे.' वाचा गेली आहे नानांची. ऐकू येतंय त्यांना अद्याप. जातील तर बरे होईल. सुटतील सगळेच पण मृत्यू असे सांगून येत नाहीत." नानांबद्दल बोलताना एके दिवशी अंजू म्हणाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नियतीही विचित्र असते. नानांची अशी तीन वर्षे सेवा करून रमाकाकू अचानक फ्लूचे निमित्त होऊन गेल्या. धडधाकट होत्या; त्या जातील अशी कोणालाच कल्पना नव्हती पण होणारं टळत नसतं. सगळंच त्रांगडं झालं होतं. अंजू तातडीने भारतात गेली. काकूंचे दिवस होण्याआधीच अमितने विषयाला तोंड फोडले. नानांची जबाबदारी फक्त त्याच्या खांद्यावर पडत होती ते त्याला मान्य नव्हते. "तू अमेरिकेत राहणार आणि आईबापांच्या खस्ता इथे राहून मी काढायच्या. खर्च, सेवा आणि त्रास फक्त माझ्या नशिबी." अंजूने ऐकून घेतलं. तसंही, त्या परिस्थितीत दुसरं काय जमणार होतं? नानांची काळजी घ्यायला एक गडी निश्चित केला. त्याचा पगार अंजूने द्यायचे असे ठरवले. जातेवेळी अंजू नानांचा निरोप घ्यायला गेली तशी नानांनी तिचा हात गच्च धरून ठेवला आणि लहान मुलासारखे गलबलून रडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परत आल्यावर अंजूला नानांच्या तब्येतीची सतत टोचणी लागून असे. घरी फोन केला तर अमितच्या आणि त्याच्या बायकोच्या फक्त तक्रारी ऐकून घ्याव्या लागत. अंजूने काही सुचवले तर त्या दोघांना पटत नसे. कधीतरी अंजूने नानांशी बोलण्याची इच्छा दाखवली तर नाना कानाला फोन लावत पण पलिकडे अंजूला फक्त रडण्याचा आवाज येई. स्मिताकडे मन मोकळं केलं की अंजूला तेवढंच बरं वाटे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;----&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चहा उकळायला लागला तशी स्मिता भानावर आली. कप हातात घेऊन ती डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर टेकली. चहाच्या कडक घोटाबरोबर तरतरी आल्यासारखे वाटले. आई मध्यंतरी सांगत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमितच्या बायकोने नानांची रवानगी फ्लॅटमधल्या बंद बाल्कनीमध्ये केली होती. बाल्कनी काचा लावून बंद केली तरी काचेतून इमारतीतल्या सर्वांना नानांची शोचनिय परिस्थिती दिसत होती. घराच्या मालकाची अशी परिस्थिती पाहून लोकांना विशाद वाटत होता पण मध्यात कोण पडेल म्हणून सर्व गप्प होते. उगीच अंजूला त्रास का म्हणून स्मिता हे तिला बोललीच नव्हती. काल आईचा फोन होता...&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पावसाची झड आली होती आज. अमित आणि त्याची बायको दोघे ऑफिसला आणि तो गडीही मेला कुठेतरी गायब होता. बाल्कनीच्या खिडक्या उघड्या होत्या. भिजत होते गं नाना बिचारे. बघवलं नाही पण काय करू? दरवाजा वाजवला तर उघडायला होता कुठे तो गडी? गेला असेल गाव उंडारायला. तू सांग अंजूला. बघवत नाही नानांची दैन्यावस्था. कसंही का होईना, मुले आहेत. त्यांनी नाही बघायचं तर कुणी?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;'काय सांगायचं अंजूला? नेमकं काय करणार होती ती इथे बसून? पण सांगायला तर हवं. वडिल आहेत तिचे.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्मिताने अर्धवट प्यालेल्या चहाचा कप बाजूला सारला आणि फोनची बटणं दाबायला सुरुवात केली.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-7434843416315786264?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/7434843416315786264/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=7434843416315786264' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/7434843416315786264'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/7434843416315786264'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2010/06/blog-post.html' title='ठेव'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-221889234337279517</id><published>2010-04-09T05:36:00.000-07:00</published><updated>2010-04-09T05:38:04.821-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>निरागस</title><content type='html'>झाली असतील या गोष्टीला आता १२-१३ वर्षे. गल्फचा कंटाळा आल्याने आम्ही मुंबई किंवा इतरत्र स्थायिक होण्याचे ठरवले तेव्हाची. सॉफ्टवेअर व्यवसायाची तेव्हा चलती असल्याने आम्हाला दोघांनाही सहज नव्या नोकर्‍या मिळून गेल्या. माझ्या ऑफिसात मराठी माणसे तशी कमीच, त्यामुळे आम्हा ४-५ जणांचा चांगलाच कंपू बनला होता. मी, माझ्या टीममध्ये असणारा संदेश, नेटवर्किंगमधला सुनील, लायब्ररीयन आणि ऍडमिनिस्ट्रेशन पाहणारी वैशाली, एच.आर.मध्ये माझ्यानंतर लागलेली माधवी आणि दुसर्‍या एका प्रोजेक्टवरचा सिनिअर डेवलपर राहुल. केवळ सहकारी न राहता एकमेकांच्या घरी-दारी येण्यापर्यंत आमची मैत्री घट्ट झाली होती. वेगवेगळ्या डिपार्टमेंटसमधली डोकी एकत्र आल्याने फावल्यावेळातला आमच्या डिटेक्टिवगिरीचा व्यवसायही झोकात होता. एक मात्र होतं की आमच्यातल्या गप्पा कधी बाहेर गेल्या नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असाच एके दिवशी सकाळी राहुल एका मुलीला घेऊन पहिल्या मजल्यावर माझ्या क्यूबपाशी आला. काही माणसे आपल्याला पाहताक्षणीच आवडतात. सावळा तजेलदार रंग, पाणीदार डोळे, नाजूक जिवणी, ओठांच्या वरचा रेखासारखा एक गोंडस तीळ, शिडशीडीत, फॅशनेबल मुलगी चटकन डोळ्यांत भरणारी होती. लहानशीच दिसत होती. नुकतीच कॉलेजातून बाहेर पडली असावी. ऑफिसच्या वातावरणाला दबल्यासारखी वाटत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मीट माय फ्रेंड उर्मी, उर्मीला पटेल. शी'ज जॉईन्ड अस टूडे अँड उर्मीला मीट प्रियाली. उर्मी, सायरसबरोबर काम करणार आहे. माझ्या एका जवळच्या मित्राची मावसबहीण आहे. प्रियालीची वट आहे हं इथे! तुला काही हवं असल्यास बिनधास्त तिला गाठ. ही देखील माझी चांगली मैत्रिण आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;सवयीचं "वेलकम!" वगैरे झाल्यावर मी तिला हसत म्हटलं, "याचं काही ऐकू नकोस. माझी काही वट वगैरे नाहीये, उगीच लोक माझ्याबद्दल गैरसमज पसरवत असतात पण सायरसवर कधी फायरिंग करायचं असेल तर सांग. आपलाच बंदा आहे."&lt;br /&gt;&lt;br /&gt;उर्मीलाने असिस्टंट प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर म्हणून नोकरी पत्करली होती. सायरसला, आमच्या प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटरला गेल्या काही दिवसांपासून व्याप वाढल्यामुळे एका असिस्टंटची गरज होती. सायरस खरास हा एक मस्त मनुष्य. मनमिळाऊ आणि हाडाचा गरीब. झुरळ पाहिलं तरी घाबरून पळत सुटेल असा. आम्ही त्याला मागून "वेडा बावा" म्हणायचो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुपारी सुनिल माझ्या डेस्कपाशी थबकला. "ए तू त्या उर्मीला भेटलीस का? आयटम आहे."&lt;br /&gt;"ऑफिसात तरी तोंड सांभाळून बोलत जा रे." सुनिलच्या शर्टाची सर्व बटणे आज लावलेली आहेत हे लक्षात येत होते.&lt;br /&gt;"राहुलच्या मित्राची मामेबहीण आहे असं कळलं."&lt;br /&gt;"मला वाटतं तो मगाशी म्हणाला मावसबहीण." मी लगेच चूक सुधारून दिली.&lt;br /&gt;"असेल."&lt;br /&gt;&lt;br /&gt;संध्याकाळी ऑफिसातून बाहेर पडले आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारी बस पकडली. सराईतांना बसमध्ये चढल्याचढल्या कोणत्या जागा रिकाम्या होणार आहेत हे चटकन कळतं. मला बूड टेकवायला जागा मिळाली आणि तेव्हाच मागून बसमध्ये चढणारी उर्मीही दिसली. गर्दीत स्वतःला सावरत कशीबशी उभी होती. तिच्या बाजूचा मळकट कपड्यांतला मनुष्य तिच्या अंगचटीला येत होता असं वाटलं. आमची नजरानजर झाली तशी ती ओशाळवाणं हसली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;'अगं! मोठ्यानं बोल की गधडे त्याला की बाजूला सरक म्हणून.' मी मनात म्हटलं पण मग लक्षात आलं की बहुधा असल्या प्रसंगांची तिला सवय नसावी.&lt;br /&gt;"इथे ये. माझ्याजागेवर बस." मी तिला ओरडून सांगितलं. "हिम्मत है तो इधर आके कुछ करके दिखा उसको" त्या माणसाकडे पाहून मी ओरडले. आता बसमधली माणसं त्यांच्याकडे वळून बघू लागली तशी त्या माणसाने चालत्या बसमधून उतरून पोबारा केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"थँक्स हं! मला काय करावं हेच सुचत नव्हतं. किती किळसवाणी माणसं असतात नै."&lt;br /&gt;"अगं असे महाभाग रोजच भेटतात. त्यांचा फाजीलपणा तेवढ्यापुरताच असतो. अंगात काही धमक नसते. आपण आवाज चढवला की काम होतं. पाहिलंस ना कसा पळून गेला ते. यांचा फाजीलपणा असाच बाहेर काढायचा असतो."&lt;br /&gt;"मला अनुभव नव्हता पण आता लक्षात ठेवेन."&lt;br /&gt;&lt;br /&gt;हम्म! येशील हळूहळू अंड्यातून बाहेर येशील. रेल्वेचा ब्रिज चढताना मी तिला विचारले "तू कुठे राहतेस? सेंट्रल का वेस्टर्न?"&lt;br /&gt;"वेस्टर्न, मालाडला."&lt;br /&gt;"हो का? मीही मालाडलाच. लिबर्टी गार्डनजवळ."&lt;br /&gt;"मीही लिबर्टी गार्डनजवळच राहते." मी तिला माझ्या इमारतीचे नाव सांगितले. ती माझ्यापासून दोन चार इमारती सोडून राहत होती.&lt;br /&gt;"पण मी आधी कधी पाहिले नाही तुला." तिने विचारले.&lt;br /&gt;"अगं आम्ही आताच आलो. हा फ्लॅट माझ्या बहिणीचा आहे. तात्पुरते राहतो आहोत. माझं घर बनतं आहे. बांधकाम झालं की आम्ही शिफ्ट होऊ. हा तुझा पहिलाच जॉब का गं?"&lt;br /&gt;"अलमोस्ट! मी याच वर्षी बी. कॉम. झाले मग एके ठिकाणी दोन महिने काम केलं पण मला ना मल्टीनॅशनलमध्ये जॉब हवा होता. काहीही करून खूप मोठं व्हायचं आहे मला." तिच्या पाणीदार डोळ्यांत बरीच स्वप्नं तरळून गेल्यासारखी वाटली.&lt;br /&gt;'निरागस आहे.' मी मनात म्हटलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;-----&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोन-चार दिवसांनंतरची गोष्ट. उर्मीचा सकाळीच फोन आला.&lt;br /&gt;"राहुल है क्या वहां?"&lt;br /&gt;"नाही. इथे नाहीये."&lt;br /&gt;"अजून कसा नाही आला? १० वाजत आले. तुझा मित्र आहे ना तो? तुला माहित आहे का?"&lt;br /&gt;"आज मंगळवार ना! राहुल आणि वैशाली पहाटे ४ वाजल्यापासून सिद्धीविनायकाच्या रांगेत उभे असतात. आज उशीर झाला असावा."&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुपारी राहुल तणतणत आला. "तुला कोणी सांगितलं होतं त्या उर्मीला सांगायला की मी आणि वैशाली सिद्धिविनायकाच्या लायनीत उभे राहतो ते."&lt;br /&gt;"का काय झालं? क्लासिफाईड इन्फो आहे का ती?"&lt;br /&gt;"नाही पण तिला माझ्याबद्दल जास्त काही सांगत जाऊ नकोस."&lt;br /&gt;"अरे पण तुझी मैत्रिण आहे ना ती. बरं! अरे तुला माहित्ये का? ती माझ्या घराशेजारीच राहते."&lt;br /&gt;"मला माहित्ये पण तू तिच्यापासून चार हात लांब रहा."&lt;br /&gt;"अं! का रे?"&lt;br /&gt;"सांगेन मग कधीतरी." म्हणून राहुलने काढता पाय घेतला. राहुलचा हा विचित्रपणा पास-ऑन करणे आवश्यक होते. मी वेळ झाल्यावर वैशालीला त्याच्याबद्दल सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अय्या! गंमतच आहे." वैशाली उत्साहाने म्हणाली. "मलाही त्या उर्मीने दोन-चारदा फोन करून राहुलबद्दल विचारलं. मलाही विचारत होती - तुझा मित्र आहे ना तो. किती चांगला मित्र आहे वगैरे. मला वाटतं ती राहुलवर लाईन मारत असावी. गीतूला सांगायला हवं हं!"&lt;br /&gt;&lt;br /&gt;गीतांजली ही राहुलची कॉलेजपासूनची गर्लफ्रेंड. दोघांचेही प्रकरण घरांत पसंत होते. दोघांना थोडे सेटल व्हायचे होते म्हणून लग्न झाले नव्हते इतकेच. पुढच्या महिन्यात साखरपुडा उरकून घ्यायचे ठरले होते. "फिरुन फिरुन थकले आणि लग्नाला लागले." असं संदेश म्हणायचा त्यांना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ती उर्मी लाईन मारते का रे तुझ्यावर?" संधी मिळाल्यावर आम्ही राहुलची थोडी खेचली.&lt;br /&gt;"माहित नाही. तिला थोडं लांबच ठेवायला हवं. उगीच गळ्यात पडते आहे." राहुल रुक्षपणे म्हणाला.&lt;br /&gt;"तूच आणलीस तिला. मी सांगू का रे गीतूला?" संदेशने आणखी थोडी खेचली.&lt;br /&gt;"प्लीज. माझ्या आयांनो आणि बापांनो, तुम्ही त्या उर्मीपासून लांब रहा आणि कृपा करून गीतूला काही सांगू नका."&lt;br /&gt;"हे बघ! उर्मी तुझ्या गळ्यात पडत असेल तर तू तिला स्पष्ट सांग की तुझं लग्न ठरलं आहे. ती आताच कॉलेजातून बाहेर पडली आहे. लहान आहे. तिला अद्याप पोच नसावी. मला तर ती अगदी निरागस वाटते."&lt;br /&gt;"निरागस! माय फूट! तिचा विषय नको आता. तिला माझ्यापासून कटवायचं हे मात्र नक्की. तिला कसलीही माहिती देऊ नका आणि तुम्हीही लांब रहा. माझ्या मित्राची बहीण आहे ती. तिच्यामुळे माझे संबंध खराब होता कामा नयेत."&lt;br /&gt;"ठीक आहे." आमचा करार वगैरे झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही दिवसांनी उर्मीचे चौकशीचे फोन बंद झाले. त्यावर आमचे चर्वितचर्वणही झाले. 'ऑल वेल! ब्याद टळली आहे असे दिसते.' असं संदेश म्हणाला. राहुलही निर्धास्त दिसला. उर्मीला ऑफिसात लागून आता तीन-चार महिने उलटले होते. ऑफिसातल्या अनेकांना तिचं आकर्षण वाटतंय हे सर्वांच्या लक्षात आले होते. तिच्या डेस्कपाशी घुटमळणारे, तिला लंचला बाहेर घेऊन जाणारे अनेक होते. राहुलच्या तंबीमुळे संदेश आणि सुनील सांभाळून होते. शिवाय राहुलच्या मित्राची बहीण असल्याचेही कारण असावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;----&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"सायरस माझ्याशी फटकून वागतो. अजिबात मदत करत नाही." उर्मी एक दिवस ट्रेनमध्ये बोलता बोलता म्हणाली. तशा तिच्या आणि माझ्या वेळा वेगळ्या होत्या पण कधीतरी गाठ पडतच असे.&lt;br /&gt;"सायरस? आणि फटकून वागतो. काहीतरीच काय? त्याच्यासारखा गरीब मनुष्य ऑफिसमध्ये नाही."&lt;br /&gt;"अगं खरंच!"&lt;br /&gt;"बरं मला वेळ झाला की मी विचारेन त्याला सहज म्हणून."&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी आणि सायरस हॉलवेमध्ये काहीतरी बोलत होतो आणि समोरून राहुल येताना दिसला.&lt;br /&gt;"केम छो बावा?" राहुलने त्याला खास पारशी हेल काढत विचारले.&lt;br /&gt;"शाला तूने फसाया है मेरेको कैसा सॅम्पल लाया है यार?" राहुल ऐकून फिसकन हसला. हे वाक्य उर्मीसाठी आहे हे लक्षात येत होतं.&lt;br /&gt;"अरे ती उर्मी सांगत होती मागे की तू तिला हेल्प करत नाहीस म्हणून." मी संधी मिळताच विचारलं.&lt;br /&gt;"अरे येडी, हेल्प मेरेको चाहिये उसको क्या हेल्प? ये राहुलने बुरा फसाया है" काय झाले ते कळत नव्हते. सायरस घुश्श्यात दिसत होता आणि राहुल मजेत. ही ब्याद सायरसच्या गळ्यात पडू पाहते आहे का काय? मला उर्मी आवडत होती. तिच्यासारख्या मुलीने थोडं सांभाळून वागायला हवं असं वाटत होतं. तिच्याशी एकदा बोलून बघायला हवं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;-----&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या दिवशी सकाळीच डेस्कवरचा फोन खणखणला. माधवी होती. लंचला सर्वांनी बाहेर जाऊया असं सांगत होती. काहीतरी जबरदस्त खबर होती तिच्याकडे. तशाही माधवीकडे बातम्या असायच्याच. कोणत्या डायरेक्टरने रिझाईन केले? कोणाला किती दिवसांची सुट्टी हवी आहे? कोणी कोणाची एच आर मध्ये तक्रार केली वगैरे वगैरे. चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचा बेत ठरला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"एक सॉलिड खबर द्यायची आहे. तुमचा विश्वासही बसणार नाही. काल तो राकेश भाटिया उर्मीची चौकशी करत होता." माधवी उत्साहाने सांगत होती.&lt;br /&gt;"राहुल, सायरस आणि आता राकेश. सही जा रही है बाप!" सुनिलने तोंड उघडलं.&lt;br /&gt;"का रे? तुझा चान्स लागला नाही म्हणून जळतोस काय?" संदेशने नाक खुपसलं.&lt;br /&gt;"तिला प्रेमात पडण्याची घाई असावी. राहुल वटलेला चेक, सायरस वेडा बावा तेव्हा आता राकेशची पाळी." वैशालीने आपली बोली लावली. माणसं गॉसिप करायला लागली की एक एक तर्क कुतर्क लढवू लागतात.&lt;br /&gt;"ही काय सॉलिड खबर आहे का?" मी खट्टू होऊन विचारले.&lt;br /&gt;"मला बोलू द्याल तर खबर कळेल ना. तुमची मुस्काटं आवळा मग सांगते." माधवी सरसावून म्हणाली, "राकेश बराच गोंधळलेला होता. उर्मीची चौकशी करत होता. थोडीशी पर्सनल."&lt;br /&gt;"गटलेला दिसतो." इति संदेश.&lt;br /&gt;"ऐक रे! उर्मीने म्हणे त्याला शुक्रवारी संध्याकाळी कुठेतरी बीचवर भेटायला बोलावलं आहे."&lt;br /&gt;"कुठेतरी नाही. गोराईला असणार संध्याकाळी साडे सहाला." राहुलने पहिल्यांदाच तोंड उघडले.&lt;br /&gt;"हो गोराईच म्हणत होता बहुतेक. तिथे म्हणे तिने बंगला बुक केला आहे दोन-तीन तासांसाठी. राकेश म्हणत होता की या आधीही ऑफिसातल्या एक दोन जणांना तिने अशी आमंत्रणे दिलेली आहेत. तो थोडासा टरकला होता. तक्रार अशी करत नव्हता पण एच आरच्या कानावर जावं असं त्याला वाटत होतं."&lt;br /&gt;&lt;br /&gt;सायरस काय म्हणत होता, राहुल तिला का चुकवत होता त्याचा पत्ता आता लागत होता. बोंबला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुला कसं कळलं गोराई? म्हणजे तू ही..... तुझ्या मित्राची बहीण आहे ना ती." माझी ट्यूबलाईट लख्ख पेटली होती.&lt;br /&gt;"खीखीखी! माझ्या मित्राची कसली आली आहे बहीण. याहू चॅटवर भेटली होती."&lt;br /&gt;&lt;br /&gt;च्यामारी! आणि ती आम्हाला विचारत असे की तुम्ही राहुलच्या मैत्रिणी ना!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;***&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;(मूळ अनुभवातील पात्रे, स्थळ, प्रसंग बदलले आहेत.)&lt;/em&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-221889234337279517?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/221889234337279517/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=221889234337279517' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/221889234337279517'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/221889234337279517'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2010/04/blog-post.html' title='निरागस'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-5764740295103799653</id><published>2009-12-20T05:22:00.000-08:00</published><updated>2009-12-20T05:41:05.976-08:00</updated><title type='text'>टॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार</title><content type='html'>&lt;div&gt;&lt;a href="http://www.chinadaily.com.cn/entertainment/images/attachement/jpg/site1/20070826/0013729c050d083bcced4d.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 278px; FLOAT: right; HEIGHT: 283px; CURSOR: hand" border="0" alt="" src="http://www.chinadaily.com.cn/entertainment/images/attachement/jpg/site1/20070826/0013729c050d083bcced4d.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;"मला माझ्या दंडावर सिंहाचे तोंड गोंदवून घ्यायचे आहे. " काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्रवर्यांनी आपली इच्छा सहजच माझ्यासमोर मांडली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ईईईईव! हे काय भलतंच. नसती फ्याडं सुचतात एक एक. जंकी, ड्रगी, हिप्पी, फ्याशनच्या जगतातील काही बिघडलेले कलावंत यांच्याखेरीज कोणीही टॅटू लावत नाहीत. अमेरिकेत एखादे फ्याड निर्माण झाले की लग्गेच आपण त्याचे कित्ते गिरवायलाच हवेत, नाही का? आपल्या अंगावर काहीतरी कोरून घ्यायचे, त्याचे साइड इफेक्ट्स, इन्फेक्शन झाले तर पंचाईत. एडसचा बागुलबुवा आहेच वर. आपल्या कातडीत सुया टोचून रंग खुपसून घेण्याचा रानटीपणा आणि त्यातून काही वर्षांनी आपण कसला मूर्खपणा करून बसलो असे वाटले तर पश्चात्ताप करत बसायचं. तो टॅटू पुसून टाकणे इतके सोपेही नाही. " मी तोंड सोडले आणि त्या दटावणीमुळे बहुधा त्यांची इच्छा तिथेच विरून गेली आणि त्यांनी हलक्या सुरात केलेली तक्रारही.&lt;br /&gt;"ठीक आहे नाही लावून घेत टॅटू पण ते जंकी, हिप्पींचे संदर्भ जरा चुकताहेत असे वाटत नाही का आणि आपल्याकडील लहान मुलांचे कान-नाक टोचण्याच्या रानटीपणाबद्दल काय वाटते? "&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;div class="image-right"&gt;&lt;br /&gt;त्यानंतर अनेक वर्षे अनेक प्रसंगांतून हे टॅटू कोणत्यानं कोणत्या प्रसंगांतून डोळ्यासमोर येत राहिले. एखाद्या बाईच्या कपाळावर गोंदवलेली चंद्रकोर, हातावर गोंदवलेले हिरवट निळसर नाव, भटक्या जमातीतील स्त्रियांच्या हातावर आणि पायांवर गोंदवलेली नक्षी, दिवारमधल्या अमिताभच्या हातावरील "मेरा बाप चोर है।" हे गोंदवण, नाझी कॅंपमधील कैद्यांच्या हातावर गोंदवलेले क्रमांक, बेकहॅमचा हातावर कोरलेला देवनागरी लिपीतील व्हिक्टोरिया या बायकोच्या नावाचा टॅटू, ऍंजेलिना जोलीच्या पाठीवरील ख्मेर लिपीतील संस्कृत श्लोक, बेकहॅमचा कित्ता गिरवून सैफने हातावर कोरून घेतलेल्या करिनाच्या नावाच्या टॅटूची वदंता, मायकेल स्लेटरच्या छातीवरील ३५६ हा नंबर, हल्लीच आलेल्या गजीनीमधील अंगावर गोंदवून आपली स्मरणशक्ती काबूत ठेवण्याचा आमीरने अवलंबलेला मार्ग आणि रस्त्यावर, मॉलमध्ये, कार्यालयात दिसणाऱ्या असंख्य जनतेने अंगावर ल्यालेला हा कायमस्वरुपी शृंगार कधीना कधी नजरेस पडतोच. अगदी, आताच प्रकाशित झालेल्या डॅन ब्राऊनच्या "द लास्ट सिम्बॉल" या कथानकामध्येही टॅटूंना विशेष महत्त्व आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;टॅटूइंग किंवा गोंदवणे या कलेबद्दल टोकाचे विचार मांडणार्‍या अनेक व्यक्ती भेटतात. आपले अंग टोचून कायमस्वरुपी रंगवण्याविषयी नाराजी व्यक्त करणारी माझ्यासारखी माणसे किंवा टॅटू लावणे "कूल" आहे म्हणून दिमाखात आपल्या अंगावरचे गोंदवण मिरवणारे. या टॅटूंविषयी सामोआ या पॉलिनेशियन बेटावरील भाषेत एक म्हण आहे - एकवेळ तुमच्या शरीरावरील दागिना मोडून तुमची साथ सोडण्याचा संभव आहे पण गोंदवण तुमची साथ कबरीपर्यंत करेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकप्रिय किंवा पॉप संस्कृतीत अंगावर टॅटू गोंदवणे हे आत्मप्रकटनाचे किंवा स्वत:ला व्यक्त करण्याचे साधन समजले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत शरीर रंगवण्याची ही कला अनेकांना भुरळ घालते. प्रदर्शने, आर्ट-गॅलरीज, संग्रहालये अशा अनेक माध्यमांतून गोंदवण्याच्या या कलेला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली आहे. एखाद्यावरील आपल्या निःसीम प्रेमाची ग्वाही देण्यासाठी, जीवनात झालेले अचानक झालेले चांगले-वाईट बदल, प्रिय व्यक्तीचा विरह किंवा मृत्यू, ईश्वरावरील किंवा सुष्ट आणि दुष्ट शक्तींवरील श्रद्धा किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, दुष्ट किंवा तांत्रिक शक्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून आणि अशा नानाविध घटना आणि कारणांना व्यक्त करण्यासाठी टॅटू हा एक मार्ग समजला जातो. या प्रक्रियेत वेदना सामावली असल्याने टॅटू हे शौर्य आणि धीराचे प्रतीक असल्याचेही मानले जाते. पाठीवर किंवा स्त्रियांच्या मानेमागे गोंदवलेले नाजूकसे फूल किंवा फुलपाखरू, पायाच्या घोट्यावर गोंदवलेले असेच एखादे नाजूकसे चिन्ह किंवा पुरुषांच्या दंडावर, छातीवर गोंदवलेले प्राण्यांच्या चेहऱ्यापासून ते ग्रीक आणि चिनी भाषेतील मुळाक्षरांपर्यंत चिन्हे वगैरे हे समोरच्याला आकर्षित करण्यासाठी करवून घेतलेले असतात. यांतील काही चिन्हांचा परामर्श लेखात पुढे घेऊच. गोळ्या आणि चॉकलेट्समधून मिळणारे टॅटूंचे तात्पुरते स्टिकर्स आणि या वेडाचा फायदा घेऊन च्युईंग गम किंवा फ्रूटबार खाऊन जिभेवर तात्पुरते टॅटू उमटवण्याचा प्रयोग यांतून टॅटूंची कला लहान मुलांतही प्रसिद्धी पावली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्राचीन काळापासून शृंगाराचे मानवाला वेड असल्याचे अनेक पुरावे देता येतात. हस्तिदंती फण्या, अत्तराच्या आणि काजळाच्या कुप्या, सुगंधी तेले, लेप, रंग यासारख्या सौंदर्य खुलवणार्‍या साधनांचे आणि कायमस्वरुपी शारीरिक शृंगार &lt;span style="font-size:+0;"&gt;म्हणता&lt;a href="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/9/97/Ghajini_Hindi.jpg"&gt;&lt;img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 324px; FLOAT: left; HEIGHT: 419px; CURSOR: hand" border="0" alt="" src="http://upload.wikimedia.org/wikipedia/en/9/97/Ghajini_Hindi.jpg" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt; यावे असे कान, नाक किंवा शरीराचे इतर भाग टोचणे, अंग गोंदवणे यांचेही मानवाला आकर्षण असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात हातावर, पायांवर आणि शरीराच्या अन्य भागांवर मेंदीची नक्षी काढणे ही देखील टॅटूसदृश कला मानली जाते. शाईने गोंदवण्यासारखी ती कायमस्वरुपी नसते एवढेच. अन्यथा, परदेशांत मेंदीला इंडियन टॅटू या नावाने सर्रास संबोधले जाते. मेंदीच्या नक्षींचे डाय वापरून अंग रंगवण्याची कलाकुसरही प्रसिद्ध आहे. इजिप्त, लिबियापासून भारतापर्यंत सर्व प्रदेशांत गेली हजारो वर्षे धार्मिक, सांस्कृतिक कार्यांत मेंदी लावण्याची प्रथा जोपासलेली आहे. भारतात मेंदीला सौभाग्यलंकार मानले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवपाषाणयुगातील सुमारे ५३०० वर्षांपूर्वी सापडलेल्या ऑत्झी या आदिमानवाच्या पाठीवर पट्ट्याप्रमाणे गोंदवलेल्या लहान रेषांचा समूह आणि पायांवर गोंदवलेली काही चिन्हे हे टॅटूचे जगातील सर्वात आद्य उदाहरण मानले जाते. इटली आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्स पर्वतात सापडलेल्या या मृतदेहाच्या अंगावर मोजून ५७ गोंदवल्याच्या खुणा सापडल्या आहेत. या गोंदवणांचे ऑत्झीच्या शरीरावरील स्थान ऍक्युपंक्चर पॉईंटसपाशी असल्याने कदाचित शारीरिक उपचार म्हणूनही ही गोंदवणे केलेली असावीत असा एक मतप्रवाह दिसतो. प्राचीन इजिप्त आणि लिबियामध्ये सापडलेल्या ममींच्या शरीरांवरही गोंदवल्याच्या स्पष्ट खुणा दिसून येतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्राचीन संस्कृतीत गोंदवून घेण्याची कारणे मात्र निराळी असावीत असा तर्क मांडला जातो. धार्मिक विधी म्हणून, ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी, एखादा ताईत किंवा मंत्र म्हणून, त्यागाच्या भावनेतून, आपण एका कबिल्याचे, जमातीचे आहोत हे ठसवून देण्यासाठी, गुलामांची-दास्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा शिक्षा म्हणूनही अंग चिन्हांकित करण्याची प्रथा अस्तित्वात आली असावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;टॅटू हा शब्द पाश्चिमात्य जगतात प्रथम आला तो पॉलिनेशियन बेटांमधील ताहिती येथील भाषेतून. कॅप्टन जेम्स कूक हा ब्रिटिश रॉयल नेव्ही मधील प्रसिद्ध नाविक होता. त्याने पॉलिनेशियन बेटांना दिलेल्या भेटींत अंग गोंदवलेली माणसे प्रथम पाहिली आणि इथूनच टॅटू हा शब्द आणि कला दोन्ही युरोपात शिरल्या. ताहितियन भाषेतील या शब्दाचा मूळ अर्थ फराटे मारणे असा होतो. इ. स. पूर्व १२०० पासून पॉलिनेशियन संस्कृतींमध्ये टॅटूंना स्थान असल्याचे दिसते. हाडे तासून त्याच्या सुया आणि काजळाचा वापर करून गोंदवण्याची प्रक्रिया केली जात असे. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत तोंडावर गोंदवणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते आणि गोंदवणावरून माणसाचे समाजातील स्थान ओळखण्याची पद्धत होती. मायन संस्कृतीत ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी आणि धार्मिक रीतिरिवाज म्हणून गोंदवण्याची पद्धत होती. जपानमध्येही गोंदवण्याची कला फार प्राचीन समजली जाते आणि गोंदवण्याचे पहिले पुरावे इ. स. पूर्व ३००० मधील आढळतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ख्रिस्ताचा क्रूस, भळभळा वाहणारे हृदय, अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक चिन्हे, आद्याक्षरे, नावे आणि असे अनेक टॅटू प्रत्येकाने आजवर पाहिले असतील परंतु टॅटूंच्या या विविध नक्षींना अर्थ असतो किंवा त्यातून एखादी भावना व्यक्त केलेली असते. काही प्रसिद्ध नक्षींबद्दल थोडक्यात माहिती पाहू:&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:0;"&gt;&lt;/span&gt;&lt;strong&gt;जहाजाचा नांगर:&lt;/strong&gt; जहाजाचा नांगर हे सावधानतेचे आणि सुरक्षिततेचे निशाण मानले जाते. खलाशी आणि जहाजावरील इतर कर्मचार्‍यांच्या मते नांगर हे जहाजाला बुडण्यापासून वाचवणारे सुचिन्ह आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;strong&gt;फुलपाखरू:&lt;/strong&gt; फुलपाखरू हे माणसाच्या आत्म्याशी संबंधीत असल्याचे मानले जाते. आनंद, तारुण्य व्यक्त करण्याचे चिन्ह म्हणूनही फुलपाखराचा वापर केला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गुलाब:&lt;/strong&gt; हे निःसीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते तसेच सौंदर्य आणि निकोपतेचे चिन्हही. प्रेमाची आणि सौंदर्याची रोमन देवता व्हीनस हिचे प्रतीक म्हणून गुलाबाचे गोंदवण केले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सर्प:&lt;/strong&gt; साप आपली कात टाकून नवा जन्म धारण करतो या भावनेतून साप किंवा नाग यांचे गोंदवण हे अमरत्वाशी संबंधीत मानले जाते. साप हे शक्तीचे प्रतीकही मानले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सिंह:&lt;/strong&gt; सिंह हा वनाचा राजा मानला गेल्याने सिंहाचे चिन्ह हे पुरुषत्वाचे, शौर्याचे, विजयाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मासा:&lt;/strong&gt; मासा हे प्राचीन ख्रिश्चन संस्कृतीचे प्रतीक ख्रिस्ताशी संबंधीत असल्याने माशाच्या रेखाकृतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;ड्रॅगन:&lt;/strong&gt; मानवाला भीती वाटेल असे आग ओकणार्‍या किंवा पंख विस्तारलेल्या ड्रॅगनचे गोंदवण हे भीतीवर मात केल्याचे किंवा संकटातून पुढे जाण्याचे चिन्ह मानले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सूर्य, चंद्र, तारे&lt;/strong&gt;: सिंहाप्रमाणेच सूर्य हे देखील पुरुषत्वाचे, शौर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते तर चंद्रकलांचा वापर जीवनातील टप्पे दाखवण्यासाठी केला जातो आणि चांदण्या हे आशेचे आणि आत्मिक आनंदाचे प्रतीक मानले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अग्नी:&lt;/strong&gt; अग्नी हे जीवनाचे प्रतीक मानले जाते. जीवनातील चांगल्या-वाईट क्षणांची आठवण म्हणून या गोंदवणाचा वापर होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पक्षी:&lt;/strong&gt; पक्षी हे प्रेमाचे, शांततेचे, ज्ञानाचे, आशेचे आणि आत्मसाक्षात्काराचे प्रतीक मानले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहान-मोठ्यांपासून सर्वांना आकर्षित करणार्‍या या टॅटूंबरोबर आरोग्याची सुरक्षितता आणि त्यामागील धोक्यांचे आकलन हे अतिशय महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. शरीरात किंवा त्वचेत सुया खुपसण्यातून अनेक त्वचारोग, टीबी, हेपॅटॅटिस आणि HIV ची आणि इतर रोगांची लागण होण्याची शक्यता असते . अमेरिकेत टॅटू स्टुडिओ उघडण्यासाठी विशेष परवानापत्र लागते तर सरकारमान्य नसलेल्या स्टुडियोंतून टॅटू लावून घेतल्यास त्या व्यक्तीस पुढील १२ महिन्यांपर्यंत रक्तदानाची मुभा नसते. टॅटू गोंदवणारी व्यक्ती कायद्याने सज्ञान असण्याची अट घातलेली आढळते किंवा काही वेळेस पालकांच्या परवानगीने टॅटू करवून घेता येतो. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठीच नाही तर बर्‍याचदा असा वैयक्तिक निर्णय भविष्यात चुकीचा वाटू शकतो आणि म्हणून हा निर्णय घेताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.&lt;br /&gt;गेल्या आठवड्यात एका मिटिंगमध्ये ग्रेग नावाचा एक अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार सहकारी प्रोजेक्टमधील काही महत्त्वांच्या घटकांवर समरसून चर्चा करत होता. कामाचे काही पेपर्स माझ्या दिशेने सरकवताना त्याच्या शर्टाची बाही थोडी वर सरकली आणि त्याच्या दंडावरील राखेतून जन्म घेणारा लाल-निळा फिनिक्स पक्षी माझी नजर वेधून गेला हे त्याच्या लक्षात आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“आय ऍम फिनिक्स,” ग्रेग मंद हसत कुजबुजला आणि एका लेखाचा जन्म झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;संदर्भ :&lt;br /&gt;बॉडी पिअर्सिंग ऍंड टॅटूज - जे. डी. लॉयडद बॉडी आर्ट बुक - जीन-क्रिस मिलरटॅटू - इंग्रजी विकिपीडिया&lt;br /&gt;चित्रे:&lt;br /&gt;अँजेलिना जोली - &lt;a href="http://www.chinadaily.com.cn/"&gt;http://www.chinadaily.com.cn/&lt;/a&gt; येथून साभार.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="image-right"&gt;गजीनीमधील आमीरचे चित्र - &lt;span style="font-size:+0;"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="image-right"&gt;&lt;span style="font-size:+0;"&gt;&lt;/span&gt;ममीचे चित्र - &lt;a title="www.smithsonianmag.com" href="http://www.smithsonianmag.com/"&gt;http://www.smithsonianmag.com/&lt;/a&gt; येथून साभार.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div class="image-right"&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-5764740295103799653?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/5764740295103799653/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=5764740295103799653' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/5764740295103799653'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/5764740295103799653'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2009/12/blog-post.html' title='टॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-8321223896759242651</id><published>2009-10-31T15:55:00.000-07:00</published><updated>2009-10-31T16:04:02.461-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>गाठ माझ्याशी आहे - २</title><content type='html'>“आई बाबा, हे बघा काय आहे माझ्या खोलीत. ” रविवारचा दिवस होता. सकाळी शम्मी उठली आणि खोलीतूनच जान्हवी आणि सुधीरला हाका मारू लागली.&lt;br /&gt;“काय गं? ” म्हणत सुधीर तिच्या खोलीत शिरला आणि आतलं दृश्य बघून चकित झाला. शम्मी पलंगावर उठून बसली होती आणि थरथरत होती. तिची खोली अस्ताव्यस्त होती. कपाटातले कपडे, पुस्तकं, तिचे खेळ खोलीभर पसरले होते पण सुधीरला जाणवले ते भिंतींवर खरडलेले शब्द. शम्मीच्या खोलीतल्या सर्व भिंतींवर कुणीतरी गिचमीड अक्षरांत "घर माझं आहे. " असं अनेकदा लिहून ठेवले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“हे काय आहे? ” जान्हवी आत येत म्हणाली तशी शम्मी ताडकन उठून जान्हवीला बिलगली.&lt;br /&gt;“मला नाही माहीत. मी नाही केलं. मी झोपले होते. मी नाही लिहिलं भिंतीवर. ” शम्मी थरथरत होती. जान्हवीने तिला आणखी जवळ ओढले आणि तिच्या लक्षात आले की शम्मीच्या हातावर काळे निळे वळ होते. जसे काही कोणाची तरी बोटे उमटली असावीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“हे काय आहे गं? हे वळ कसले? ” जान्हवीने काळजीने विचारलं.&lt;br /&gt;“कसले वळ आई? मला नाही माहीत. ” शम्मीने आपल्या हातांकडे पाहिलं आणि ती मुसमुसायला लागली.&lt;br /&gt;सुधीरने जान्हवीला इशारा केला तशी ती शम्मीला घेऊन खोलीबाहेर आली.&lt;br /&gt;“तू राजवाडेकाकांना फोन करून विचारतेस का जान्हवी? ” एकांतात सुधीरने जान्हवीला प्रश्न केला. त्याने सर्वात आधी फोन करून आपल्या साईटवरच्या माणसाला बोलवून खोली ताबडतोब रंगवून घेतली होती.&lt;br /&gt;“हो विचारते पण सुधीर या घरात काही वावगं नाही ना! ”&lt;br /&gt;“हम्म! काय वावगं असणार? तू फोन करून विचार काकांना. ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजवाडेकाका, जान्हवीच्या बाबांचे जुने मित्र. मुरलेले मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबईला त्यांची अनेक वर्षांची प्रॅक्टीस होती. आता वयोमानानुसार त्यांनी प्रॅक्टिस कमी केली असली तरी काही निवडक केसेस ते हाती घेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“काका, तुमचा सल्ला हवा होता. ” जान्हवीने तातडीने काकांना फोन लावला आणि घडला प्रकार सांगितला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“वयांत येणार्‍या मुलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या बदलांबाबत इतरांशी बोलावे, अडचणी सोडवून घ्याव्यात इतक्या समजूतदारपणाची अपेक्षा त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकत नाही आणि मग या बदलांना तोंड वेगवेगळ्या प्रकारे फुटते. मुले या काळात मूडी बनतात, आई-वडिलांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, आपल्या मित्र-मैत्रिणींवर अधिक अवलंबून राहतात किंवा आपल्याकडे आईवडीलांचे लक्ष वेधून घेण्याचे नवीन मार्ग अवलंबतात. शम्मी कदाचित तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असावी. ”&lt;br /&gt;“म्हणजे कसे? ” जान्हवीने कुतूहलाने विचारले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“तुला माझी एक केस सांगतो. एका सधन, सुशिक्षित घरातील नवरा बायको येऊन मला सांगायला लागले की त्यांच्या मुलीला भूतबाधा झाली आहे. तिच्या पाठीवर कुणीतरी फुल्या काढते, तिचे केस कुणीतरी ओढते आणि असे बरेच काही. आई-वडील हा भुताखेताचा प्रकार आहे म्हणून हवालदिल झाले होते. प्रत्यक्षात मात्र वाढत्या मुलीला आपल्या व्यवसायांत सतत व्यग्र असणार्‍या आईवडीलांचे लक्ष वेधून घ्यायचे होते. त्यांना काय सांगावे कसे पटवावे हे तिला कळत नव्हते पण असे काहीतरी केल्यावर आई-वडील आपल्याकडे लक्ष पुरवतात ही कल्पना तिला आली होती. शम्मीची केसही अशीच असावी का हे तूच मला सांग. या नव्या घरात तुम्ही आलात. तिची शाळा बदलली, परिसर बदलला, मित्र-मैत्रिणी बदलल्या याचा त्रास तिला होत असावाच ना आणि तो नेमक्या शब्दांत व्यक्त करता येतही नसावा कदाचित. आणखीही काही बदल असतील तर सांग बघू. ” काकांच्या बोलण्यात तथ्य वाटत होते.&lt;br /&gt;“काका, या नवीन घरात शम्मीला आम्ही तिची स्वतंत्र खोली दिली. घर मोठं आहे, खोल्याही आहेत. तिलाही पसंत होती. अक्षय मात्र अजूनही माझ्या बाजूला झोपतो. हे कारण असेल का? ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“असावे, असू शकते. शम्मी काही फार मोठी झालेली नाही. स्वतंत्र खोली हा विचार रात्री एकटं झोपायची वेळ येईपर्यंत उत्तम वाटतो परंतु एकांतात आई आपल्या लहान भावावर आणि आपल्यावर एकसमान प्रेम करत नाही अशी भावना मनात येऊ शकेल. शम्मीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवून बघ. तिला रोज नाही तरी अधेमधे तुमच्याबरोबर झोपायचे असेल तर तशी परवानगी दे. शाळेत जाऊन तिच्या टीचर्सशी बोल. एखाद्या टीचरचा किंवा वर्गातील मुलामुलींचा तिला त्रास होतो का याची चौकशी कर.... ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“काका, एक सहज प्रश्न विचारू? या सर्वामागे शम्मी नसून खरंच काही वेगळं असेल तर? ”“अगं वेगळं काय असणार आणि असलंच तर ते तुम्हा सर्वांनाच जाणवलं असतं ना? ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;जान्हवीच्या मनात काकांना तो भांडणाचा प्रसंग सांगण्याचे आले होते पण तिने स्वत:ला थांबवले. सुधीरच्या आणि सासूबाई-दादांच्या कानावर तिने काकांचा सल्ला घातला. सकाळी झालेल्या प्रकाराने सासूबाई थोड्या काळजीत होत्या.&lt;br /&gt;“शम्मीला रात्री आमच्याबरोबर झोपू दे. नको तिला खोलीत एकटीला. माझी झोप गाढ नसते हल्ली. लक्ष राहील तिच्यावर. ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“चालेल आई तसे करू. ” सासूबाईंचा बदलेला सूर जान्हवीला धीर देऊन गेला पण दिवसभरात तिच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरत होते. "खरंच! शम्मी असं काही करत असेल? " आणि काकांचे शब्दही मनात पिंगा घालत होते. - वेगळं काय असणार आणि असलंच तर ते तुम्हा सर्वांनाच जाणवलं असतं ना!&lt;br /&gt;रात्री सासूबाईंनी शम्मीला आपल्याजवळ झोपायला घेतले. अक्षय आणि सुधीरही झोपायला बेडरूममध्ये गेले होते. मागचं उरकून जान्हवी झोपायला आली आणि गादीवर टेकली. सुधीर आणि अक्षय शांत झोपले होते. तिने अक्षयच्या अंगावरची चादर सारखी केली आणि खिडकीकडे कूस बदलली. थंडगार वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत येत होती. तिने आपल्या अंगावरही चादर ओढली अन डोळे मिटले. किती वेळ गेला कोणजाणे, जान्हवीचा डोळा लागत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“घर माझं आहे. सोडून जा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. ” कुणीतरी कानात कुजबुजलं तशी जान्हवी ताडकन उठून बसली.“सुधीर, सुधीर ऊठ. कुणीतरी आहे इथे. ” जान्हवीचा आवाज घाबरा झाला होता.“काय आहे? ” सुधीर पुटपुटला.“अरे कोणीतरी कानात कुजबुजत होतं माझ्या कानात? ”“काहीतरीच काय? प्लीज झोप. मला लवकर उठायचं आहे उद्या. ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;जान्हवीने पुन्हा उशीवर डोके टेकवले. १०-१५ मिनिटे शांततेत गेली असावीत. पुन्हा तिच्या कानात तोच आवाज घुमला. यावेळेस आवाज गेल्यावेळेपेक्षा स्पष्ट होता आणि निर्जीव. जान्हवीच्या अंगावर काटा फुलला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“सुधीर ऊठ रे. खरंच कोणीतरी आहे इथे? ”“कुठे? कोण आहे? ” सुधीर झोपाळलेल्या आवाजात म्हणाला तरी त्याने जान्हवीचा थरथरता आवाज ऐकला होता.“असं कर. तू माझ्या जागेवर झोप. मी खिडकीकडे झोपतो. ”&lt;br /&gt;दोघांनी जागांची अदलाबदल केली आणि अगदी पाच मिनिटांत सुधीर घोरायला लागला. जान्हवीचा डोळा अद्याप लागला नव्हता पण तिने डोळे गच्च मिटून घेतले होते.&lt;br /&gt;“च्यायला! हे काय आहे? ” आता सुधीर उठून बसला होता. “माझ्याही कानात कोणीतरी बोलत होते. इतका थंडगार निर्जीव आवाज मी कधी ऐकला नव्हता. ” त्याने जान्हवी आणि अक्षय दोघांना जवळ घेतले. जान्हवीला हुंदका फुटला.&lt;br /&gt;“सुधीर, काहीतरी आहे रे या घरात. ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“मी चौकशी करतो. आजूबाजूचे, शेजारी, दुकानदार कोणाला तरी माहीत असेलच. ” दुसर्‍या दिवशी सकाळी घराबाहेर निघताना सुधीर म्हणाला. “मी निघतो आता. तुम्ही सगळे सांभाळून राहा. ”&lt;br /&gt;“सुधीर, हे घर सोडता येईल का रे? ” जान्हवी बिचकत म्हणाली. प्रश्नाचे उत्तर काय असावे ही कल्पना तिला होती.“कठिण आहे गं. पैसे गुंतवून बसलो पण तू काळजी करू नकोस. आपण मार्ग काढू. अशा घरात फार दिवस राहण्यात अर्थ नाही हे मलाही कळतंय. आई-दादा, तू, मुलं यांच्यापेक्षा पैसा मोठा नाही. तू राजवाडेकाकांना बोलावून घेतेस का? ते काय म्हणतात ते बघू किंवा एखादा शांतीपाठ करूया का?“आपण गृहप्रवेशाची पूजा घातली होतीच ना रे. असे उपाय काम करतात का ते कळत नाही. त्यापेक्षा मी राजवाडेकाकांना फोन लावते. ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजवाडेकाका येईपर्यंत घरात बरेच काही घडून गेले होते. कधी पावलांचे दणदणा आवाज, कधी खोल्यांतील सामान अस्ताव्यस्त होणे. एके रात्री जान्हवीला आपल्या अंगावरून कोणीतरी हात फिरवत असल्याचा भासही झाला पण तिला स्वत:पेक्षा मुलांची काळजी लागून राहिली होती. सासूबाईंचे ब्लडप्रेशरही थोडे वाढले होते. दादांनाही अस्वस्थ वाटत होते. आपल्या सर्वांव्यतिरिक्त घरात कोणीतरी आहे ही जाणीव प्रत्येकालाच होत होती. घराचे एकूण स्वास्थ्य बिघडले होते. राजवाडेकाका लोणावळ्याला आले त्यानंतरची गोष्ट...&lt;br /&gt;राजवाडेकाका आणि दादा बैठकीच्या खोलीत चहा घेत बसले होते. शम्मी शाळेत, सुधीर साईटवर, जान्हवी आणि सासूबाई स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होत्या. अक्षय घरातच खेळत होता. अचानक, दादांना त्याची हाक ऐकू आली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“आजोबा, मी उडी मारू? ”&lt;br /&gt;अक्षय वरच्या मजल्यावर पायरीच्या अगदी टोकाशी उभा होता. दादांनी त्याचे बोलणे नीटसे ऐकले नव्हते.&lt;br /&gt;“अरे मागे हो. किती कडेशी उभा आहेस. पडशील. ” म्हणत ते उभे राहिले.“उडी मारू का आजोबा? हा काका म्हणतोय की मार. ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजवाडेकाका आणि दादा दोघे ताडकन पायर्‍यांपाशी आले. दादांनी क्षणाचा उसंत न घेता पायऱ्या चढायला सुरुवात केली पण तोपर्यंत अक्षयचा पाय वरच्या पायरीवरून सटकला होता...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;***&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;संध्याकाळी सुधीर घरी आल्यावर राजवाडेकाकांनी विषयाला वाचा फोडली. जान्हवी अक्षयला कुशीत घेऊन बसली होती. अक्षयचा पाय मुरगळला होता. तो अधेमधे कण्हत होता पण काही गंभीर झाले नव्हते. जान्हवीच्या तोंडावरची रया मात्र पार ओसरली होती. सासूबाई आणि दादांच्या तोंडावरही तणाव दिसून येत होता.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“सुधीर, हे घर घेताना चौकशी केली होती? काही पूर्वातिहास वगैरे? ” राजवाडेकाकांनी विचारले.&lt;br /&gt;“पूर्वातिहास...म्हणजे” सुधीरचा आवाज अडखळला.. “या बंगल्याचा केअरटेकर होता गुलाबराव. दारुड्या होता. बंगला त्याच्या ताब्यात. मालकाच्या ऐटीत तोच वापर करत असे. माणूस मोठा रंगेल होता आणि बदमाशही असं म्हणतात. मी आजूबाजूला, किराणा दुकानात चौकशी केली तेव्हा कळलं की गेल्यावर्षी या घरातच त्याचा मृत्यू झाला. त्यात अनैसर्गिक काही नव्हते, अतिदारूपानाने मेला. दर दोन दिवसांनी बाहेरची बाग राखायला माळी येतो त्याला बंगल्यात हालचाल दिसली नाही तेव्हा घर फोडले. स्वयंपाकघराच्या भिंतीशी त्याचा देह मिळाला. ”&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;“काय आणि हे तू आम्हाला सांगितलेही नाहीस सुधीर. ” दादांनी काळजीने विचारले.&lt;br /&gt;“दादा, मला त्यात काही गैर वाटले नाही. घर रिसेलचे होते, नवे नाही. प्रत्येक घरात काही ना काही किस्से घडलेले असतातच. ”&lt;br /&gt;“गैर वाटले नाही? पोराच्या जिवावर बेतले आज. काही वेडेवाकडे झाले असते म्हणजे. गेले किती दिवस घरातले वातावरण बिघडले होते. ” सासूबाई जान्हवीकडे बघत म्हणाल्या.&lt;br /&gt;जान्हवीचे डोळे पाण्याने भरले. “स्वयंपाकघरात... " तिच्या अंगावर शहारे आले. "मला या घरात राहायचे नाही. ”&lt;br /&gt;“मी काही बोलू का? ” राजवाडे काका म्हणाले. “मला अक्षयला काही विचारायचे आहे. अक्षय राजा, तुला कोणी सांगितले पायरीवरून उडी मारायला? त्या काकाला काही नाव आहे का? ”&lt;br /&gt;“लाकशश काका. ”&lt;br /&gt;“काय म्हणतोय गं हा? ” राजवाडेकाकांनी काही न कळून विचारले तशी जान्हवीने अक्षयला पुन्हा तोच प्रश्न केला.&lt;br /&gt;“लाकशश काका. त्या भिंतीवर होता ना. ” स्वयंपाकघराकडे बोट दाखवत अक्षय म्हणाला.&lt;br /&gt;“राक्षस काका" विस्मयाने जान्हवी म्हणाली आणि तिला त्या भिंतीवरील धब्ब्यांची आठवण झाली. त्या धब्ब्यांत अक्षयला राक्षस दिसला होता आणि तो गुलाबराव त्याच भिंतीपाशी.... तिने अक्षयला जवळ घेतले आणि ती मुसमुसू लागली. “माझ्या मुलांच्या जिवावर उठला आहे राक्षस मेला. ”&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“किंवा तुम्हाला फक्त घाबरवायचा प्रयत्न करतो आहे. ” राजवाडेकाका म्हणाले.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;“काका तुम्ही पेशाने डॉक्टर. तुमचा या अशा अमानवी गोष्टीवर विश्वास आहे? ” सुधीरने विचारले.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“याला विश्वास म्हणावे की नाही ते मला माहीत नाही. वैद्यकशास्त्रात या जगातील प्रत्येक गोष्ट नमूद आहे असे नव्हे. इथे या घरात भूत, पिशाच्च, हैवान आहे असंच मला म्हणायचं नाही. कदाचित, चुंबकीय क्षेत्र असेल, एखादी ऊर्जा किंवा शक्ती असेल पण सोयीसाठी गुलाबरावाचे भूतच आहे असे मानू. प्रश्न हा आहे की ही शक्ती तुमच्या जिवावर उठली आहे किंवा तुम्हाला घाबरवते आहे का? तर मला वाटते हो. सध्या घाबरवते आहे पण तुम्ही घाबरत नाही म्हटल्यावर पुढचा प्रयत्न करून बघेलच आणि हे काही भूतपिशाच्चांबाबत होते असे नाही तर आपण सर्वच एक उपाय चालत नाही म्हटल्यावर दुसरा करून बघत असतो त्यातलाच प्रकार आहे.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;आपण मानूया की इथे गुलाबराव नावाचा अमानवी हैवान आहे आणि पुढे चलू. गुलाबराव या घराशी बांधलेला आहे. त्याच्या नजरेत तुम्ही परके आहात आणि या घरावर कब्जा करून आहात. म्हणतात की कधीतरी काळ एका क्षणी गोठतो. ती ऊर्जा त्या जागी, त्या वेळी सीमित होते. वैज्ञानिक भाषेत याची तर्कनिष्ठता पडताळून पाहता येईलच असे नाही पण गुलाबराव या घराशी अद्याप बांधलेला आहे हे टाळता येत नाही. आता पुढचे तुम्ही ठरवायचे. एक कुटुंब म्हणून तुम्हाला या घरात राहायचे आहे का ते? मला असं वाटतं की हे प्रकार बंद होणार नाहीत. पूजापाठ, शांतीपाठ यांनी फरक पडतो असे मला वाटत नाही. फारतर वातावरण बदलते, श्रद्धेचे बळ मिळते. अशा बदलेल्या वातावरणाचा फायदा तुम्हाला होईल पण तो तात्पुरताही असू शकतो. ”&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“मला अजिबात इथे राहायचे नाही. ” जान्हवीने निकराने सांगितले. “माझ्या मुलांना घाबरवेल, त्यांच्या जिवावर उठेल अशा जागी मला राहायचेच नाही. काका, हे घर सोडले तर हा उच्छाद थांबेल ना. हे घर त्या गुलाबरावालाच लखलाभ होवो. ”&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“थांब! इथे मुलांना घाबरवण्याचे प्रयत्न आहेत असं मला वाटत नाही. एक लक्षात घे. या घरातली सर्वात घाबरलेली व्यक्ती आहेत तू. तू दिवसभर घरात असतेस, तुला मुलांची काळजी आहे, घराची, नवर्‍याची, सासू-सासर्‍यांची काळजी आहे. मी तुला म्हटले तसे ही शक्ती या घराचा ताबा मागते आहे, या घरावर मालकी हक्क दाखवते आहे. अनेकांचे अनुभव सांगतात की अशा शक्ती त्या जागेपुरत्या मर्यादित असतात. घर सोडणे हा उत्तम पर्याय आहे पण अशा शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाही. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत. गुलाबराव या घराशी बांधलेला आहे. त्याची इच्छा, वासना, हक्क या घरावर असल्याचे तो तुम्हाला दाखवून देतो आहे. मला वाटतं की विषाची परीक्षा न बघता तुम्ही हे घर सोडावेत. बाकी निर्णय तुमचा आहे. ” राजवाडेकाकांनी सुधीरकडे पाहत म्हटले.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“काका, घर सोडणे ही काही सोपी गोष्ट नाही. ”&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“अरे, हा रोजचा त्रास आणि भीती बाळगणं सोपं आहे का रे? ” सासूबाई अक्षयच्या पायावरून हलकेच हात फिरवत म्हणाल्या. दादांनीही राजवाडेकाकांच्या मताला अनुमोदन दिले. जान्हवी तर काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हती. शेवटी, सुधीरने मुंबई-पुण्यात निदान भाड्याने घर घ्यावे असे ठरले आणि तोपर्यंत शांतीपाठ करून घ्यायचा असा सर्वांनी निर्णय घेतला.&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;***&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;घर घेई-घेईपर्यंत पुढचे तीन चार महिने गेलेच. साग्रसंगीत शांतीपाठाने घरातले वातावरण निवळल्यासारखे झाले होते. या तीनचार महिन्यांत त्रास झाला नाही असे नाही पण जिवावर बेतेल असे काही झाले नाही. कदाचित, लवकरच आपल्याला घराचा ताबा मिळणार आहे हे गुलाबरावलाही कळले असावे.&lt;br /&gt;कोथरुडसारख्या गजबजलेल्या वस्तीत सुधीरने फ्लॅट घेतला तेव्हा जान्हवीला हायसे वाटले. शहरात वातावरण कसं मोकळं असतं. माणसांची, वाहनांची वर्दळ, रोजच्या कामांत माणूस इतका गुंतलेला असतो की वेडेवाकडे विचार करायलाही त्याला वेळ नसतो. शाळेचे वर्ष संपत असताना शम्मीची ऍडमिशन होणे कठिण झाले होते पण ओळखी काढून सुधीरने कशीबशी शम्मीच्या शाळेची व्यवस्थाही केली. जान्हवीने अक्षयलाही बालवाडीत घातले होते. पुढल्या वर्षी त्याचीही शम्मीच्या शाळेत ऍडमिशन होणार होती. या नव्या घरात कसं सर्व सुरळीत झालं होतं.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="font-size:+0;"&gt;&lt;/span&gt;&lt;div align="left"&gt;दुपारची वेळ होती. बाहेर टळटळीत ऊन पडले होते. शम्मी आणि अक्षय दोघेही शाळेत गेले होते. बेडरूममध्ये जान्हवी धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करण्यात मग्न होती. रस्त्यावरील रहदारीचा आवाज तिला सुखावून जात होता. मध्येच रस्त्यावर ओरडणारा फेरीवाला सर्व काही आलबेल असल्याचं सांगून जात होता. बेडरूमच्या खिडकीकडे तिची नजर गेली आणि तिला लोणावळ्याच्या घरातल्या मोठ्या खिडक्या आठवल्या. त्या खिडक्यांपेक्षा शहरातली ही काडेपेटीसारखी खिडकीच बरी. तिच्या डोक्यात विचार आला आणि ओठांवर स्मितहास्य.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“जान्हवी, इथे जरा स्वयंपाकघरात येतेस का? ” सासूबाई स्वयंपाकघरातून बोलावत होत्या.&lt;br /&gt;“आले हं! ” जान्हवीने हातातील शर्ट टाकला आणि ती बेडरूमच्या दरवाज्याकडे वळली. दारात तिची पावलं एकदम थबकली. तिला आठवलं की आज ती घरात एकटीच होती. सासूबाईंना झाल्या प्रकारातून थोडासा बदल हवा होता म्हणून दादा आणि सासूबाई आज सकाळीच मेधाकडे बडोद्याला गेले होते. जान्हवीच त्यांना सकाळी बसमध्ये बसवून आली होती. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;राजवाडेकाका म्हणाले होते, ' या शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाहीत. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत.' &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;गुलाबराव आता त्या घराशी बांधलेला नव्हता.....&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;(एका तथाकथित सत्यघटनेवर आधारीत)&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;color:#ff6600;"&gt;हॅपी हॅलोवीन&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-8321223896759242651?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/8321223896759242651/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=8321223896759242651' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/8321223896759242651'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/8321223896759242651'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2009/10/blog-post_4769.html' title='गाठ माझ्याशी आहे - २'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-965341965482478118</id><published>2009-10-31T15:28:00.000-07:00</published><updated>2009-10-31T16:01:43.784-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>गाठ माझ्याशी आहे - १</title><content type='html'>"बरं, ते काय आहे सांग बघू. " जान्हवीने आकाशातून स्वस्थ विहरणार्‍या ढगाच्या एका लहान पुंजक्याकडे बोट दाखवले."अम्म्म.... ते माऊ आहे. " अक्षय खिदळत म्हणाला आणि जान्हवी त्याच्या हसण्यात सामील झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मायलेकांचा हा खेळ दर संध्याकाळी चाले. मुंबईच्या उपनगरातल्या इमारतीच्या लहानशा खिडकीतून दिसणार्‍या टीचभर आकाशात ढगांचे विविध आकार शोधायला जान्हवीने अक्षयला शिकवले होते. सुधीरची वाट बघता बघता अंधार पडायचा. दादा आणि सासूबाई फिरायला बाहेर तरी जायचे. शम्मीच्या अभ्यासामुळे जान्हवीला तेही करता येत नव्हते. सकाळी सहा वाजता उठून सुधीरचा डबा, मुलांचे डबे, शाळा, सकाळचा स्वयंपाक, बाजारहाट, संध्याकाळचा स्वयंपाक, मुलांचे अभ्यास यांत जान्हवीचा जीव मेटाकुटीला येत असे. सुधीरला गेले सहा महिने पुणा-मुंबई हायवेवर एका रिसॉर्टच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले होते. तो आठवड्यातले २-३ दिवस तिथेच राहत असे. मध्येच यावंस वाटलं तर उठून रात्री उशीरा घरी येई आणि सकाळीच उठून चालता होई. सासूबाईंची तब्येतही गेले काही दिवस नरमच होती. बीपी वाढले होते, डायबिटीसही सुरू झाला होता. त्यांचं पथ्यपाणी बघावं लागे. संसाराच्या रगाड्यात जान्हवी पिचून जात होती. अडीच वर्षांचा अक्षयच काय तो तिचा विरंगुळा होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आई, झाला होमवर्क. मी थोडावेळ टीव्ही बघू? " शम्मी विचारत होती.&lt;br /&gt;"हो बघ. " जान्हवी खिडकीतून उठत म्हणाली. संध्याकाळचे साडेसात वाजत आले होते. आज शुक्रवार असल्याने सुधीर घरी यायचा होता. जान्हवीने त्याचा मोबाईल नंबर फिरवला."सुधीर, निघालास का रे? कधीपर्यंत पोहोचतो आहेस? "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो हो निघालो आहे. पोहोचेन तासा-दोन तासांत. ट्रॅफिकवर अवलंबून आहे गं. तसं फारसं ट्रॅफिक नाहीये आज. बऱ्यापैकी वेळेत पोहोचेन म्हणतो. तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. घरी आल्यावर बोलू. पोरांना जेवायला वाढून झोपायला सांग. बाबा उद्या खेळेल म्हणावं. बाहेरही घेऊन जाईल किंवा त्यांना सांग की मला यायला थोडा उशीरच होणार असं. आई-बाबांना मात्र थांबायला सांग. तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे. बरं ठेवतो. " सुधीरने मोबाईल बंदही करून टाकला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जान्हवीने ओठ मुडपला. 'असं काय सांगायचं आहे याला? आणखी एखादे प्रोजेक्ट मिळाले असेल. आता उरलेल्या दिवशीही घरी येत नाही, असे सांगतो का काय? ' जान्हवीच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पडले आणि तेवढ्यात दाराची बेल वाजली.&lt;br /&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;शम्मीने धावत जाऊन दार उघडले. संध्याकाळचा फेरफटका मारून सासूबाई आणि सासरे परतले होते. "अगं, कोपर्‍यावरच्या भय्याकडे ताजी मेथी दिसत होती. मी दोन जुड्या आणल्या. उद्या सकाळी पालेभाजी करूया. मी मेथी निवडून ठेवते, " म्हणत सासूबाई घरात शिरल्या आणि थेट स्वयंपाकघरात घुसल्या. त्यांच्या मागोमाग जान्हवीही स्वयंपाक घरात आली. "मी पोळ्या करायला घेते. सुधीरला फोन केला होता, दोन तासांत येईल म्हणाला. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"माझ्यासाठी एकच लाट गं पोळी. संध्याकाळचं नको वाटतं हल्ली जड खाणं. मी येऊ का मदतीला? ""नको. आधी मुलांसाठी करते. त्यांना जेवायला वाढते आणि मग आपल्या करते. " जान्हवी सासूबाईंशेजारी गेली. "म्हणत होता काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मुलांना झोपव. " जान्हवी हलकेच म्हणाली."हं! आता काय बाई आणखी नवीन? " सासूबाईंनी डोळे मोठे केले तशी जान्हवीने खांदे उडवले. सासूशी जान्हवीचे सूत जमत होते. जान्हवी कॉलेजात असताना तिची आई गेली. आपल्या सुनेला आई नाही याची खंत जान्हवीच्या सासूला होती. त्या प्रेमाने जान्हवीचे करत. सुधीर एकटाच मुलगा त्यामुळे त्याच्यावरच आई वडिलांची जबाबदारी होती. त्यांची मोठी मुलगी मेधा बडोद्याला असे. तिच्याकडेही कधीतरी सासू-सासऱ्यांचे जाणे होई पण सासूबाईंची तब्येत हल्ली मलूल झाल्यापासून त्यांनी बाहेरगावी जाणे बंद केले होते.&lt;br /&gt;&lt;span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;घरातल्या कामांत, मुलांचं पाहण्यात त्यांची पूर्वी खूप मदत व्हायची पण आताशा तब्येत खालावल्यापासून त्या स्वतःला सांभाळूनच सर्व करत. जान्हवीलाही त्याची जाणीव होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुलांची जेवणं उरकली तशी जान्हवीने 'बाबाला यायला उशीर होणार आहे. बाबा उद्या तुम्हाला बाहेर घेऊन जाईल. आता झोपायला जा. ' अशी समजूत घालायला सुरुवात केली. अक्षयला फारसा फरक पडला नव्हता. तसाही त्याला जान्हवीचा लळा जास्त होता. शम्मी मात्र हिरमुसली झाली होती. तिची समजूत काढता काढता जान्हवीच्या नाकी नऊ आले. शेवटी, दादांनी तिला गोष्ट वाचून दाखवण्याचे कबूल केले तशी ती आजोबांबरोबर पाय आपटत का होईना पण झोपायला गेली. पावणे दहाच्या सुमारास सुधीर परतला तोपर्यंत मुले झोपली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"लवकर येत जा रे. किती उशीर करतोस? जेवायचे थांबले आहेत सगळे. " घरात शिरतानाच आईंनी सुधीरला दटावले."अगं आई, तू जेवून घेत जा ना. तुला आताशा बरं नसतं, कशाला उशीरापर्यंत जेवणाची वाट बघत बसता. मी जान्हवीलाही सांगितलं आहे की तू जेवून घेत जा मुलांसोबत. " बुटांचे बंद सोडता सोडता सुधीर म्हणाला."अरे, तू कधी येतोस कधी येत नाहीस. आलास तरी उशीरा उगवतोस. काळजी वाटत राहते रे. घास उतरत नाही घशाखाली. त्यापेक्षा थांबलेलं बरं, " सुधीरच्या आई टेबलावर ताटं मांडत म्हणाल्या."काळजी नको गं करूस? मी काय अक्षयच्या वयाचा आहे का आता? चल जेवायला बसूया. जान्हवी तू पण ये गं. " म्हणत सुधीर बेसिनपाशी हात धुवायला गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जान्हवीने सुरण आणि वांग्याची भाजी ताटात वाढली. काळ्या वाटाण्यांची आमटी वाटीत काढली आणि दोन गरमा गरम फुलके प्रत्येकाच्या ताटात वाढले. सुधीरला जेवताना काहीतरी गोड लागते म्हणून सासूबाईंनी केलेला आंब्याचा मुरंबाही वाढला आणि सगळे जेवायला बसले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पोरं झोपली का गं? " सुधीरने पहिला घास तोंडात टाकायच्या आधी प्रश्न केला.&lt;br /&gt;"हो रे झोपली. काहीतरी सांगायचं म्हणत होतास ना. तूच म्हणालास की झोपव. शम्मी कुरकुरत होती पण झोपली एकदाची. " जान्हवी म्हणाली.&lt;br /&gt;"अगं हो, तसं त्यांच्यापासून लपवण्यासारखं काही नाही. निवांत बोलायला मिळावं म्हणून त्यांना झोपव म्हटलं. "&lt;br /&gt;"आणखी एखादं प्रोजेक्ट गळ्यात बांधून घेऊ नकोस म्हणजे झालं. त्या पोरांना बाप, जान्हवीला नवरा आणि आम्हाला मुलगा म्हणूनही कधीतरी वेळ देत जा. स्पष्टच सांगतो. " दादांनी सुधीरच्या मनातलं जसं काही ओळखलंच होतं.&lt;br /&gt;"दादा, नवं प्रोजेक्ट तर आहेच. धंदा जमतो आहे. चांगली संधी मिळाली तर सोडवत नाही. उद्याचं कोणी पाहिलं आहे. दिवस बरे आहेत. हवी तशी संधी चालून आली आहे. सोडावी कशी? " सुधीर आवाज पाडून म्हणाला.&lt;br /&gt;"अरे पण.. " आईंनी जान्हवीकडे बघत म्हटले. जान्हवी गप्प होती. डोकं खाली करून पोळीचे तुकडे करत होती.&lt;br /&gt;"अगं आई, ऐक तर खरी. लोणावळ्यापासून २५ एक किलोमीटर आत एक नवा रिसॉर्ट बनतो आहे. दोन वर्षांचं प्रोजेक्ट आहे. ज्या बिझनेसमनचं आहे त्याने या कामावरून लोणावळा आणि पुढे पुण्याजवळ आणखी कामे मिळवून देईन अशी ऑफर दिली आहे. माझी सगळी कामाची माणसंही तिथेच राहतात. एक मीच ये-जा करतो मुंबईपर्यंत. "&lt;br /&gt;"तिथेच राहणार का रे मग तू आता? " जान्हवीने एकदाचे तोंड उघडले. तिच्या आवाजातली निराशा स्पष्ट जाणवत होती.&lt;br /&gt;"हो असं म्हणतो आहे खरं. " मंद हसत सुधीर म्हणाला "पण एकटा नाही, आपण सर्वांनीच तिथे शिफ्ट करूया असा विचार करत होतो. "&lt;br /&gt;"काऽऽय? हे मुंबईतलं घर सोडून लोणावळ्याला? " जान्हवी वैतागून म्हणाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मग त्यात वाईट काय? तूच विचार कर. या लहान घरात इतक्या माणसांची किती कुतरओढ होते. मुलांना बाहेर खेळायला धड जागा नाही. दादा-आई संध्याकाळचे ट्रॅफिकमध्ये जीव मुठीत धरून फिरायला जातात. मला रोज घरी यायला जमत नाही. तुला सगळ्यांचं काम पडतं. मुंबईत नोकर टिकत नाहीत. या मुंबईच्या प्रदूषणात आईची तब्येत म्हणावी तशी सुधारत नाही. पोरं मला भेटायला आतुर असतात. या सगळ्यापेक्षा आपण सर्व एकत्र एके ठिकाणी राहिलो, बंगल्यात... तर... " बंगल्यावर जोर देत एका दमात सुधीरने सर्व यादी दिली.&lt;br /&gt;"बंगल्यात? " जान्हवी आश्चर्याने म्हणाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तलवारसाहेबांनी, म्हणजे हे नवं प्रोजेक्ट ज्यांचं आहे त्यांनी, एक बंगला दाखवला त्यांच्या मित्राचा. मित्र मुंबईत राहतो पण सुट्टीत म्हणून बंगला बांधला होता लोणावळ्याला. मध्यंतरी त्यांची बायको गेली. त्यांचंही आता वय झालं तसं त्यांच्याच्याने आडगावी जाणं होत नाही. बंगल्याचा केअर टेकर होता म्हणे इतके वर्ष पण तोही आता राहिला नाही तेव्हा ते बंगला विकायचं म्हणत होते. तलवार म्हणाले की मी मध्यस्थी करतो. तुम्हा सर्वांना पसंत असेल तर रविवारीच बोलणी करता येतील. " ताटावरून उठत सुधीर म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जान्हवीची आणि सासूबाईची नजरानजर झाली पण दोघी काहीच बोलल्या नाहीत. दादा पानावरून उठताना तोंडात पुटपुटले, "सर्व ठरवूनच आला आहे हा. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वयंपाकघरातलं आवरून जान्हवी बेडरूममध्ये शिरली तेव्हा तिचा चेहरा साफ पडलेला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अगं काय जान्हवी. मुंबईपेक्षा लोणावळा चांगला नाही का? आणि लोणावळा म्हणजे काही खेडेगाव नाही. " सुधीर पलंगावर फायली मांडून पाय ताणून बसला होता. जान्हवीने त्या फायली एक एक करून बंद करायला सुरुवात केली. "अगं, लोणावळ्याला राहिलो तर हा एकांताचा वेळ मलाही मोकळा मिळेल ना. घरी कामं घेऊन यायला नको. " सुधीरचा स्वर समजुतीचा होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो रे पण शम्मीची शाळा, तिच्या मित्र-मैत्रिणी, आपला शेजार सगळं सोडून जायचं? आणि शम्मी मोठी झाली की कॉलेजसाठी पुन्हा मुंबई पुण्याला नको का यायला? "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"अगं, तेव्हाचं तेव्हा बघू. धंद्यात जम बसला की पुण्याला फ्लॅट घेता येईल. आई-दादांचंही तोपर्यंत कसं असेल काही सांगता येतं का? ही काही वर्षं आपण सर्वांनी मजेत मोठ्या घरात घालवली, आई दादांना-पोरांना मोकळं फिरता-खेळता आलं तर काही बिघडणार आहे का? लोणावळ्याला चांगल्या शाळा आहेत. मी चौकशी करून ठेवली आहे. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हम्म! तू सर्व काही ठरवूनच आला आहेस सुधीर. " जान्हवीला आपलं काही चालणार नाही याची जाणीव झाली.&lt;br /&gt;"नाही गं। शम्मीला विचारूया. ती तयार असेल तर जाऊ. अक्षय लहान आहे. लहान मुलं चटकन मागचं विसरतात पण शम्मीला शाळा सोडताना, मित्रमैत्रिणी सोडताना त्रास होईल हे कबूल आहे. आपण तिच्याशी बोलूया. ती मानली तरच जाऊ. " सुधीर नरमाईने म्हणाला पण जान्हवीला एव्हाना खात्री झाली होती की आपण आता लोणावळ्याला जाणार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;***&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;बंगल्याबाहेर गाडी थांबली तसा सुधीर झटकन उतरला आणि मोठ्या झोकात वाकून त्याने जान्हवीसाठी दरवाजा उघडला.&lt;br /&gt;"उतरा मालकीणबाई. " &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;जान्हवीने गाडीतून उतरून सभोवार नजर टाकली. रस्त्यावर एकापेक्षा एक सुंदर बंगल्यांची रांग होती. सकाळच्या उन्हात तलवार साहेबांचा बंगला तळपून निघाला होता. प्रथमदर्शनातच जान्हवीला बंगला आवडून गेला. सुधीरने फाटकाचं कुलूप उघडलं आणि दोघेही आत आले. गेटमधून गाडी आत घेता येईल इतक्या जागेवर डांबरी सडक होती पण सुधीरने गाडी बाहेरच उभी केली. बंगला अद्याप त्यांच्या नावावर व्हायचा होता. सडकेच्या दुतर्फा हिरवळ वाढली होती पण अंगण चांगलं राखलेलं होतं. लगबगीने जाऊन सुधीरने दाराचे कुलुप काढले आणि दरवाजा उघडला. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;सकाळचे ऊन घरात पडले होते. जान्हवीने भराभरा सर्व खोल्यांत जाऊन घराची पाहणी केली. घर प्रशस्त होते. मोठ्या हौसेने बंगला बांधला असावा हे पाहता क्षणीच लक्षात येत होते. मुख्य दरवाज्यासमोर बैठकीची खोली, तिथून वरच्या मजल्यावर जाण्यास जिना आणि स्वयंपाक घराचे प्रवेशद्वार. स्वयंपाक घराला लागून डायनिंग रूम आणि त्यानंतर एक बेडरूम. वरच्या मजल्यावर तीन बेडरूम होत्या. मास्टर बेडरूम घराच्या एका टोकाला होती. जान्हवीला ती पाहता क्षणीच आवडली. प्रायव्हसी असावी तर अशी. बेडरूमला मोठी खिडकी होती. ती पाहून जान्हवीला मुंबईच्या घराची खिडकी आठवली. तिने खिडकी उघडली आणि खिडकीतून टेकड्या आणि वनराईचे दृश्य बघून ती हरखून गेली. आकाशात ढगांचा पुंजका धीम्या गतीने विहरत होता. तिला चटकन अक्षयची आठवण आली. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;"पायर्‍यांवर सांभाळायला हवं नाही अक्षयला. त्याला घरात जिना असण्याची सवय नाही. " जान्हवी म्हणाली.&lt;br /&gt;"अगं, होईल सवय. " बेफिकिरीने सुधीरने उत्तर दिले. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;स्वयंपाकघर प्रशस्त होते. जान्हवीला पाहताक्षणीच ते आवडले. इंग्रजी एलच्या आकारातले प्रशस्त ओटे, त्यावरील कॅबिनेट्स, भिंतीतलं लाकडी कपाट. स्वयंपाकघराच्या एका भिंतीवर धब्बे दिसत होते.&lt;br /&gt;“सुधीर अरे इथे पाणी गळतंय असं दिसतंय. बघ लीकेज आहे कुठेतरी भिंतीत. ”“अगं, हा मी घरचा प्लंबर आहे. काळजी कशाला करतेस. मी बोलावून घेतो काही मजूर आणि कामाला लावतो. घरात इतर कुठे काही डागडुजी करायची आहे ती देखील करून घेऊ आणि रंगही देऊ, राहायला यायच्या आधी. फक्त तुला घर आवडलं म्हणून सांग की झालं. ” &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;घरात न आवडण्यासारखं काही नव्हतंच. बाजारहाट, शाळा, डॉक्टर सर्वांची चौकशीही सुधीरने करून ठेवली होती. घर मोक्याच्या ठिकाणी होते. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“आपला मुंबईचा फ्लॅट विकायचा का रे? ठेवला तर भविष्यात उपयोगाला येईल ना! पुढे मागे शम्मी कॉलेजात गेली की. ”“अगं, मुंबई नको वाटते बघ आणि या बंगल्यासाठी पैसे उभारायचे तर तो फ्लॅट विकूनच उभारायला हवेत आणि फार पुढचे विचार करू नकोस गं. शम्मीला कॉलेजात जायला अजून वेळ आहे. तेव्हाचं तेव्हा बघू. ” जान्हवी बेत फिसकटवते की काय असा सूक्ष्म विचार सुधीरच्या मनात आला.“बरं! घर छानच आहे. तू करून घेतोस ना जरा रंगरंगोटी वगैरे. ” जान्हवी म्हणाली आणि सुधीरला हायसं वाटलं. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;मे महिन्याच्या शेवटी सुधीर आणि जान्हवीने संसार लोणावळ्याला हालवला. शम्मीच्या शाळेची ऍडमिशन झाली होती. सुधीरने घराची डागडुजीही करून घेतली होती. बागेसाठी माळी आणि घरकामासाठी बाईही ठेवून घेतली. सुधीरने आपल्या काही माणसांच्या मदतीने घर लावून घेतलं. जान्हवी आणि सासूबाईंना फारशी दगदगही होवू दिली नाही. संध्याकाळच्या सुमारास जान्हवी, मुले आणि सुधीरचे आईबाबा पोहोचले तेव्हा हे घर राहते नाही असे कोणालाही वाटले नाही. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;अक्षय मात्र आल्यापासून जरा नाखूश होता. त्याला नेमकं काय सांगावं हे कळत नव्हतं पण आपण आपल्या घरी कधी जायचं असं त्याने जान्हवीला दोन-चारदा विचारलं. आता हेच आपलं घर आहे हे त्याला कसं समजावून सांगावं हे जान्हवीला कळत नव्हतं. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी सकाळीही अक्षय सर्वात आधी उठून बसला. “मलाही नं जरा वेगळं वेगळं वाटतंय. मुंबईच्या काडेपेटीसारख्या घरात राहण्याची सवय झाली होती. ” जान्हवी सुधीरला म्हणाली. “आपण गृहप्रवेशाची पूजा करायची का रे? ” &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“करू ना. जरा सर्व स्थिरस्थावर होऊ दे मग सावकाश करूया. ”“बरं. त्यानिमित्ताने जरा आजूबाजूच्यांशी ओळखीही होतील. ” जान्हवीने अक्षयला उचलले आणि ती बेडरूमच्या बाहेर आली.“हे बघ. जिना हळूच उतरायचा. गडगडशील हं नाहीतर आणि भू होईल. चल आपण दूदू पिऊया. ” &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;जान्हवीने अक्षयला ओट्यावर बसवला आणि दुधाची पिशवी फोडून तिने दूध गरम करायला ठेवले. “नीट बस हं. एकदम उडी मारू नकोस. ” नव्या घराची अक्षयला ओळख करून देताना सर्व सूचना देणेही गरजेचे होते. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;"लाकशश"&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;“काय रे? ”&lt;br /&gt;“आई तो बग, लाकशश" अक्षय स्वयंपाकघराच्या भिंतीकडे बोट दाखवत म्हणाला. जान्हवीने वळून पाहिले तर भिंतीवर पुन्हा पाण्याचे धब्बे दिसत होते. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“सुधीर ए सुधीर. हे बघ रे काय? ” जान्हवीने सुधीरला हाक दिली.&lt;br /&gt;सुधीर खाली येईपर्यंत सासूबाईही स्वयंपाकघरात पोहोचल्या होत्या. “अगं काल नव्हते हे डाग. ”&lt;br /&gt;“हो नं, आम्ही पहिल्यांदा घर बघायला आलो ना तेव्हा होते डाग आणि सुधीर म्हणाला की मी रिपेअर करून घेतो. असं रे काय काम करतात तुझी माणसं? ” &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;सुधीर डोळे विस्फारून भिंतीकडे बघत होता. “असं कसं झालं बुवा? मी स्वत: हजर होतो काम सुरू होते तेव्हा आणि मी इतरांच्या कामात हलगर्जी करत नाही तर स्वत:च्या घरात कसा करेन? ” &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“पावसाळा सुरू होईल रे लवकर आणि मग आणखी गळायला लागेल. छतावरून तर गळत नाहीये ना पाणी. माणसांना जरा वर चढून बघायला सांग. डांबर घालायचं असेल गच्चीवर तर घालून घेऊ. ” दादांनी स्वयंपाकघरात डोकावत सल्ला दिला.&lt;br /&gt;“मी करून घेतो. रंगाचा हातही पुन्हा द्यायला सांगतो. ” उतरत्या आवाजात सुधीर म्हणाला. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;पावसाळा सुरू होऊन महिना झाला होता. गेले दोन चार दिवस पावसाची संततधार लागली होती. शम्मी दुपारी शाळेतून येऊन वरच्या मजल्यावर अभ्यासाला बसली होती. दादा आणि सासूबाई मराठी सिरियल बघण्यात दंग होत्या आणि अक्षय दुपारची झोप काढत होता. साडेतीन वाजून गेले तशी जान्हवी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. चहाचे आधण ठेवले तशी वरच्या मजल्यावरून पावलांचे दाण दाण आवाज ऐकू येऊ लागले. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“ए शम्मी! नाचत्येस का गं? अभ्यास कर. ” जान्हवी खालूनच ओरडली.&lt;br /&gt;“नाही आई अभ्यास करत्ये. ” &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;जान्हवी पुन्हा चहाकडे वळली पण पावलांचा दणदणाट कमी झाला नाही. जान्हवीने गॅस बंद केला आणि ती वरच्या मजल्यावर गेली. “शम्मी तुला सांगितलं ना एकदा की इतक्या जोरात नाचू नको. करत्येस काय नक्की? उड्या मारत्येस का? ” जान्हवी शम्मीच्या खोलीत डोकावली. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“नाही आई. अभ्यास करत्ये. सायन्सच्या मिसने केवढा होमवर्क दिला आहे माहित्ये. ” शम्मी जमिनीवर पुस्तकांचा पसारा मांडून बसली होती.&lt;br /&gt;“खोटं! मी खाली होते तर पायांचा दणदणा आवाज येत होता. तो तू नाहीस तर कोण करत होतं? ” जान्हवी आवाज मोठा करून म्हणाली. शम्मी मुद्दाम खोडकरपणा करत असावी.&lt;br /&gt;“हे काय गं आई! यू डोंट बिलीव मी. मी सांगितलं ना की अभ्यास करत होते. ” शम्मीचा आवाज रडवेला झाला. हे अस्त्र आईवर हमखास काम करते हे तिला माहीत होते.&lt;br /&gt;“बरं बरं! कर अभ्यास. ” जान्हवी जिना उतरून खाली आली. पुन्हा आवाज आला तर हळूच जाऊन शम्मीला एक धपाटा घालायचे तिने ठरवले होते पण पुन्हा आवाज आला नाही. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;काही दिवसांनंतरची गोष्ट. सुधीर सकाळीच घराबाहेर पडला होता. जाताना शम्मीला शाळेत सोडून जाणार होता. जान्हवी मागचं उरकत होती. सासूबाई आणि दादा दोघेही आज त्यांच्या खोलीबाहेर आले नव्हते म्हणून शेवटी जान्हवीने जाऊन त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. दादांनी दार उघडले. सासूबाई पलंगावर बसल्या होत्या. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“हे काय आई? बरं आहे ना, बाहेर नाही का यायचं? चहा निवून गेला. ”&lt;br /&gt;“तिला म्हणावं की तू जा. येईन मी बाहेर मला यायचं तेव्हा. उगीच मनकवडेपणा करण्याची गरज नाही. ” सासूबाई फणकार्‍याने म्हणाल्या.&lt;br /&gt;“अं! असं काय झालं? ” काही न कळून जान्हवीने विचारले.&lt;br /&gt;“काही नाही. तू जा इथून. तुझ्याशी एक शब्दही बोलण्याची इच्छा नाही माझी. ” सासूबाईंचा हा अवतार जान्हवीला नवा होता.&lt;br /&gt;“अहो पण काय झालं ते तरी सांगा. चुकलं का आमचं काही? सुधीर काही म्हणाला का? ”&lt;br /&gt;“सुधीर कशाला काही म्हणायला? आम्ही आमच्या मुलाला चांगले संस्कार दिले आहेत. आई बापांना उलटूनही बोलत नाही तो कधी. शिव्याशाप तर दूरची गोष्ट. ”&lt;br /&gt;सासूबाई काय बोलताहेत त्याचा अर्थ जान्हवीला लागत नव्हता. “कोणी शिव्याशाप दिले? मला सांगता का आई की काय सुरू आहे. ”&lt;br /&gt;“तू दिलेस. ऐकले आम्ही काल रात्री. तू भांडत होतीस सुधीरशी तो काल रात्री उशीरा आला म्हणून आणि इतक्या घाणेरड्या शिव्या तुझ्या तोंडात. शी शी! आमच्या कानावर पडल्या तर आम्हालाच लाज वाटली. काय बिघडवलं आहे गं सुधीरने तुझं? घरासाठीच खपतो ना आणि त्याला इतक्या अर्वाच्य शिव्या? त्याची आई आहे मी. ऐकवल्या नाहीत. “ सासूबाईंनी तोंड वेंगाडले. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;"काहीतरीच काय बोलताय आई? मी कशाला सुधीरला शिव्या घालू? असं का म्हणताय तुम्ही तेच कळत नाही मला. माझं आणि सुधीरचं मोठ्या आवाजात बोलणंही नाही झालं काल. भांडण तर नाहीच नाही. सुधीर उशीरा आला ही गोष्ट खरी पण तो इतका थकला होता की जेवला आणि सरळ वर झोपायला गेला. मी मागचं उरकून वर जाईपर्यंत त्याला झोपही लागली होती. ” &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;“मग मी ऐकलं ते खोटं की मला तुझा आवाज कळत नव्हता? यांनी थांबवलं म्हणून नाहीतर मी तेव्हाच बाहेर येणार होते. ”&lt;br /&gt;जान्हवीने दादांकडे पाहिलं, “दादा तुम्हीही? ”&lt;br /&gt;“जे ऐकलं ते किळसवाणं होतं. निदान बायकांच्या तोंडीतरी.. जाऊ दे! याबाबतीत मला अधिक काही बोलायचं नाही. ” दादांनी मान फिरवली. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;जान्हवीच्या डोळ्यांत पाणी तरारलं. तिने हात तोंडावर दाबला आणि ती धावतच वरच्या मजल्यावर बेडरूममध्ये धावली आणि पलंगावर झोकून देऊन तिने अश्रूंना मोकळीक दिली. दिवसभरात सासूबाई फारशा खोलीबाहेर आल्याच नाहीत. दुपारचे जेवणही त्यांनी टाळले तशी जान्हवीने फोन करून सुधीरला लवकर घरी यायला सांगितले. संध्याकाळी सुधीर घरी आल्यावर तिने हळूच त्याच्या कानावर प्रकार घातला. त्यालाही आईच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटले. त्याने समजुतीने आई-वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण फारसा उपयोग झाला नाही. निदान सुधीरच्या समजवण्याने त्या दोघांनी रात्री दोन घास तरी खाल्ले. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;संपूर्ण दिवसभर जान्हवीचे तोंड उतरले होते. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला तोंड दाबून स्वीकारावी लागत होती. रात्री खोलीत थोडा एकांत मिळाला तेव्हा तिने ही व्यथा सुधीरकडे बोलून दाखवली.&lt;br /&gt;“काही कळत नाही गं। आई अशी एकदम बिथरल्यासारखी का वागते आहे ते. तिला मी किती समजावण्याचा प्रयत्न केला तर म्हणाली तू बायकोची बाजू घेऊ नकोस. तुला काही स्वाभिमान आहे की नाही. ऐकूनच घेत नाही ती, आणखी काय समजावू तिला. त्यामानाने दादा निवळल्यासारखे वाटले. जान्हवी, तू समजूतदार आहेस. मला वाटतं की पुढचे काही दिवस तू मोठ्या मनाने घे. काही दिवस गेले की सर्व सुरळीत होईल. ”&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;जान्हवीने कूस बदलली आणि खिडकीकडे तोंड केले। बेडरूमच्या मोठ्या खिडकीतून चंद्राचे चांदणे आत येत होते. जान्हवीला मुंबईच्या घरातल्या खिडकीची आठवण झाली. पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाशात लखलखत होते. अचानक ढगाचे सावट चंद्राला ग्रासून गेले आणि खोलीही काळोखात बुडली तशी जान्हवीने डोळे गपकन मिटून घेतले. रात्री तिला विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात एक सावली तिच्या उशाशी उभं राहून तिला निरखत होती. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;त्यानंतर पुढचे काही दिवस सासूबाई तुटक तुटक वागत होत्या. जान्हवीने जवळीक साधायचा प्रयत्न केला परंतु फारसा उपयोग झाला नाही. सर्वांच्याच वागण्यात एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता।&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;***&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;(क्रमश:)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-965341965482478118?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/965341965482478118/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=965341965482478118' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/965341965482478118'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/965341965482478118'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2009/10/blog-post_31.html' title='गाठ माझ्याशी आहे - १'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-2812896692038833190</id><published>2009-10-15T15:42:00.000-07:00</published><updated>2009-10-15T16:52:33.707-07:00</updated><title type='text'>तिर्‍हाइत</title><content type='html'>आज कामाचा कंटाळा आला होता म्हणून वेळेवर घरी निघायचं ठरवलं. कधी नाही ते अनायसे रस्त्यावर ट्रॅफिकही कमी होते. मुलीला संध्याकाळी डान्स रिहर्सलला घेऊन जायचे होते म्हणून जेवणाचा करण्याचा बेत कॅन्सल होता. पिझ्झा ऑर्डर केला की काम भागणार होतं. घरी पोहचले तसे कळले की मुलीच्या मैत्रिणीची आई दोघींना घेऊन जाणार आहे. नवर्‍याला उशीर होणार आहे. प्रायवसी!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरी यायला नेहमीप्रमाणे उशीर नाही, आल्यावर स्वयंपाक करायचं टेन्शन नाही, पुन्हा कुठेतरी धडपडत बाहेर पडायची घाई नाही. पावले आपोआप संगणकाच्या दिशेने वळतात. गेले दोनचार रात्री जागून एक लेख कितीतरी महिन्यांनी कसाबसा पूर्ण केला, आज काहीही उरलेले नाही... ब्लॉग लिहावा का असा विचार मनात डोकावतो आणि मन उदास होते. गेले कितीतरी महिने ब्लॉगवर चक्करसुद्धा मारलेली नाही. या महिन्यांत काही घडले नाही असे नाही। उलट बरेच काही घडून गेले पण मनात आलेले लिहावेसे वाटलेच नाही एवढेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इतक्या दिवसांनी पाहिल्यावर स्वत:चाच ब्लॉग परका वाटतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या जगात, आपल्या माणसांत आपणच तिर्‍हाइत आहोत ही जाणीव हुरहुर लावणारी आहे. एखाद्या आवडत्या गोष्टीपासून, जागेपासून किंवा व्यक्तीपासून फारकत घेतल्यावर निर्माण होणारा दुरावा मनाला बोचतो कधीतरी. नेमकं वाईट कशाचं वाटतं? माणसं, जागा आपल्याला दुरावतात याचं? कोण जाणे..दुराव्यापेक्षाही आपल्यालाही कोणीतरी इतक्याच ओढीने मिस करत असेल का हा चुकार प्रश्न मनात डोकावतो याचं. आपल्या आठवणीनेही कोणी बेचैन होत असेल का याचं आणि आपण आपल्याच विश्वात तिर्‍हाइत होतो याचं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणखी काय लिहावं? मगासपासून ५ वेगवेगळे परिच्छेद लिहून पुसले. म्हणजे लिहिण्यासारखं काही नाही किंवा आहे पण उतरवायचे नाही. शब्द जसे परके झाले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिर्‍हाइत नजरेने मी माझ्या ब्लॉगकडे आणि माझ्या ब्लॉगने माझ्याकडे पाहण्याचा परकेपणा या विस्कळीत शब्दांनी का होईना पण संपवावा म्हणते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-2812896692038833190?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/2812896692038833190/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=2812896692038833190' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/2812896692038833190'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/2812896692038833190'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='तिर्‍हाइत'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-6845625903128413234</id><published>2009-01-17T16:35:00.000-08:00</published><updated>2009-01-17T16:44:49.147-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्फुट'/><title type='text'>दयामरण हवे का नको?</title><content type='html'>&lt;span style="color:#3366ff;"&gt;आजचा सुधारकमध्ये श्रीमती मंजिरी घाटपांडे यांचा दयामरणाला अनुमती देण्याबद्दल लेख प्रकाशित झाला होता. तो &lt;/span&gt;&lt;a href="http://mr.upakram.org/node/1386#comment-26114"&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;येथेही&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt; वाचता येईल. त्या लेखाला प्रतिक्रिया म्हणून माझी अंकात प्रकाशित झालेली प्रतिक्रिया येथे देत आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;hr /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वप्रथम, मंजिरीताईंचे एका चांगल्या लेखाबद्दल आणि वेगळ्या विचारांवर मत मांडण्यास उद्युक्त केल्याबद्दल धन्यवाद.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मरण हे एकमेव शाश्वत सत्य आहे असे मानले तरी सतत मरणाचा विचार करून मनुष्य जगत नाही हे देखील सत्यच आहे. वेळ-काळ योजून जनन नियोजीत करता येते त्याप्रमाणे माणसाला मरणही नियोजीत करता यावे, तो हक्क त्याला बहाल करण्यात यावा यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत पण त्याला बहुतांशवेळा अपयशच मिळाले आहे. मरण नियोजीत करण्याचे इच्छामरण आणि दयामरण या दोन वेगळे प्रकार आहेत असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;इच्छामरण &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;इच्छामरण मागण्यासाठी/ अवंलबण्यासाठी मनुष्य हा मानसिक दृष्टीने सक्षम असायला हवा. आपण स्वेच्छामरणाचा निर्णय घेतो आहोत यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा. सदर कृत्य तो एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा भरीला पडल्याने करत नाही हे त्याला सिद्ध करून देता यावे. सदर निर्णय झटक्यात घेता येणार नाही हे लक्षात घेता, व्यावहारिक दृष्ट्या ही गोष्ट किंचित कठीण वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्महत्या हा पलायनवाद झाला. अत्यंत निराशेपोटी माणूस तो अवलंबतो परंतु त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन अयोग्य वाटते. इच्छामरणाला आत्महत्या म्हणावे का याबाबत साशंकता वाटते. आत्महत्याही बहुधा गुप्तता राखून किंवा मागचा पुढचा विचार न करता झटक्यात घेतलेल्या निर्णयाने केली जाते. इच्छामरणासाठी आपली आणि आपल्या आप्तांची मनाची तयारी करून देणे गरजेचे वाटते. भीष्म पितामहांनी जे अवलंबिले ते इच्छामरण कारण शरशय्येवरूनही ते पांडवांना उपदेश करत राहिले, इतरांना पूर्ण कल्पना देऊन प्राण त्यागला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सावरकरांचे मरण हे इच्छामरणच असावे. अशाप्रकारचे मरण अवलंबताना मी आणखीही काही वृद्धांना पाहिले आहे. त्यांची वासना कमी होत जाऊन अन्नपाण्याचा त्याग केला जातो हे समाजात घडताना पाहिले आहे. त्यावर कायदा आक्षेप घेतो असे दिसत नाही. परंतु हे न होता, आपले मरण इतरांनी आपल्याला बहाल करावे असा विचार म्हणजे इतरांकडून आपला खून करवून घेणे आहे असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुर्गाबाईंनी म्हटल्याप्रमाणे&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते.&lt;br /&gt;&lt;/blockquote&gt;&lt;br /&gt;प्रत्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते. कॅन्सरमुळे होणार्‍या असह्य वेदनांतून जाणारी आणि तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणारी एक लहान मुलगी मी पाहिली आहे तर मायग्रेनमुळे जीव द्यावासा वाटतो म्हणणारी प्रौढ माणसंही पाहिली आहेत. यावरून शारिरीक वेदनांचे आणि सहनशक्तीचे मापदंड ठरवणे हे कठीण काम वाटते. दुसरं म्हणजे, विनायातना मरण यावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वैद्यकी पेशाला ती साजेशी गोष्ट वाटत नाही. खुट्ट झाले की मरण पाहिजे असे लोक म्हणू लागले तर वैद्यकशास्त्राचा हा पराभव मानावा लागेल. वैद्यकशास्त्र सहसा माणसाचे जीवन सुकर व्हावे या हेतूने कार्य करते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखाद्याचे जगून संपलं आहे हे तरी कितपत खरे? अमेरिकेत राहून ८० वर्षांचे वृद्ध प्रवास करतात, खेळतात, प्रेमात पडतात, लग्न करतात त्यांचे मला अतिशय कौतुक वाटते. एकदाच मिळालेल्या आयुष्याचा उपभोग ते अद्यापही घेत आहेत याची जाणीव होते. जगात थोड्या अधिक फरकाने प्रत्येकाला आपण आणि आपले आप्त हे अमरत्वाचा पट्टा घेऊन अवतरले आहेत असे वाटत असते. आपल्या मृत्युची घटका जवळ आल्याचे लक्षात येताच ती लांबवावी कशी याचा विचार सर्वसामान्य माणसांच्या मनात येतो. आयुष्यात कधीतरी निराशेपोटी मरणाचा विचार मनात आला तरी प्रत्यक्ष आत्महत्येपर्यंत पोहोचणारी माणसे अतिशय थोडकी असतात आणि एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला/ फसला म्हणून पुन्हा पुन्हा करणारी त्याहूनही कमी असतात आणि जी असतात त्यांना मानसिक व्याधी असल्याचे मानले जाते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेखात आलेल्या सॉक्रेटिसच्या उदाहरणावरून पाश्चात्य जगात आत्महत्येला प्रतिष्ठा होती असे वाटत नाही. सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती आणि तीतून सुटण्याचे मार्ग नाकारत त्याने दिले गेलेले हेम्लॉक प्याले अशी कथा वाचण्यास मिळते. समाधी या मृत्युला मात्र प्रतिष्ठा असावी परंतु ती देखील संन्यास घेतलेल्यांसाठीच मर्यादीत असावी असे वाटते. अशाप्रकारे जपानमधील सामुराई योद्ध्यांनाही प्रसंगी आपले प्राण घेण्याचे शिक्षण दिले जाई परंतु तेही त्या गटापुरतेच मर्यादित वाटते आणि समाज संकल्पना वाटत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दयामरण&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दयामरणाचे मला वाटतं दोन प्रकार असतात - स्वसंमतीने मागितलेले दयामरण आणि परसंमतीने अंमलात आणलेले दयामरण. यापैकी स्वसंमतीने मागितलेले दयामरण हे इच्छामरणाशी जुळते वाटते. परसंमतीने अंमलात येणार्‍या मरणाबद्दल मात्र कायद्याने अनेक बंधने येतात. ब्रेनडेथ, मरगळलेल्या भाजीसारख्या किंवा तत्सम अवस्थेत असलेल्या रुग्णाला डॉक्टर्स, कुटुंबीय आणि कायदा यांच्या सहाय्याने दयामरण देणे एकवेळ ठीक वाटते परंतु अशक्यप्राय परिस्थितीतूनही परत येणारे रुग्ण आहेतच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुन्हा येथे सांगावेसे वाटते की जननात हस्तक्षेप झाला म्हणून मरणात हस्तक्षेप करावा ही वैद्यकशास्त्रामागील शुद्ध हेतूची धारणा नसावी (चू. भू. दे. घे.) येथेही मरणासन्न जीवाला दयामरण द्यायचे झाले तर कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यावर मतभेद दिसतात. मरणप्राय रुग्णाचा जीवनाधार काढून घेणे हे डॉक्टरने करणे म्हणजे फाशीची शिक्षा अंमलात आणणार्‍या जल्लादाप्रमाणे झाले असा मतप्रवाह दिसतो. तर, देण्यात येणारे उपचार हळू हळू कमी करून मृत्यु द्यावा असा दुसरा विचारप्रवाह दिसतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संपूर्ण प्रतिसादाचा गोषवारा इतकाच की स्वेच्छामरण/ इच्छामरण या कल्पना सुखदायी वाटल्या तरी कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने त्यात बर्‍याच अडचणी निर्माण होणे शक्य आहे आणि जगातील कोणताही समाज अद्याप या कल्पना राबवण्यास तयार आहे असे वाटत नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-6845625903128413234?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/6845625903128413234/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=6845625903128413234' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/6845625903128413234'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/6845625903128413234'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2009/01/blog-post.html' title='दयामरण हवे का नको?'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-6170603304716009966</id><published>2008-12-04T16:19:00.000-08:00</published><updated>2008-12-04T16:35:37.213-08:00</updated><title type='text'>का?</title><content type='html'>कितीतरी दिवसांत या ब्लॉगवर काही लिहिलं नाही. हल्ली लिहावसं वाटत नाही. लिहिण्यासारखं काही नसतं.वेळ नसतो, वाचन नसतं, इच्छाही नसते. मनात येणारे विचार मूर्त स्वरूपच घेत नाहीत. का त्यांनी मूर्त स्वरूप घेऊ नये अशी माझी इच्छा असते? ठरवण्यात मी असमर्थ आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जेव्हा लिहिता येत नव्हतं तेव्हा लिहिण्याची जबरदस्त इच्छा होती, मनात आलेलं सर्व उतरवून ठेवावसं वाटायचं. जसजसं लिहिता येऊ लागलं तसतसे विषय कमी होत गेले. मनापासून लिहिण्याची ओढ कमी झाली. लोक वाचू लागले, लेखन त्यांच्यासाठी येऊ लागले. माझ्यासाठी काहीच नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अजूनही मी लिहिते - लेख उतरतात पण ते माझ्यासाठी लिहिलेले नसतात. लोक वाचतात, त्यांना आवडेल, त्यांना रुचेल, त्यांना पटेल असं लिहिते. लोक ओळखतात, लेखन ओळखतात, शैली ओळखतात, चुका दाखवतात, अपेक्षा करतात. मी त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करते. पण माझ्या अपेक्षा अपूर्ण राहतात. मला काय लिहायचं आहे हे ठरवता येत नाही. लोकांना काय वाचायचं आहे याचा मात्र कधीतरी ठाव घेता येतो. लेखनातला प्रामाणिकपणा कमी झाला आहे. अतृप्ततेची भावना मनात सतत घोटाळते. काहीच साध्य होत नसल्याची तक्रार डोक्यात असते. अस्वस्थता इतरांवर फटके मारण्यास भरीला का पाडते याचे उत्तर मिळत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी माझ्यासाठी लिहित नाही. का? कारण शोधते आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-6170603304716009966?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/6170603304716009966/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=6170603304716009966' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/6170603304716009966'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/6170603304716009966'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2008/12/blog-post.html' title='का?'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-2290267573792327233</id><published>2008-10-21T02:32:00.000-07:00</published><updated>2008-10-21T03:43:36.637-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>वळणावर ती येते</title><content type='html'>&lt;p&gt; हल्ली मी भल्या पहाटेच उठून ऑफिसला पळायची सवय केली आहे. लवकर पोहोचलं की भराभर कामं आटोपून लवकर निघताही येतं. संध्याकाळी क्लबला जाऊन निवांत गॉल्फ खेळायला वेळ मिळतो. दिवसभर बैठं काम करणार्‍यांना काहीतरी व्यायाम हा हवाच. गॉल्फच्या निमित्ताने व्यायाम होतो, ऑफिसात शिणलेलं डोकं शांत होतं आणि संध्याकाळ बरी जाते. नाहीतर माझ्यासारख्या सड्याफटींग माणसाने घरी एकट्याने काय करायचं हा मोठा प्रश्न असतो.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;पहाटेचा मी घराबाहेर पडतो तेव्हा बाहेर मिट्ट काळोख असतो. गाडीच्या प्रकाशात रस्ता दिसतो तेवढाच, बाकी सर्वत्र अंधाराचे राज्य. गेले आठ-दहा दिवस मी मुख्य रहदारीचा सोडून एक लहानसा शॉर्टकट घेतो आहे. हा रस्ता एकपदरी आणि अरुंद आहे, वळणावळणांचा नागमोडीही आहे. गाडीचा वेगही बराच कमी ठेवावा लागतो पण मायलेज आणि गॅस बर्‍यापैकी वाचतो आणि धडधडत ऑफिस गाठण्यापेक्षा रमत गमत, शीळ घालत, पहाटेचा वारा खात जाण्यात काही और मजा असते. ऑक्टोबर लागल्यापासून गेले काही दिवस हवा थंड झाली आहे तरी गाडीच्या काचा खाली सरकवून आरामात प्रवास होतो. या रस्त्याच्या एका बाजूला मोठा तलाव आहे आणि दुसर्‍या बाजूला रान माजलं आहे. त्या रानामागे उंचच उंच झाडं पसरली आहेत. काळोखात तळ्यातल्या पाण्यावर शुभ्र धुकं तरंगताना काहीतरी रहस्यमय आकार घेताना दिसतं. पहाटेच्या मंद वार्‍यात पानांची सळसळ स्पष्ट ऐकता येते. आजकाल आकाशही बरेचदा ढगाळलेलं असतं. आकाशात संथ वाहणारे ढग चंद्राला झाकोळून टाकतात तेव्हा काळोख आणि मंद प्रकाशात प्रवास करताना एक अनोखा थरार जाणवतो. मात्र निसर्गाचं हे लोभस रुप हे एवढेच हा शॉर्टकट घेण्याचे कारण नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;मुख्य रस्ता सोडून या लहान रस्त्याला लागलं की फर्लांगभर अंतरावर रस्ता अचानक वळतो. इथे गाडीचा वेग अतिशय कमी करावा लागतो, फारतर ५-१० मैल. गाडीने वळण पूर्ण केल्याशिवाय पुढे काय आहे याचा पत्ताही लागत नाही. वळण धोकादायक असल्याची पाटीही येथे दिसते. वेग किंचित जास्त असेल तर बाजूच्या झाडावर आपटून किंवा समोरून येणार्‍या वहानाने धडक दिल्याने कपाळमोक्ष ठरलेला. आधीही बरेच अपघात झाले आहेत म्हणतात इथे पण इतक्या पहाटे इथे वर्दळ नसते आणि गेल्या आठ दिवसांत मी हे वळण अंगवळणी पाडलं आहे...... कारण वळणावर ती दिसते.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;भल्या पहाटे फेरफटका मारायची सवय असावी तिला. पांढरा सफेत टिशर्ट आणि पँट घालून पाठीवर रुळणारे केस सावरत रोज ती याच वळणावर नजरेस पडते. चंद्रप्रकाशात तिचं रुप पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मती गुंग होणे म्हणजे नेमकं काय ते कळून आलं. इतकं अप्रतिम लावण्य घेऊन स्वर्गातली अप्सरा तर रोज इथे येत नसावी ना अशी शंका मनाला चाटून गेली आणि भारावल्यासारखा रोज मी या वाटेने येऊ लागलो. गाडीचा वेग वळणावर कमी केला की तिला निरखण्यात जो आनंद जिवाला होतो त्याचं वर्णन शब्दांत केवळ अशक्य आहे. त्या वळणावर केवळ क्षण दोन क्षण ती मला दिसत असावी. नंतर माझी गाडी वळते आणि ती दिसेनाशी होते पण त्या एका झलकेसाठी मी वेडा झालो आहे. कधीतरी तिला थांबवून विचारण्याचा, तिची चौकशी करण्याचा मोह होतो पण अजून हिम्मत बांधलेली नाही. तिची ओळख काढायची अनिवार इच्छा आहे हे निश्चित, मात्र काहीतरी रहस्यमय आहे तिच्यात, जे मला तिच्याकडे खेचतं आणि थांबवूनही ठेवतं.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;तिच्याशी ओळख काढून घ्यायला मी का थांबलो आहे यावर गेले काही दिवस विचार करतो आहे. माझी भीड, सभ्यता की आणखी काही?  तसा मी बायकांच्याबाबत प्रसिद्ध नसलो तरी माझं व्यक्तीमत्व कोणावरही छाप पाडणारं आहे. बायकांशी सभ्यतेने बोललं की त्यांच्याकडून फारसा विरोध होत नाही ओळख करून घेण्यात असा अनुभवही गाठीशी आहे. &lt;/p&gt;&lt;p&gt;वळणावर गाडीचा वेग कमी केला की तिच्याकडे क्षणभर का होईना निरखून पाहता येतं. ते काळेभोर केस, कपाळावर रुळणार्‍या बटा, सरळ चाफेकळी नाक, नाजूक जिवणी आणि डोळे. तिचे डोळे वेगळे आहेत, मोठे आहेत तिला शोभूनही दिसतात पण तेजहीन आहेत. गाडीच्या अंधुक प्रकाशातही त्यातील भाव ओळखण्याचा मी प्रयत्न केला आहे. तिचे डोळे निष्प्राण नाही..नाही निष्प्राण कसे असतील? पण थिजलेले आहेत. ते डोळे तर मला तिच्याशी ओळख वाढवून घेण्यापासून थांबवून ठेवत नाही ना हा प्रश्न मनाला मी दोन चारदा विचारला आहे पण निश्चित उत्तर मिळत नाही. तिच्याकडे पाहून काल स्मितहास्यही केलं होतं पण तिच्या त्या डोळ्यांत अस्पष्ट कुतुहलाखेरीज दुसरे कुठले भाव दिसले नाहीत.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;आज घरातून निघताना लक्षात येतं आहे की आकाशात ढगांची गर्दी जमलीये. चंद्र क्वचित ढगांआडून बाहेर डोकावतो आहे तेवढाच. गाडीत बसता बसता पावसाचे दोन थेंब डोक्यावर शिडकतात. 'आज येईल का ती?’ मनात तिचेच विचार घोळत असतात. पावसाला सुरुवात होते. ती घरातून आधीच निघाली असेल तर पाऊस तिला गाठणार हे नक्की पण ती पावसाच्या अंदाजाने निघालीच नसेल तर? आज तिचं दर्शन होणार नाही. एक अनामिक हुरहुर माझ्या मनात जमा होत होती. 'आज ती दिसली तर गाडी थांबवायची. तिची ओळख काढायची. तिला गाडीत येण्याची विनंती करायची. तिला विचारायचं..... पण काय...... काय विचारायचं? ’ गाडी सुरू करता करता माझ्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. काय विचारायचं? तिला काहीतरी विचारायचं असं मी मनाशी ठरवलं होतं पण नेमकं काय ते उलगडत नव्हतं. जिवाची घालमेल होत होती.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;गाडी मुख्य रस्ता सोडून शॉर्टकटला लागली तेव्हा पाऊस रिपरिपत होता. रोजच्या वेगापेक्षाही मी थोड्या कमी वेगातच गाडी हाकत होतो. वळणावर ती येईल या आशेवर.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;आणि वळणावर ती उभी होती. ओलीचिंब. तिचे ओले कपडे तिच्या भरदार शरीराला चिकटून बसले होते आणि तिच्या सौष्ठवाची जाणीव प्रकर्षाने करून देत होते. ओलेत्या बटा कपाळाला चिकटल्या होत्या. ती त्या मागे न सारता तशीच उभी होती. जशी कुणाची तरी वाट पाहत असावी. मी गाडी थांबवली, काच खाली सरकवली आणि चटकन गाडी अनलॉक केली. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;"या लवकर, आत बसा. मी सोडतो घरी. " ती आत येईल की नाही अशी शंका मनाला चाटून गेली. तिने शांतपणे दरवाजा उघडला आणि ती सावकाश आत येऊन बसली. मी गाडी सुरु केली.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;"कुठे सोडायचं तुम्हाला? " मी सहज आवाजात विचारलं.&lt;br /&gt;"इथूनच पुढे. " ती माझ्याकडे न पाहता काचेतून सरळ बघत म्हणाली. तिच्या आवाजात गोडवा होता पण एक अनामिक रुक्षपणा त्यात भरलेला होता. घरी पोहोचण्याची घाई त्यात नव्हती की अनोळखी माणसाबरोबर त्याच्या गाडीत बसल्याची भीती. तिच्या आवाजात माझ्याशी बोलण्याची उत्सुकताही दिसत नव्हती. तरीही तिला बोलतं करणं भाग होतं. मी तिला मोजक्या शब्दांत माझी  करून दिली. मी काय करतो, कुठे राहतो हे सांगता सांगता एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती,  वातावरणात गारवा होता. ती ओलीचिंब होती पण तिच्या अंगावर शहारा नव्हता. तिला थंडी वाजत होती किंवा ती थंडीने थरथरत असल्याचे मुळीच जाणवत नव्हते. मी तिच्या गोर्‍यापान भिजलेल्या हातांकडे बघत होतो. अचानक तिला स्पर्श करण्याचा अनावर मोह मला झाला आणि ओळख करून दिल्यावर मी एक हात स्टिअरींगवर घट्ट रोवून दुसरा हात हस्तांदोलनासाठी पुढे केला. तिने सावकाश नजर माझ्याकडे वळवली आणि माझा हात हातात घेतला. &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;एक जबरदस्त सणक माझ्या डोक्यात गेली.....तिचा हात बर्फासारखा थंड होता. जिवंत माणसाचा हात असा थंड नसतो. त्यात धुगधुगी जाणवते, ती तिच्या स्पर्शात जराही नव्हती. मी कोणाबरोबर गाडीत बसलो होतो? माझ्या बाजूला बसलेली ही तरुणी कोण? मी गोंधळलो आहे पण घाबरलेला नाही.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"माझा? " मी चकित झालो होतो. तिची नजर आता माझ्यावर रोखलेली होती पण त्यात आता कुतूहल नव्हते एकतर्‍हेचा विषाद जाणवत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आठ दिवसांपूर्वी, " ती क्षणभर थबकली आणि पुढे बोलू लागली "तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलेत आणि तेव्हापासून रोज त्या वळणावर आपण एकमेकांना दिसतो. "&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो, " मी आवंढा गिळला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"वर्षभरापूर्वी माझा त्या जागेवर अपघात झाला होता. तेव्हापासून मी इथे... " म्हणजे माझी शंका खरी होती. ही तरुणी जिवंत नाही. तिचे ते थिजलेले डोळे, मोकळे केस, पांढरे कपडे सर्वांचा संदर्भ लागत होता. माझ्या गाडीत, माझ्या शेजारी बसलेली ही बाई मानवी नाही... पण मला जे विचारायचे होते ते हे नव्हतेच ते तर यापुढे होते.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;"आणि मी? " माझे शब्द घशात विरतात का काय वाटून गेले.&lt;br /&gt;पाऊस थांबला होता. चंद्रावरचं ढगाचं सावट बाजूला होत होतं. चंद्रप्रकाशात आता समोरचा परिसर उजळून निघाला होता.&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;“मी इथे कधीपासून?”&lt;br /&gt;"आठ दिवसांपासून. मी तुम्हाला वळणावर दिसले आणि रस्ता वळताना तुम्ही पुन्हा मागे वळून पाहिलंत. " ती पुन्हा तेच सांगत होती पण या वेळेस माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता. हेच तर तिला गेले आठ दिवस विचारायचं होतं पण त्या प्रश्नाचं उत्तर आज माझं मलाच मिळालं होतं.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;तिला पुन्हा एकवार पाहावं म्हणून मी त्या दिवशी गाडीच्या रिअर-मिररमध्ये डोकावून पाहिलं होतं पण आरशात कोणीच दिसलं नाही तेव्हा चमकून मान वळवून मागे पाहिलं होतं आणि त्या वळणावर गाडीवरचा ताबा सुटला होता.&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="font-size:130%;color:#ff6600;"&gt;&lt;strong&gt;हॅपी हॅलोवीन!!&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-2290267573792327233?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/2290267573792327233/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=2290267573792327233' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/2290267573792327233'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/2290267573792327233'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2008/10/blog-post_21.html' title='वळणावर ती येते'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-7226027019513180456</id><published>2008-10-15T17:06:00.000-07:00</published><updated>2008-10-15T17:07:53.137-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्फुट'/><title type='text'>कुमारी देवी</title><content type='html'>ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुमारी देवीची प्रथा नेपाळात फार प्राचीन नसल्याचे सांगितले जाते. सुमारे १२ व्या ते १७ व्या शतकांदरम्यान कधीतरी ही प्रथा अस्तित्वात आली. आख्यायिकेनुसार नेपाळी राजाशी दुर्गास्वरुप देवता खाजगीत सारिपाट खेळण्यास येत असे. याचा पत्ता कोणालाही नव्हता. एकदा राणीला कुणकुण लागल्याने तिने राजावर पाळत ठेवली आणि राजाला भेटायला देवी आल्यावर ती सामोरी गेली. याप्रकाराने देवी क्रोधित झाली आणि तिने राजाची कानउघडणी केली. लुप्त होण्यापूर्वी तिने राजाला सांगितले की जर राजाला तिला पुन्हा भेटायची इच्छा झाली तर ती शाक्य समाजात सापडेल. (गौतम बुद्ध हा शाक्य होता)&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेव्हापासून शाक्य समाजातील लहान मुलींना त्यांचा मासिक धर्म येण्यापूर्वी कुमारी देवी म्हणून निवडले जाते. दलाई लामा किंवा पंचेन लामा यांचा शोध घेताना जसे प्रयत्न केले जातात त्याप्रमाणेच ही देवी शोधण्यासाठीही अनेक विधी, प्रयत्न करावे लागतात आणि अनेक अटींची पूर्तता करावी लागते जसे -&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिची पत्रिका तपासली जाते. या मुलीला कधीही शारिरीक जखम झालेली नसली पाहिजे. तिचे दात पडलेले नकोत. ते २० असायला हवेत. तिचा आवाज, चालणे, बोलणे, केस, डोळे, शरीर अशी बत्तीस लक्षणे तपासली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिला अंधाराची भीती नाही हे तपासले जाते आणि मग तिची सर्वात कठिण परीक्षा घेतली जाते. कुमारी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात रेडे आणि बोकडांचे बळी देऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या मुंडक्यांवर दिवे लावून मुखवटेधारी व्यक्ती नृत्य करतात आणि या ठिकाणी या लहान मुलीला एकटे सोडले जाते. ती घाबरली नाही तर तिला नंतर संपूर्ण रात्र या बळी दिलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यासमवेत घालवावी लागते. ही मुलगी न घाबरता, न रडता तिथे रात्रभर राहीली तर कुमारी देवी म्हणून तिची निवड होते. &lt;table class="image" style="BORDER-RIGHT: #ccc 1px solid; BORDER-TOP: #ccc 1px solid; FLOAT: right; MARGIN: 0.1em; BORDER-LEFT: #ccc 1px solid; WIDTH: 1%; BORDER-BOTTOM: #ccc 1px solid"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;&lt;img alt="" src="http://solidaritynepal.org/new/images/stories/kumari_devi.jpg" /&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="caption"&gt;kumari devi&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;यानंतर तिला कुटुंबापासून वेगळे, कुमारी देवीच्या मंदिरात ठेवले जाते. तिच्या कपाळावर देवीचा तिसरा नेत्र आरेखला जातो. तिची पूजा केली जाते. लोक कुमारीचौकात गर्दी करून तिचे दर्शन घेतात. दर्शन घेताना तिच्या पाया पडतात. दर्शनाच्या वेळेस देवीचे लहान मुलीसारखे वागणे जसे, टाळ्या वाजवणे, हसणे, रडणे, ओरडणे, आणलेल्या नैवेद्याकडे आशेने पाहणे भक्तांवर संकटे आणते असा समज आहे. या उलट, देवीने शांतपणे नमस्कार, नैवेद्याचा स्वीकार केला तर देवी पावते असा समज आहे. चांगली वस्त्रे, कपडे, मान या वातावरणात वाढणार्‍या मुलींना मासिकपाळी आल्यावर देवी त्यांचे शरीर सोडून जाते आणि या सर्व सुखसोयींपासून त्यांना अचानक वंचित व्हावे लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यानंतर त्यांना दरवर्षी सरकारी मानधन मिळते परंतु अचानक आलेल्या बदलामुळे बर्‍याच मुली सामान्य जीवनाला रुळू शकत नाहीत. त्यांना नंतर लग्न करता येत असले तरी त्यांच्याशी लग्न करणारा माणूस वर्षभरात मरण पावतो असा समज अस्तित्वात आहे. (अनेक कुमारी देवींची लग्ने झाल्याचा दाखला विकिवर मिळतो) पुन्हा एकदा नव्याने देवीचा शोध सुरु होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यापूर्वीची कुमारी देवी सजनी शाक्य मोठी झाल्याने तीन वर्षांच्या मतिना शाक्यची निवड करून कुमारी देवीची स्थापना करण्यात आली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा सर्व वृत्तांत वाचताना एक प्रकारे विचित्र खेद होतो. या मुलींचे बालपण कोमेजून टाकून त्यांच्या तारुण्याशीही कळत-नकळत खेळ केला जातो. इतर अनेक धर्म आणि पंथातही कोवळ्या वयांत मुलांना देव, देवता, संन्यासी, साधू, आजन्म ब्रह्मचारी करणे होत आले आहे. ज्या वयांत निर्णय घ्यायची क्षमता नसते, चांगल्यावाईटाची जाण नसते, आपली आवड-निवड ठरवायची जाणीव नसते त्या वयांत दुसर्‍यांनी माथी मारलेले निर्णय घेऊन जगायची शिक्षा त्यांच्या माथी मारणे आणि इतर मुलांना मिळणार्‍या बाल्यापासून त्यांना वंचित ठेवणे हे सहजी पटणारे नाही. नवरात्रांत कन्यापूजा नावाचा जो प्रकार चालतो त्यात लहान मुलींच्या पाया पडणे, त्यांच्याकडून आशिर्वाद मागणे, त्यांना प्रसाद चढवणे असे प्रकार केले जातात. कुठेतरी आपण त्या उमलणार्‍या फुलांवर आपण हा प्रकार लादत असतो का? असे प्रकार, प्रथा केवळ समाजातील अशिक्षित समाजात होत असतील असे वाटत असल्यास आवर्जून सांगावेसे वाटते की कन्यापूजा ही अमेरिकेतही देवळांदेवळांतून चालते. चांगली सुशिक्षित, अतिउच्चशिक्षित माणसे लहान मुलींना रांगेत बसवून त्यांच्या पाया पडून, त्यांच्या हातात डॉलर्स कोंबताना आणि आशीर्वाद मागताना अनुभवले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अधिक माहिती:&lt;br /&gt;&lt;br /&gt;http://en.wikipedia.org/wiki/Sajani_Shakya&lt;br /&gt;http://hinduism.about.com/cs/godsgoddess/a/aa090903a.htm&lt;br /&gt;&lt;br /&gt;चित्र http://solidaritynepal.org वरून साभार.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-7226027019513180456?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/7226027019513180456/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=7226027019513180456' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/7226027019513180456'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/7226027019513180456'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2008/10/blog-post_15.html' title='कुमारी देवी'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-764504404240843706</id><published>2008-10-07T02:26:00.000-07:00</published><updated>2008-10-07T08:48:48.111-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><title type='text'>स्वप्नांच्या जादूनगरीत</title><content type='html'>राज्याच्या वेशीत आम्ही प्रवेश केला तसे एकाने आमंत्रणपत्रिका आमच्या हातात कोंबली. राजवाड्यात सोहळा सुरू होण्यास थोडाच वेळ बाकी होता. राजवाड्यासमोर लोकांची गर्दी जमू लागली होती. उशीर झाला तर राज्याभिषेकाचा सोहळा लांबूनच पाहावा लागेल ही जाणीव झाली तशी मी मुलीला सांगितले, "हात घट्ट पकड. थोड्या वेळात तोबा गर्दी उसळली की त्यात हरवायचीस कुठेतरी.” आणि आम्ही तिघे राजवाड्याच्या दिशेने धावत सुटलो. आजच्या सोहळ्याप्रीत्यर्थ जरीच्या पताका, कलाबतू आणि बादल्याच्या कामाने राजवाडा सजवला होता. सुवर्णनक्षीने सजवलेला राजवाडा आज विशेष खुलून दिसत होता. राजवाड्यातून सैनिकांची फलटण आणि त्यांच्या मागे अमीर उमराव राजवाड्याच्या मुख्य सदरेवर येऊ लागले. पाठोपाठ राजेसाहेब येण्याची वर्दी आली आणि राजेसाहेबांचे आपला पुत्र प्रिन्स चार्मिंग आणि पुत्रवधू सिंड्रेला यांच्यासमवेत आगमन झाले.&lt;a title="DSC00316 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/1126476293/"&gt;&lt;img height="260" alt="DSC00316" src="http://farm2.static.flickr.com/1028/1126476293_23241ee29d_m.jpg" width="220" align="right" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या कारभारातून निवृत्ती घेऊन राजेसाहेब राज्यकारभार आजपासून राजपुत्राच्या हाती सोपवणार होते. सिंड्रेला राज्याची राणी होणार आणि परीराणी आपल्या करामती दाखवायला येणार नाही असे थोडेच होईल? सिंड्रेलाच्या आगमनाबरोबरच राजवाड्याच्या सज्जात परीराणीही अवतीर्ण झाली. सोबत नौबती झडल्या, आकाशात फटाक्यांची फुले उधळली गेली. सिंड्रेला तिच्या शुभ्र सफेद वेशात खुलून दिसत होती. देखण्या राजपुत्रासमवेत जोडा अगदी शोभून दिसत होता.समारंभासाठी मोठमोठ्या पाहुण्यांना आमंत्रण होते. &lt;a title="DSC00329 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/1126393225/"&gt;&lt;img height="200" alt="DSC00329" src="http://farm2.static.flickr.com/1144/1126393225_9c8eaf7cd6_m.jpg" width="280" align="left" /&gt;&lt;/a&gt;त्यांचेही आगमन होऊ लागले. राजेसाहेब आणि युवराज, युवराज्ञीला त्यांची ओळख करून दिली जात होती. अल्लाउद्दीन आणि जास्मीन, ब्युटी आणि बीस्ट, स्नोव्हाईट (हिमगौरी) आणि तिचा राजकुमार, स्लीपिंग ब्युटी (झोपलेली राजकन्या) आणि तिचा राजकुमार असे सर्वजण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. पाहुण्यांनी युवराज आणि युवराज्ञीचे अभीष्टचिंतन केले. समारंभासाठी आलेल्या कलावंतांनी नृत्य आणि गायन सादर करून पाहुण्यांना रिझवले. राजेसाहेबांनी उठून आपला मनोदय उपस्थित पाहुण्यांसमोर व्यक्त केला आणि आपला मुकुट आपल्या पुत्राच्या माथ्यावर चढवला. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सिंड्रेलालाही राणीचा मुकुट बहाल करण्यात आला. सिंड्रेलाने उपस्थितांचे आभार मानले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"राज्याच्या देखरेखीत कोणताही कसूर होणार नाही, राज्याचे प्रजाजन सुखी राहोत, सर्वांचे कल्याण होवो." अशी इच्छा व्यक्त केली आणि नृत्य गायनाच्या कार्यक्रमांना पुनश्च सुरुवात झाली. यावेळेस या आनंदात सर्व उपस्थित पाहुणे, सिंड्रेला आणि प्रिन्स चार्मिंग यांनीही भाग घेतला आणि हळूहळू उपस्थितांचे निरोप घेतले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परीकथेतील पात्रांना याचि देही याचि डोळा पाहून तृप्त झाल्यावर मी मुलीला विचारले, “आता काय करूया? अल्लाउद्दीनच्या उडत्या गालिच्यावरून सफर, डम्बोच्या पाठीवरून आकाशाची सफर, कपबशीत बसून गिरक्या घेऊया, पायरेट्सना भेटायला त्यांच्या जहाजात जाऊया, जंगल सफारीला भेट देऊया, मिकी माऊसच्या घराची सफर करूया, बाहुल्यांच्या राज्याची सफर करूया की खुद्द मिकी माऊसच्या गळ्यात पडून दोन चार फोटो काढूया?” तशी ती खुदकन हसत म्हणाली, “मम्मा, तू तर माझ्यापेक्षाही जास्त एक्सायटेड आहेस.”“असणारच!” मी तिला चिडवले, “स्वप्नांच्या या जादूनगरीत आज तू राजकन्या आहेस आणि मी.... मीही राजकन्याच आहे.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वप्नातली ही नगरी सत्यात उतरते ती अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलॅंडो शहरात वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टमधील मॅजिक किंगडम पार्कात.---प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल दडलेले असते. काहीजण या मुलाला दडपून टाकतात, काही त्याचे अस्तित्वच विसरून जातात तर काही थोडके स्वत:तील या मुलाची निरागसता, खेळकरपणा, उत्साह &lt;a title="Florida_Trip_197[1] by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/1185372672/"&gt;&lt;img height="220" alt="Florida_Trip_197[1]" src="http://farm2.static.flickr.com/1395/1185372672_9d003af560_m.jpg" width="280" align="right" /&gt;&lt;/a&gt;जपत राहतात, आपल्यातील मूल जगवतात आणि स्वत:सह इतरांनाही आनंदी करतात. वॉल्टरने लहानपणापासूनच आपला चित्रकलेचा छंद जोपासला होता. शाळेतून निघणार्‍या मासिकात तो चित्रे आणि कार्टून्स काढत असे. पुढे सैन्यात भरती होण्याच्या इच्छेने त्याने शाळा सोडली पण वय कमी भरल्याने त्याला सैन्यात प्रवेश मिळाला नाही. खिशात अवघे ४० डॉलर्स आणि आपल्या चित्रकलेचे बाड घेऊन वॉल्टरने हॉलिवूडमध्ये प्रवेश केला तो दिग्दर्शनाची संधी मिळावी म्हणून. परंतु हेही स्वप्न सत्यात उतरले नाही. जेथून तेथून नकार मिळाल्यावर एका गराजमध्ये त्याने आपला स्टुडिओ थाटला आणि कार्टून्सच्या निर्मितीला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता एक दिवस वॉल्टरच्या आल्टर इगोचा "मिकी माऊस"चा जन्म झाला. उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक, कार्टूनिस्ट, पटकथा लेखक, व्यावसायिक आणि मानवतावादी म्हणून जगाला वॉल्टरची, वॉल्ट डिस्नींची ओळख आहे पण त्यांच्यातल्या स्वप्नाळू, निरागस मुलाची ओळख पटते ती त्यांनी निर्माण केलेल्या डिस्नीलॅंड, डिस्नीवर्ल्डसारख्या प्रचंड स्वप्ननगरांना भेट दिल्यावर. स्लीपिंग ब्युटी, अल्लाउद्दीन, सिंड्रेलासारख्या ज्या परीकथांत रममाण होऊन आपण आपले बालपण पोसले त्या परीकथेतील पात्रे खरी होऊन आपल्यात वावरू लागणे आणि आपल्याला त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणे यांत असणारा अनोखा आनंद, गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात ओरलॅंडोच्या ३०,००० एकर जमिनीवर वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टला भेट दिल्यावर आम्हाला मिळाला. करमणूकीचे &lt;a title="DSC00340 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/1127240682/"&gt;&lt;img height="180" alt="DSC00340" src="http://farm2.static.flickr.com/1087/1127240682_da8a69e43f_m.jpg" width="240" align="left" /&gt;&lt;/a&gt;आणि विसाव्याचे जगातील सर्वात मोठे ठिकाण म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट प्रसिद्ध आहे. या स्थळाचे विशेष म्हणजे,लहानमोठ्यांना जादूनगरीची सफर घडवणारे मॅजिक किंगडम, चित्रपटातील भूलभुलैया आणि करामतींची ओळख करून देणारा एमजीएम स्टुडियो, आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची ओळख करून देणारे एपकॉट, ५०० एकर जमिनीवर वसलेले प्राणी उद्यान, ऍनिमल किंगडम ही चार प्रमुख थीम पार्क्स, दोन वॉटर पार्क्स, गोल्फची मैदाने, क्रीडासंकुल, मोटारींचा रेसकोर्स, डाऊनटाऊन डिस्नी आणि त्यालगत असणारी अनेक आकर्षणे, राहण्याचे सुमारे २० प्रचंड रिसॉर्टस आणि असंख्य खरेदीची ठिकाणे आणि उपाहारगृहे यांनी हा परिसर नटलेला आहे.मानवनिर्मित आकर्षणांत अमेरिकेतील एक सर्वोत्तम स्थळ म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे नाव घेता येईल. या पर्यटनस्थळाला भेट देऊ इच्छिणार्‍या पर्यटकांना, सहल ठरवण्यासाठी उपयुक्त होईल अशी माहिती या लेखाद्वारे येथे संकलित करण्याचा मानस ठेवून आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टची सहल कशी ठरवावी?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सहल ठरवण्याच्या ४ ते ६ महिने आधी डील्स तपासावीत. ही डील्स वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या संकेतस्थळावर तसेच अनेक पर्यटन उद्योगांच्या संकेतस्थळांवर मिळतात. तेथून तुम्हाला विमानाची तिकिटे, राहण्याचे हॉटेल आणि पार्कची तिकिटे यांची सोय करता येते. याखेरीज अनेक इतर पर्यटन व्यावसायिकांमार्फतही या सहलीचे आयोजन करता येईल.उन्हाळ्यात फ्लोरिडाचे तापमान सुमारे ३५-४० डि. से.च्या आसपास असल्याने वसंत किंवा शरद ऋतूत ही सहल आखणे उत्तम. &lt;a title="DSC00529 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/168628409/"&gt;&lt;img height="180" alt="DSC00529" src="http://farm1.static.flickr.com/72/168628409_aee9f604a6_m.jpg" width="240" align="right" /&gt;&lt;/a&gt;तसे हे स्थळ बाराही महिने पर्यटकांनी फुललेले असते आणि अत्युच्च गर्दीचा काळ रिसॉर्टच्या संकेतस्थळावर दिलेला असतो, तोही सहल ठरवण्यासाठी उपयोगी पडावा. उन्हाळ्याच्या दिवसांत सनक्रीन चोपडणे आणि पावसाची शक्यता असल्यास पाठीवरील बॅकपॅकमध्ये पातळ रेनकोट घेणे बरे पडते. आम्ही दोन वेळा मॅजिक किंगडमला भेट दिली असता, दोन्ही दिवशी तास-दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि रेनकोट घालून सर्व आकर्षणांची मजा लुटावी लागली.डिस्नी वर्ल्डमधील सर्व पार्क्स आरामशीरपणे बघायची झाली तर सुमारे ५-६ दिवसांची सहल योजावी लागते. पर्यटकांनी कमीतकमी ४ दिवस तरी या सहलीसाठी राखून ठेवावेत. त्यापेक्षा कमी दिवसांत ही सहल अतिशय दगदगीची होते. या पार्कांत येणार्‍या प्रचंड गर्दींमुळे प्रत्येक आकर्षण पाहण्यास १ तासाहून अधिक काळही लागू शकतो. यावर उपाय म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट "पार्क हॉपर" पासेस मिळतात. ४ दिवसांच्या वर राहणार्‍यांनाच थोडे अधिक डॉलर्स भरून या पासांचा फायदा होतो. हे पास घेऊन कोणत्याही पार्कात कधीही प्रवेश करता येतो किंवा एकाच पार्कात वेगवेगळ्या दिवशी प्रवेश करता येतो. तसेच येथे काही पार्कांत "फास्टपासेस" मिळतात. फास्टपासमुळे एखाद्या आकर्षणासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याचे कष्ट वाचतात. हे पास फुकट मिळतात व ते घेतले की हव्या असणार्‍या आकर्षणांसाठी आपल्याला हव्या त्या वेळी आपला क्रमांक राखून ठेवता येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कोठे राहावे?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या परिसरात राहणे कधीही उत्तम. येथे असणार्‍या अनेक रिसॉर्ट हॉटेल्समध्ये सामान्यांपासून श्रीमंतांना आवडेल अशा सर्व प्रकारे राहण्याची सोय होते. प्रत्येक रिसॉर्ट हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी फास्टफूड आणि इतर रेस्टॉरंट्स आहेत, एक दोन लहान किराणा दुकाने, स्विमिंग पूल इ. सारख्या सोयींनी ही हॉटेल्स सुसज्ज आहेत. या रिसॉर्ट हॉटेल्समध्ये राहण्याचा दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक पार्काला जाणारी बस हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी येते आणि कार नेणे, ती पार्क करणे, तेथून पार्क गाठणे हे सर्व कष्ट वाचतात. विमानाने प्रवास न करता जर कार घेऊन ओरलॅंडोला जाण्याचा विचार असेल तरीही ही कार हॉटेलच्या आवारात पार्क करून बसने ये-जा करणेच सोयिस्कर ठरते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;काय पाहावे आणि करावे?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;या स्वप्ननगरीतील सर्वच आकर्षणे लाजवाब आहेत. प्रत्येक पार्कातील फिरती चक्रे, झुले, झोपाळे, रोलर कोस्टर्स आणि चतुर्मितीतील सर्व नाटके किंवा चित्रपट यांची वर्णने शब्दांत करण्यासारखी नाहीत. प्रत्येक आकर्षणात त्याचा वेगळेपणा आणि एक अनोखा थरार जाणवतो.मॅजिक किंगडम पाहण्यासाठी सहसा एक पूर्ण दिवस पुरेसा पडत नाही. त्यामानाने इतर तीन थीम पार्क्स पाहण्यासाठी संपूर्ण दिवस पुरेसा ठरतो असा अनुभव आला. व्यक्तिश: माझी आवड सांगायची झाली तर ऍनिमल &lt;a title="DSC00510 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/1126481461/"&gt;&lt;img height="220" alt="DSC00510" src="http://farm2.static.flickr.com/1135/1126481461_c77c640f24_m.jpg" width="280" align="right" /&gt;&lt;/a&gt;किंगडमच्या मानाने इतर तीनही पार्क्स अधिक आवडली. सर्वात आवडले ते मॅजिक किंगडम. एपकॉट आणि एमजीएम स्टुडियो ही दोन्ही पार्क्स लहान मुलांना आवडण्याचा संभव कमी परंतु कुमारवयीन मुले आणि मोठे यांच्यासाठी ही दोन्ही पार्क्स म्हणजे खास पर्वणीच आहे. प्रत्येक थीम पार्कमध्ये आवर्जून पाहावेत अशी काही आकर्षणे किंवा कार्यक्रम आहेत ते पुढीलप्रमाणे:&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. मॅजिक किंगडम: येथे दिवसातून दोनदा डिस्नीच्या पात्रांची मिरवणूक निघते. एकदा दुपारी आणि एकदा रात्री. या दोन्ही मिरवणुका पाहण्याजोग्या आहेत. रात्रीची विशेष. बरेचदा संपूर्ण दिवस या पार्कात घालवून थकवा जाणवल्याने अनेकजण रात्रीच्या या मिरवणुकीसाठी थांबत नाहीत असे दिसते परंतु ही मिरवणूक, रात्रीच्या अंधारात सिंड्रेलाच्या राजवाड्यावर होणारे प्रकाशाचे खेळ आणि फटाक्यांची आतषबाजी अप्रतिम दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२. एमजीएम स्टुडियो: येथे दाखवले जाणारे सर्व करामतींचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. दर रात्री येथे फॅंटास्मिक नावाचा लेझर शो होतो. यांतही अनेक डिस्नी कथांतील किंवा चित्रपटांतील प्रसंग दाखवले जातात. अप्रतिम प्रकाशयोजना आणि रंगसंगती, संगीतावर नाचणारी पाण्याची कारंजी आणि मन सुखावणारी डिस्नी पात्रे यांच्या संगमाने सादर होणारा हा कार्यक्रम जगातील एक अत्युच्च दर्जाचा कार्यक्रम ठरावा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. एपकॉट: येथेही रात्री "रिफ्लेक्शन ऑफ द अर्थ" हा प्रकाश-रंगांचा आणि फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. नेहमी फटाक्यांची आतषबाजी काय पाहायची? त्यात वेगळेपणा काय असणार? असा विचार करून हा कार्यक्रम पाहण्याचे टाळू नये. प्रकाश आणि रंगसंगतीने अतिशय लोभसवाणा दिसणारा आणि धगधगणार्‍या अग्नीने मनाला भुरळ पाडणारा हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;४. ऍनिमल किंगडम: लायन किंग या डिस्नीपटातील सुप्रसिद्ध गाणी, सिम्बा आणि त्याची मित्रमंडळी आणि चित्रविचित्र पोशाखातील कलावंत यांनी सजलेला नृत्य-गायन आणि कसरतींचा हा कार्यक्रम आवर्जून पाहण्याजोगा आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आसपास पाहण्यासारखी ठिकाणे:&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;डिस्नी वर्ल्डच्या परिसरात ही महत्त्वाची उद्याने सोडून पाहण्यासारखी दोन प्रमुख ठिकाणे आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;डाऊनटाऊन डिस्नी:&lt;/strong&gt; या परिसरात चांगली रेस्टॉरंट्स, फास्टफूड उपाहारगृहे, खरेदी करण्यासाठी प्रशस्त दुकाने आहेत. येथे गायन-नृत्य-संगीताचे कार्यक्रम होतात. सुप्रसिद्ध सूर्य-सर्कस (Cirque du Soleil ) येथे पाहता येते. संध्याकाळच्या वेळेस खरेदी करता करता, बाजारातून फेरफटका मारण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;प्लेजर आयलंड:&lt;/strong&gt; सळसळत्या तारुण्याचा जोश व्यक्त करण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे. पश्चात्य संगीताचे निरनिराळे प्रकार येथे अनुभवायला मिळतील. संगीत-गायन आणि त्यावर थिरकणारी पावले यांच्या आनंदात प्लेजर आयलंडला नित्य दिवाळी असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;बिल्झर्ड बीच आणि टायफून लगून&lt;/strong&gt; : ही दोन जलोद्याने (वॉटर पार्क्स) डिस्नी परिसरात आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत बाहर राहून तापलेले अंग थंड करून पाण्यात डुंबण्याकरता आणि मन चिंब करण्याकरता ही दोन्ही पार्क्स उत्तम आहेत.डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या बाहेर ओरलॅंडोला पाहण्यासारखी इतर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यातील दोन प्रमुख स्थळांबद्दल येथे लिहावेसे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;युनिवर्सल पार्क्स:&lt;/strong&gt; येथे दोन पार्क्स आहेत: युनिवर्सल स्टुडिओ आणि युनिवर्सल आयलंड्स ऑफ ऍडवेंचर हे थीम पार्क. ही दोन्ही पार्क्स पाहण्यासारखी असली तरी डिस्नीसोबत यांचीही वारी करणे अतिशय दगदगीचे ठरते. इच्छुकांनी हे लक्षात घेऊनच सहल आखावी किंवा युनिवर्सल सहलीची स्वतंत्र आखणी करावी.&lt;a title="DSC00593 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/1127334378/"&gt;&lt;img height="250" alt="DSC00593" src="http://farm2.static.flickr.com/1170/1127334378_68e9e12cb4_m.jpg" width="300" align="right" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सीवर्ल्ड, ओरलॅंडो:&lt;/strong&gt; प्रचंड आकाराचे किलर व्हेल्स, पाण्यात सूर मारणारे डॉल्फिन्स, माणसांच्या आज्ञा लीलया पाळणारे चतुर सील, गरीब स्वभावाचे परंतु भीतिदायक दिसणारे प्रचंड वॉलरस, उरात धडकी भरवणारे शार्क्स आणि असे अनेक सागरी जीव या उद्यानात पाहण्यास मिळतात. शामू या किलर व्हेलचे, सील आणि डॉल्फिन यांचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. डिस्नी वर्ल्डची सफर करणार्‍या पर्यटकांनी या उद्यानाला भेट देणे चुकवू नये. हे पार्क एका दिवसात पाहून होते."ट्रिपल ए"चे सदस्यत्व असल्यास या पार्काची तिकिटे स्वस्तात मिळतात.फ्लोरिडा राज्यात ओरलॅंडो शहराबाहेर पाहण्यासारखीही इतर अनेक स्थळे आहेत यात ओरलॅंडोपासून सुमारे चार तासांवर असणारे मायामीचे समुद्र किनारे, सुमारे दोन तासांवर असणारे टॅम्पाचे समुद्र किनारे विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच बुश गार्डन्स (Busch Gardens) आणि किसिमी येथील थीम पार्क्स पाहण्यासारखी आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;---&lt;/div&gt;&lt;br /&gt;डिस्नीनगरीबद्दल एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे येथील सेवादात्यांकडून आणि सेवकवर्गाकडून पर्यटकांना मिळणारी वागणूक. लाखोंच्या गर्दीला सांभाळून हसतमुखपणे आणि अदबीने पर्यटकांच्या प्रत्येक प्रश्नाला, शंकांना सविस्तर उत्तरे देणारा, त्यांना तत्परतेने मदत करणारा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणारा डिस्नीचा कर्मचारीवर्ग प्रत्येक पर्यटकाला राजपुत्र नाहीतर राजकन्या असल्याचे सतत जाणवून देतो. वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे उद्घाटन १९७१ साली करण्यात आले - वॉल्ट डिस्नी यांच्या मृत्यूच्या सुमारे ५ वर्षांनंतर! संपूर्ण दुनियेला स्वप्न विकणारा हा मनुष्य त्याने स्वत: स्वप्नात पाहिलेली जादूनगरी सत्यात उतरताना पाहण्यास हयात नव्हता. परंतु लहान-मोठे, तरुण-म्हातारे सर्वांना वेड लावेल अशा स्वप्ननगरीच्या निर्मितीतून त्यांनी आपले नाव चिरंतन केले. लहानांना वेड लावणार्‍या आणि मोठ्यांच्या हृदयात दडलेल्या बालकाला पुनश्च उभारी देणार्‍या या जादूमय स्वप्ननगरीत वर्षातील ३६५ दिवस दिवाळी असते. आपल्या कुटुंबासमवेत दिवाळीतील आनंदाचे क्षण प्रकाश, रोषणाई, फटाके यांच्या सोबतीने या स्वप्ननगरीत काढायची संधी पर्यटकांना लवकरच चालून येवो ही दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा!&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेखातील काही चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. चित्रांवर टिचकी मारली असता ती मोठी करून पाहता येतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt;&lt;a title="Disney_fireworks2[1] by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/1185880250/"&gt;&lt;img height="373" alt="Disney_fireworks2[1]" src="http://farm2.static.flickr.com/1121/1185880250_f920d1bae8.jpg" width="500" /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;(पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००७)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-764504404240843706?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/764504404240843706/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=764504404240843706' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/764504404240843706'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/764504404240843706'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2008/10/blog-post.html' title='स्वप्नांच्या जादूनगरीत'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://farm2.static.flickr.com/1028/1126476293_23241ee29d_t.jpg' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-3941867802724727503</id><published>2008-07-11T15:44:00.000-07:00</published><updated>2008-07-12T05:02:28.886-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कथा'/><title type='text'>गबाळ्या</title><content type='html'>&lt;strong&gt;लेखनप्रकार: &lt;span style="color:#999999;"&gt;(किंचित)&lt;/span&gt; भयकथा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत आज पहिल्यांदाच सर्वांची भेट होत होती. पहिली घंटा अद्याप झाली नसल्याने दमदार दंगामस्ती सुरु होती. घंटा झाली तशी सर्वजण झपकन आपल्या बाकांपाशी परतले. 'सातवीचा वर्ग म्हणजे सकाळच्या शाळेतला शेवटचा वर्ग . पुढल्या वर्षीपासून म्हणजे आठवीत गेल्यावर शाळा दुपारी भरणार, पण सातवी म्हणजे ४ ते ६ वीच्या वर्गांचे दादा. यावर्षी बाकीची पोरं आपल्याला कशी दबून राहायला हवीत. उम्म्म...बाकीची पोरं कशाला वर्गातली पोरंही वचकूनच राहायला हवीत. मुलगी असले म्हणून काय झालं, मुलगे टरकतात, टरकवता आलं पाहिजे. काय?' माझा लाडका शेवटचा बाक पकडताना विचार डोक्यात घोळवत मी गालात हसत होते. या माझ्या अशा हसण्याला आमचे मुख्याध्यापक चिडून "गेल्या जन्मी गौतम बुद्ध होतीस काय?" असं हमखास विचारतात, पण मला असं दुसर्‍यांवर हसायला आवडतं, बुद्धालाही आवडत असावं म्हणूनच तो ही हसायचा, गालातल्या गालात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या वर्षी आमच्या वर्गशिक्षिका सावंतबाई असणार हे गेल्या आठवड्यात आईला कळलं तेव्हा तिने सुटकेचा मोठ्ठा निश्वास सोडला होता. "बरं झालं बाई! गेल्यावर्षीच्या सातवीच्या वर्गाच्या साठ्येबाई नाहीत यावर्षी ते. भलत्याच कडक आहेत असं ऐकून आहे. सावंतबाई गरीब आहेत, मुलांना त्यांचा त्रास नाही. तू ही बर्‍याबोलाने त्यांच्याशी नीट वाग. मुलांच्या नसतील एवढ्या तुझ्या तक्रारी येतात. केवळ अभ्यासात चांगली असल्याने सुटतेस नेहमी तू. मुलींनी मुलींसारखं वागावं. वर्गातले टवाळ मुलगे दंगा करतात म्हणून तूही त्यांच्याबरोबर फाजीलपणा करावास असं नाही." आईने असा तोंडाचा पट्टा सोडला की कानात कापसाचे बोळे कोंबले आहेत असं समजून मी स्वस्थ राहते. आई बोलते बोलते आणि गप्प बसते. बिच्चारी!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;सावंतबाई वर्गात आल्या तेव्हा बाकांवर बसून सर्वांच्या मस्त टवाळक्या सुरू होत्या. बाई वर्गात कधी आल्या त्याची चाहूलच लागली नाही. बाईंनी डस्टर जोरात टेबलावर आदळला आणि पहिल्याच दिवशी फर्मान काढलं की मुलगे-मुलगे आणि मुली मुलींनी शेजारी बसायचे नाही. प्रत्येक बाकावर एक मुलगा आणि एक मुलगी असं बसायचं म्हणजे वर्गात शांतता राहिल. वर्गातल्या काही काकूबाई हे ऐकून काय हिरमुसल्या झाल्या होत्या... बावळट कुठल्या? मला मुलांशेजारी बसायला आवडतं आणि बहुतेक मुलांनाही मुली बाजूला बसलेल्या आवडतात. तसं ते दाखवत नसले म्हणून काय झालं, मला माहित आहे की त्यांना ते आवडतं. उगीच कुठल्यातरी काकूबाई शेजारी बसून "ए तू माझ्या वहीत डोकावू नकोस" नाहीतर "अय्या! तो राजू बघ कसा चोरून बघतो आहे" अशा बायकी गोष्टी करण्यापेक्षा वर्गातल्या एखाद्या उंचपुर्‍या, थोड्याशा घोगरट आवाजाच्या मुलाशेजारी बसण्यात वेगळीच मजा असते. बाई दोन दिवसांनी जागा ठरवणार होत्या. तोपर्यंत कोणी कोणा शेजारी बसायचं ते ठरलं नव्हतं. माझ्या शेजारची शैला कुरकुरत कुजबुजली "बाई तरी काय? माझ्या आईला सांगितलं की मुलांशेजारी बसायचं आहे तर ती मला ५० गोष्टी सांगत राहणार. नीट बस, फ्रॉक तोकडा तर पडत नाही ना! उगीच अंगाला हात लावायला देऊ नकोस."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हाहा! माझी आईही असंच सांगणार पण तिला सांगतंय कोण की बाई मुलांशेजारी जागा ठरवणार आहेत म्हणून. उग्गीच नसती कटकट कोण ऐकेल?" मी हसत डोळे मिचकावले.&lt;br /&gt;"ग्रेटच आहेस." शैलाच्या तोंडावर कौतुकाचे भाव होते, "मला तर आईपासून कोणतीच गोष्ट लपवता येत नाही." "मला येते." मी टेचात म्हटलं, "आपण काय कुक्कुलं बाळ आहोत?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवं वर्ष, नवा वर्ग, नवा अभ्यास यांत दोन दिवस कधी भुर्रकन उडून गेले कळलंच नाही. तिसर्‍या दिवशी बाई वर्गात आल्या ते एका मुलाला सोबत घेऊन. शैला मला तिच्या वहीत चिकटवलेले इंडियन क्रिकेट टीमचे फोटो दाखवत होती, तिने बाईंना बघून गपकन वही बंद केली. नाराजीने मी डोकं वर केलं. बाईंच्या शेजारी एक उंच, हाडकुळा मुलगा भेदरलेल्या सशासारखा जीव मुठीत घेऊन उभा होता. जसं काही, आम्ही वर्गातली पोरं वाघोबाच होतो आणि एका फटक्यात त्याचा चट्टामट्टा करणार होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हा बाळकृष्ण गणपुले" सावंतबाईंनी ओळख करून दिली.&lt;br /&gt;"बाळकृष्ण!" तिसर्‍या बाकावरचा अवि फिस्सकन हसला आणि त्याबरोबर सगळा वर्ग हसू लागला. सावंत बाईंचे डोळे मोठे झाले होते. "हसण्यासारखं काय आहे. गप्प बसा. नव्या विद्यार्थ्याचं स्वागत असं करतात का? सातवीतले घोडे झाले तरी अजून अकला आलेल्या नाहीत." बाई आवाज चढवून म्हणाल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बाळकृष्ण, मा..माझ्या आजोबांचं नाव होतं, मला सगळे बाळ म्हणतात," तो मुलगा रडवेलासा झाला होता. एखाद्या शिशुवर्गातल्या पोरासारखं त्याचं नाक वाहत होतं. त्याने ते शर्टाच्या बाहीला पुसलं. सावंतबाई त्याच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. "असं कर, तू भिंतीकडच्या रांगेत जाऊन शेवटच्या बाकावर बस. मी मुलांना उंचीप्रमाणे बसवते आणि आज सर्वांच्या कायम जागाही ठरवायच्या आहेत. शैला, तू उठून पुढच्या बाकावर बस." बाईंनी एक एक करून जागा ठरवायला सुरूवात केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"आ..शैला म्हणजे हे ध्यान माझ्या बाजूला बसणार का काय?" माझ्या डोक्यावर आठ्या पडल्या "हीही! मज्जा आहे बुवा तुझी" शैला कुजबुजली. "हसतेस काय? या ध्यानाला दोन दिवसांत पळवून नाही लावलं तर विचार. बाई तरी काय? मीच दिसले वाटतं सगळ्या वर्गात. त्या कर्णिक काकू शेजारी बसवायचं होतं की, जोडी अगदी जमली असती."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बरं बरं! दाखव तू त्याला पळवून." शैलाने दप्तर उचललं आणि वह्या, पुस्तकं गोळा केली आणि ती पुढच्या बाकावर जाऊन बसली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाळकृष्ण बाका शेजारी येऊन उभा होता. मी त्याच्याकडे मान वळवून पाहिलंही नाही. शेवटी तोच बिचकत बिचकत म्हणाला "ए तू सरक ना, मला बसायला जागा दे ना."&lt;br /&gt;&lt;br /&gt;एखाद्या झुरळाकडे तुच्छतेने पहावं तसं मी त्याच्याकडे पाहिलं आणि उठून उभी राहिले. "भींतीकडे तू बसायचंस."&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मी..मी नाही बसणार भींतीजवळ. मला नाही बसायचं तिथे" केविलवाण्या आवाजात तक्रार करत त्याने आपलं वाहणारं नाक शर्टाच्या बाहीला पुसलं. बावळट कुठला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;"का रे? ही माझी जागा आहे. मी गेले दोन दिवस इथेच बसते आहे. तू भींतीच्या बाजूला बसायचंस." मी त्याला दमात म्हटलं. त्याची ती बावळटासारखी अवस्था बघून मला चेव चढला होता. नाईलाजाने तो भींतीपाशी बसला. या येड्या ध्यानाची चांगली हजेरी घेऊन कमीतकमी वेळात त्याला इथून कसं फुटवता येईल हाच विचार डोक्यात घोळत होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"नाव काय रे तुझं?""सांगितलं ना मघाशी वर्गासमोर," त्याला माझा अरेरावीचा स्वर आवडला नसावा पण हवं कोणाला होतं आवडून घ्यायला?"हो ना! सांगितलंस खरं, काय बरं नाव तुझं," मी त्याला वेडावत विचारलं "हं... गबाळ्या नाही का?""बाळकृष्ण गणपुले." तो हिरमुसला होऊन म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तेच तर गणपुले बाळ, ग-बाळ...ग-बाळ्या...गबाळ्या. कसं चपखल नाव आहे!! आजपासून मी तुला गबाळ्या म्हणणार." गबाळ्याचा चेहरा लालेलाल झाला होता पण तो काही बोलला नाही. वाहणारं नाक त्याने पुन्हा शर्टाच्या बाहीला पुसलं. हे येडचाप ध्यान बघून मला ढवळून येत होतं. मधली सुट्टी होऊ दे याची थोडी आणखी मरम्मत करायची हे मनाशी ठरवून टाकलं होतं. मधल्या सुट्टीत संपूर्ण वर्गाला बाळकृष्णचे टोपणनाव कळले तशी पोरांनी ठेक्यावर "बाळ्या गबाळ्या" चिडवायला सुरूवात केली. गबाळ्या बिच्चारा घामाघूम झाला होता. ओक्साबोक्शी रडला असता तर आमची खैर नव्हती. मधल्या सुट्टीनंतर मोरे सरांचा गणिताचा तास होता. त्यांना हा चिडवाचिडवीचा प्रकार कळला असता तर आमची रवानगी वर्गाबाहेर होणार होती. आमच्या सुदैवाने बाळ्याने रडायला सुरुवात केली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोरे सर चक्रवाढ व्याज उगीच वाढवून चढवून शिकवत होते. वर्गावर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि बाळ्याची मधल्या सुट्टीत बरीच ताणली होती म्हणून मी त्याला थोडी विश्रांती देण्याचं ठरवलं. सर अगदी तल्लीन होऊन मुद्दल, व्याज, टक्के अशा भक्कम शब्दांचा मारा आमच्यावर करत होते. अचानक काय कोणास ठाऊक ते थांबले आणि माझ्या दिशेने रोखून बघू लागले. माझ्या? नाही माझ्या नाही, गबाळ्याच्या. गबाळ्या तोंडाचा आ वासून भिंतीकडे बघत होता. त्याच्या भित्र्या डोळ्यांत भीती मावत नव्हती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"गबाळ्या...ए गबाळ्या" मी त्याला कोपराने ढोसलं, "सर बघताहेत. भिंतीकडे काय बघतोस? समोर बघ नाहीतर मार खाशील त्यांचा आता." गबाळ्यावर ढोसण्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. तो भिंतीकडे बघत होता आणि आता त्या आ वासलेल्या तोंडातून लाळही बाहेर आलेली दिसत होती. भयंकर किळस वाटत होती या ध्यानाची. पाठीत एक धपाटा देण्याचा मोह अनावर होत होता पण ते बरं दिसलं नसतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"भिंतीवर काय सोनं लागलंय रे? नाव काय गं याचं?" सरांचा करडा आवाज कानावर पडला."गबाळ्या" कोणीतरी किनर्‍या आवाजात चिरकलं तशी सगळे फिदीफिदी हसू लागले.&lt;br /&gt;"गणपुले" हसू आवरत मी साळसूद उत्तर दिलं.&lt;br /&gt;"ए गणपुल्या! काय विचारतोय मी? भिंतीवर काय आहे?"&lt;br /&gt;"प..प..पाल सर. भिंतीवर पाल आहे." छताशी एक भली दांडगी पाल चिकटली होती.&lt;br /&gt;"अरे गधड्या, पाल भिंतीवरच असणार." सरांनी त्यांचे लाडके शब्द वापरायला सुरूवात केली.&lt;br /&gt;"मला भीती वाटते सर. ती बघा कशी डोळे वटारून बघते आहे माझ्याकडे," गबाळ्या काकुळतीला येऊन म्हणाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पाल काय खाणार आहे का तुला?" मी त्याला ऐकू जाईल अशा आवाजात कुजबुजले.&lt;br /&gt;"त...तिचे डोळे बघ. लाल लाल..बाहेर आलेले...आणि ती जीभ बघ कशी लपकन बाहेर येते. मला खूप भीती वाटते."&lt;br /&gt;"आणि मला तुझी किव वाटते गबाळ्या, भेकड कुठला" मी दटावणीच्या सुरात म्हटले. एवढीशी तर पाल, तिची कसली भीती; पण गबाळ्या थरथरा कापत होता. चाललेलं नाटक कमी होतं का काय म्हणून ती पाल सर्रकन जागची सरकली तसा गबाळ्या विजेचा करंट लागल्यागत उठला आणि गळा काढून रडायला लागला. मोरेसरांना दया आली असावी किंवा या घोड्याला रडताना पाहून काय करावं ते सुचलं नसावं. त्यांनी मला भींतीकडे सरकायला लावून माझ्या जागेवर गबाळ्याला बसवलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"ए रडू नको रे! आजच्या पुरती बसते आहे, उद्या चूपचाप भिंतीकडे बसायचं. आज पाल दिसली म्हणून घाबरतोस. उद्या झुरळ नाहीतर उंदीर दिसला म्हणून घाबरशील."&lt;br /&gt;गबाळ्याने खाली डोकं घालून डोळे पुसले आणि मान हलवली.&lt;br /&gt;"तुला नाही भीती वाटत पालीची? मुली तर किती भित्र्या असतात." त्याने घाबर्‍या आवाजात विचारलं.&lt;br /&gt;"हो क्का! मग तू पण मुलगीच असशील." मी त्याला चिडवत म्हटलं, "मला नाही वाटत भीती कोणाची. भित्रीभागुबाई कुठचा!" गबाळ्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शाळा सुटली तशी सर्वांनी वर्गाच्या दाराकडे धावायला सुरूवात केली. राजूने दप्तराचे बक्कल बांधणार्‍या गबाळ्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हटलं, "ए ती बघ पाल येत्ये तुझ्या दिशेने."&lt;br /&gt;"कुठे..कुठे?" गबाळ्या बावळटासारखा भिंती शोधायला लागला आणि त्या धांदलीत त्याचे दप्तर धपकन खाली पडलं. सगळे त्याला हसत होते आणि हे बावळट ध्यान माना वळवून भिंती शोधण्यात गुंतलं होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गबाळ्याला शेजारून हलवायचं असेल तर ही युक्ती खाशी आहे...."पाल".. पण पाल मिळवायची कशी?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;***&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;घरी गेल्यावर आईने पुढ्यात गरमागरम पोहे ठेवले. इतर वेळेस वाफाळणारे पोहे पाहिले की पोटात नुसता डोंब उसळतो पण आज मी उगीच चमच्याने पोहे चिवडत बसले होते. एकच विचार डोक्यात पिंगा घालत होता... 'पाल मिळवायची कशी?'&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;"अगं काय विचारते आहे? लक्ष कुठे आहे? बाजारात येतेस का? सामान उचलायला मदत हवी आहे." आई वैतागून विचारत होती.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;"अं..हम्म, येते." तसंही करण्यासारखं दुसरं फारसं काही नव्हतं. बाजार तर बाजार. या आयांना पन्नास भाज्या बघून भाव करून घेण्याची काय गरज असते कोण जाणे बा! त्या भाज्या खायला मी आणि बाबा नेहमी कुरकुरत असतो पण हीचं आपलं मेथी, मुळा, माठ चाललेलं असतं... माठ! गबाळ्या काही आज डोक्यातून हलायला तयार नव्हता. त्याची जागा बदललायलाच हवी. शेवटी, आपली पण काही वट आहे...शैलाला शब्द दिला आहे...दोन दिवस पण तेवढंही थांबता कामा नये!&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;आईने भाजीच्या पिशव्या हातात कोंबल्या आणि आमची स्वारी घराच्या दिशेने जाऊ लागली. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडे काही घ्यायचं नाही अशी आईची सक्त ताकीद असते पण त्यांच्या टोपल्यांत डोकावून बघायचं नाही असं थोडंच आहे. बांगड्या, चपला, पाकिटं काहीही विकत असतात हे पथारी पसरून. एका टोपलीपाशी मी जरा जास्तच रेंगाळले तशी आईने हाक दिली, "अगं चल ना, मागे काय राहिलीस?"&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;"ए आई, इथे ये ना. मला ती पाल हवी." रस्त्यावर एक फेरीवाला रबरी पाली, सरडे, साप, विंचू विकायला बसला होता.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;"ईईईई! पाल कशाला हवी? काहीतरी भलतंच... चल चूपचाप."&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;"अगं साठ्येबाईंनी मागितली होती. विज्ञानाच्या तासाला." साठ्येबाईंचं नाव काढलं का आई पुढचं काही विचारत नाही हे माहित होतं. तिने भाव करून पैसे दिले आणि मी रबरी पाल हातात गच्च धरली.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी गबाळ्या भिंतीकडे बसायला कां कू करत होता पण मी ऐकूनच घेतलं नाही तसा गपगुमान बसला. संपूर्ण दिवस दप्तराचा एक बंध त्याने हातात घट्ट पकडला होता. जसं काय पाल दिसली की हा दप्तर घेऊन तिथून धूम ठोकणार होता. ती रबरी पाल मी माझ्या पिनोफ्रॉकच्या खिशात टाकली होती. संधी मिळेल तशी ती गबाळ्याच्या अंगावर टाकायची होती पण संधी काही मिळत नव्हती. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;साठ्येबाईंचे दोन सलग तास होते. त्यावेळेला काही गडबड झालेली त्यांच्या लक्षात आली असती तर माझी खैर नव्हती. नंतरचे दोन तास पीटीचे होते. त्यावेळी सगळे मुलगे गबाळ्याला चिडवत होतेच आणि तो हिरमुसला होऊन दूर एकटाच उभा होता. तेव्हा काही केलं असतं तर सगळ्यांच्या नजरेत आलं असतं. दिवसभर शोधूनही संधी सापडली नाही. तरी मी त्याला अध्ये-मध्ये कानपिचक्या दिल्या होत्या, 'सांभाळून रहा हो, शाळेत भल्या मोठ्या पाली फिरत असतात,' पण गबाळ्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं. तो मान फिरवून गप्प बसला.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;शाळा सुटली तशी वर्गाच्या दाराशी सर्वांनी एकच गल्ला केला. इतर वर्गांतूनही मुलं मुख्य दाराकडे पळत होती. गबाळ्या आपलं दप्तर सांभाळत, आपला अर्धवट बाहेर आलेला शर्ट आत खोचत डोकं खाली घालून चालला होता. हीच संधी होती. मी खिशातून पाल बाहेर काढली. गबाळ्या धक्के खात शाळेच्या मुख्य दरवाजाशी चालला होता. मी पुढे सरून चटकन पाल त्याच्या दप्तरावर कधी टाकली ते कोणाच्या लक्षातच आले नाही. जो तो आपापल्या गडबडीत होता पण कोणीतरी चित्कारले "ईईई! पा‍ल, गबाळ्याच्या पाठीवर पाल!" क्षणार्धात सर्वजण गबाळ्यापासून दूर सरकले. "कुठे कुठे?" गबाळ्या कावराबावरा होऊन तोंडातल्या तोंडात पुटपुटला.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;"तुझ्या पाठीवर...ईईई... तिची शेपटी बघ कशी वळवत्ये" कोणीतरी किंचाळलं आणि काय झालं कळण्यापूर्वी गबाळ्या अंगात वारं भरल्यागत सुसाट शाळेच्या दरवाजातून बाहेर धावला. आपल्या आजूबाजूला मुलं आहेत, शिक्षक आहेत याचा त्याला विसर पडला असावा. वाटेत येणार्‍या-जाणार्‍यांना धडक देऊन अंगात वारं भरल्यागत तो रस्त्यापर्यंत कधी पोहोचला ते कोणाला कळलंच नाही आणि समोरून वेगात ट्रक येत होता हे गबाळ्याला कळलं नाही.&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;***&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;पुढचे दोन दिवस शाळेला सुट्टी होती. पंचनामा, साक्षी, पोलीसी कार्यवाही या दिवसांत उरकून टाकण्यात आले. खरं सांगायचं तर माझं धाबं दणाणलं होतं. 'ती पाल कोणाला सापडली तर? कोणी मला ती पाल गबाळ्याच्या पाठीवर टाकताना पाहिलं असलं तर?' दोन दिवस मला धड अन्नपाणी गेलं नव्हतं. दाराची घंटी वाजली की कापरं भरल्यागत वाटत होतं. आई-बाबा बोलताना शाळेबद्दल बोलत असावेत काय असं वाटून कान टवकारले जात होते. पण काहीच घडलं नाही. माझी अस्वस्थता आईला जाणवत होती. रात्री तिने जवळ घेऊन सांगितलं की 'विचार करू नकोस. जे झालं ते विसरायचा प्रयत्न कर. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. देवाची कृपा!' तिला काहीच कल्पना नव्हती. माझ्या वर्गातल्या कोण्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला असंच तिला वाटत होतं.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;दोन दिवसांनी मी दबकतच वर्गात शिरले. शाळेत काय होईल या भीतीने छाती धडधडत होती. सावंत बाई वर्गाच्या दाराशीच उभ्या होत्या. मला पाहून त्यांनी मला पोटाशी धरलं आणि स्वत:शीच बोलल्यागत म्हणाल्या, "तुला धक्का बसला असेल गं बाळा. बाजूला बसायचा बाळकृष्ण तुझ्या. असा पालीला घाबरून जिवाची पर्वा न करता रस्त्यावर धाव घेईल असं कसं कोणाला वाटावं? गरीब होता बिचारा, नशीब त्याचं. तू मनाला लावून घेऊ नकोस हो. धीराने घे." त्यांच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं. मी माझे डोळे गपकन बंद केले. गबाळ्याला असं मरण यावं याबद्दल गेले दोन दिवस थोडं वाईट वाटलं होतं. मी त्याचं काही बरं-वाईट व्हावं म्हणून पाल टाकली नव्हती. बाई म्हणाल्या ते खरंच 'ते त्याचं नशीब.' माझं नशीब मात्र चांगलं बलवत्तर होतं. कोणाला काही कळलं नव्हतं, जाणवलं नव्हतं! मी गबाळ्याच्या पाठीवर ती पाल टाकली हे कोणाला दिसलंच नव्हतं. ती पालही गर्दीत कुठे गेली ते कोणाला कळलं नसावं. मला हायसं वाटलं. दोन दिवस डोक्यात विचारांची गर्दी झाली होती ती पांगल्यासारखी वाटली. दोन दिवसांत पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. सारं कसं शांत शांत होतं. गबाळ्यापासून सुटका झाली होती. आता कोणतीही टोचणी नव्हती. बाईंनी माझ्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;"जा! आज तुझ्याबाजूला शैला बसेल. तुम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी आहात. तुला बरं वाटेल तेवढंच." मी गबाळ्याच्या शेजारी बसत होते म्हणून मला धक्का-बिक्का बसला असावा असं बाईंना वाटलं असावं. माझ्या चेहर्‍यावर उमटणारी स्मितरेषा मी दाबून धरली. आज सगळं शांत आहे. इतक्यात नको, हे आवडतं बुद्धासारखं स्मितही नको. सर्वांना वाटत असेल की मला धक्का बसला आहे तर तसंच असू दे, पथ्यावर पडलं. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;सावंतबाईंचा तास संपला तशी शैला मला म्हणाली, "वाईट झालं नै. बाळचं असं काही व्हायला नको होतं."&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;मी थोडीशी चुळबूळ केली आणि "हं" म्हणून गप्प बसले.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;"तुला नाही वाईट वाटलं?"&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;"वाईट काय वाटायचं? रोज हजारो लोक अपघातात मरतात. सर्वांचं वाईट वाटून घ्यायचं का?" मी तुसडेपणाने उत्तर दिलं. गबाळ्याचा विषय मला नको होता. माझ्यासाठी गबाळ्या आणि त्याचा विषय दोन्ही संपले होते आणि माझ्या मनातली भीतीही संपली होती. बिचकत, दचकत, टरकत राहायला मी काय गबाळ्या थोडीच होते? सर्वकाही ठीक होणार होतं, दोनचार दिवसांत वातावरण निवळणार होतं.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;साठ्येबाईंचा तास सुरु झाला. साठ्येबाईंच्या तासाला वर्गात तशीही शांतताच असे. आज तर अगदी सुतकी वातावरण होतं. सगळी पोरं कशी निमूट पुस्तकांत माना घालून बसली होती. साठ्येबाईही आज कधी नव्हे ते नरमाईने बोलत होत्या. माझं लक्ष सहजच भिंतीकडे गेलं....&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;शैला मला ढोसत होती, "काय झालं? आ वासून काय बघते आहेस खुळ्यासारखी? अगं तोंड बंद कर. किती बावळट दिसते आहेस...बाई बघतील." तिचा आवाज माझ्या कानाशी रेंगाळून परत जात होता. "बाई! ही बघा कसं करत्ये. इथे या ना बाई," शैला मला गदागदा हलवत होती. माझे डोळे भिंतीवर खिळले होते, त्यांत भीती मावत नव्हती. तिच्या हलवण्याचा, ओरडण्याचा माझ्यावर कसलाही परिणाम होत नव्हता. माझ्या सर्वांगाला कापरं भरलं होतं. अंग घामाने निथळत होतं. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;भिंतीच्या छताला गबाळ्या पालीसारखा चिकटला होता. त्याचे ते बटबटीत डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि जीभ मध्येच लपकन माझ्या दिशेने बाहेर येत होती.&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;****&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/21257775-3941867802724727503?l=priyambhashini.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://priyambhashini.blogspot.com/feeds/3941867802724727503/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=21257775&amp;postID=3941867802724727503' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/3941867802724727503'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/21257775/posts/default/3941867802724727503'/><link rel='alternate' type='text/html' href='http://priyambhashini.blogspot.com/2008/07/blog-post_11.html' title='गबाळ्या'/><author><name>Priyabhashini</name><uri>http://www.blogger.com/profile/15908593682517935910</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-21257775.post-4060288199342085784</id><published>2008-07-06T05:43:00.000-07:00</published><updated>2008-07-06T05:47:27.140-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='अनुभव'/><title type='text'>आम्ही जेव्हा पिंजर्‍यातील प्राणी बनतो!</title><content type='html'>प्रवासातील संकटे आणि आमचा घनिष्ठ संबंध कधीपासून सुरू झाला असावा याबाबत खात्रीलायक असं सांगता येत नाही पण तसा संबंध आहे हे निश्चित. वादळं तर आमच्या जणू पाचवीला पुजलेली. वाळूची वादळे, टोरनॅडो, गारपीट, ट्रॉपिकल स्टॉर्म, मुंबईतील २००५चा वादळी पाऊस सर्वकाही आमच्या प्रवासादरम्यान हमखास घडून यायलाच हवे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;उत्तर अमेरिकेत हिंडण्याफिरण्याचे महिने तीन. जून ते ऑगस्ट. या महिन्यांखेरिज फिरायचे झाले तर पार दक्षिणेला जावे लागते किंवा स्वेटर्स, हातमोजे, बूट यासर्वांचे जड ओझे बाळगत फिरावं लागतं. तर काही दिवसांपूर्वी यावर्षी फिरायला कुठे जायचे हे ठरवायला बसलो होतो -&lt;br /&gt;&lt;br /&gt;“न्यूयॉर्कला जाऊया.” इति नवरा.&lt;br /&gt;“हम्म चालेल,” इति कन्यका.&lt;br /&gt;आता दोघांचे एकमत झाले तर तिसर्‍याने पाय ओढावे असा आमच्या घरातील रिवाज असल्याने -“चालेल पण किती माणसं त्या शहरात? इतकी माणसं बघायची म्हणजे वैताग. गर्दी, गजबजाट, चांव-चांव, काव-काव. नको रे बाबा! "माझा नाराजीचा सूर. "इतकं लांब ड्रायविंग करून गर्दी बघायला काय जायचं? त्यापेक्षा जवळपास जाऊ. दरवर्षीचे गोंधळ गडबड, थीमपार्क्स, ऍट्रॅक्शन्स टाळून यावर्षी फक्त आराम करू. ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;मिडवेस्टात राहणारी माणसं माणूसघाणी असतात का असा प्रश्न एखाद्याला पडला असेल तर खरेखुरे उत्तर येथे मिळून जावे. खरंतर, माणसांपासून दूर जाऊन आराम करायचा झाला तर मिडवेस्टासारखी दुसरी जागा नाही पण पिकतं तिथे विकत नाही म्हणतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“मग कुठे जाणार? माणसंच नको असतील तर जंगलात जाऊन राहूया?" कन्यकेने फुरंगटून म्हटले.&lt;br /&gt;“ऍबसोल्युटली!! जंगलातच जाऊ.”&lt;br /&gt;“डन! जंगलातच जाऊया," नवर्‍यानेही आनंदाने म्हटले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जंगलात जाऊन राहणे म्हणजे एखाद्या नॅशनल पार्कात जाऊन तंबू ठोकणे पण तेवढे कष्टही आपण यावर्षी घ्यायचे नाहीत यावर शिक्कामोर्तब झाल्याने तो बेत बारगळला. शेवटी, ग्रेट स्मोकी माउंटन्सच्या परिसरात वुडन कॅबिनमध्ये राहायचे ठरवले. कामाच्या अतिव्यग्रतेमुळे दोघांकडूनही शेवटच्या क्षणापर्यंत बुकिंग करायचे या ना त्या कारणाने राहून गेले. आयत्यावेळेस बुकिंग करायचे झाले तर हवी तशी कॅबिन मिळेलच असे नाही पण सुदैवाने आम्हाला बर्‍यापैकी कॅबिन मिळून गेली. आणि हो, या सुट्टीच्या दिवसांत वादळांची शक्यता नाही याची वारंवार खात्री आम्ही करून घेतली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आठवड्याभराचे किराणा सामान, कपडे, फोल्डींग खुर्च्या, खेळ, डिव्हीडी, सीडीज आणि जे हाताला मिळेल ते सर्व पॅक करून आम्ही ४०० मैलाचा प्रवास करून एकदाचे गॅटलिनबर्ग परिसरात पोहोचलो. तिथून कॅबिनचा नकाशा घेऊन डोंगराच्या वाटेला लागलो. या डोंगरातल्या वुडन कॅबिनपर्यंत पोहोचायचे म्हणजे एक दिव्य असते. अरुंद आणि निमुळते घाटातील रस्ते, अचानक येणारे उतार आणि चढण, खोल दरी, रस्त्यांवर दिव्यांचा पत्ता नसणे, समोरून आपल्याला धडकायलाच येत आहे अशा आविर्भावात अचानक येणारी गाडी इ. पार करता करता आमच्या लक्षात आले की आमची कॅबिन डोंगराच्या माथ्यावरील शेवटची कॅबिन आहे. &lt;a title="DSC01891 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/2642098438/"&gt;&lt;img height="180" alt="DSC01891" src="http://farm4.static.flickr.com/3102/2642098438_e28f4b930e_m.jpg" width="240" align="right" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॅबिन मात्र अतिशय सुरेख होती. टापटिप, स्वच्छ, आरामशीर आणि उबदार. उबदार कारण स्मोकीच्या माथ्यावर भर उन्हाळ्यातही कुडकुडायला होते. कॅबिनमधून स्मोकीच्या शिखराचे अप्रतिम दर्शन होत होते तर डेकच्या खाली घळ दिसत होती. कॅबिनच्या मागून रानात उतरण्यासाठी वाट दिसत होती. स्थिरस्थावर झाल्यावर दोन गोष्टी आमच्या लक्षात आल्या. डेकवरच्या जकुझीचे कव्हर अडकून बसले होते आणि टिव्ही चालत नव्हता. एव्हाना संध्याकाळचे साडेसहा झाले असावेत. आम्ही ऑफिसात फोन करून आमची अडचण कळवली तशी रिसेप्शनिस्टने १५-२० मि. मेन्टेनन्सचा मनुष्य येऊन जाईल याची खात्री दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सांगितल्याप्रमाणे १५-२० मिनिटांत मेन्टेनन्सचा मनुष्य हजर झाला. त्याने हॉट टबचे झाकण काढून दिले आणि टिव्ही प्रोग्रॅम करून दिला. वर, आता आलोच आहे तर तुम्हाला बाकीचे सर्व कंट्रोल्स बघून घेतो आणि तुम्हालाही दाखवतो असं म्हणून त्याने सर्व काही व्यवस्थित करून दिले. निघताना त्याला काय वाटले कोणास ठाऊक पण तो थबकला आणि म्हणाला -&lt;br /&gt;&lt;br /&gt;“या कॅबिनपाशी हमखास अस्वले येतात. ही मागची बाजू पाहिलीत. सरळ रानात उतरते आणि उतरण्या-चढण्यासाठी चांगली वाट आहे. हा अस्वलांचा रस्ता. मागच्या वेळेस मी येथे आलो असता समोर अस्वल उभे होते. नशीबाने मी गाडीतूनच पाहिले आणि आत बसून राहिलो. तुम्ही सांभाळून असा, संध्याकाळी उन्हं उतरण्याच्या वेळेस अस्वलं इथे हमखास दिसल्याचे ऐकून आहे.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“अरे बापरे! मी ती वाट मगाशीच पाहिली होती. तिथून रानात एखादी चक्कर मारता येईल का काय असा विचार करत होते.” मी म्हटलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“नाही. ती सुरक्षित वाट नाही, तिच्या वाटेलाही जाऊ नका किंबहुना गाडीतून आणि कॅबिनमधून बाहेर पडताना आजूबाजूला एक नजर टाका. नशीबवान असाल तर अस्वल दिसेलही पण सांभाळून रहा.” असं म्हणून तो निघून गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“काय रे हा माणूस घाबरवून गेला. आता दबकतच बाहेर पडावं लागणार रोज.”&lt;br /&gt;“घाबरवून नाही पण सावध करून गेला. बरंच झालं की.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या रात्री आमच्या स्वागताला पर्जन्यराज नेहमीप्रमाणे हजर झाले. विजांच्या चकचकाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडला. भर जंगलात डोंगरमाथ्यावर रात्रीच्या काळोखात निसर्गाचे विलोभनीय रुद्र रूप आणि अधूनमधून येणारे प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज, घुत्कार आणि चित्कारांत ती रात्र सरली.&lt;br /&gt;दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही लॉरेल धबधब्याच्या ट्रेकसाठी जाणार होतो. यापूर्वी स्मोकी माऊंटनच्या भेटीत अवघड ट्रेक्स केले आहेत परंतु यावेळेस आराम करायचा असे ठरल्याने अडिच मैलांचा सोपा ट्रेक निवडला होता. बाहेर स्वच्छ उन पडले होते. सामान गाडीत ठेवायला नवरा पुढे गेला आणि मागाहून आम्ही दरवाजा बंद करून गाडीत बसलो. गाडी सुरू करता करता तो म्हणाला "मी आता गाडीपाशी आलो तेव्हा बाहेर काहीतरी आवाज आल्यासारखा वाटला. मागे वळून पाहिलं तर झाडापाशी एक मांजर उभं होतं.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“हुश्श! मांजरच ना.” मी निश्वास टाकून म्हटलं.&lt;br /&gt;“हाऊसक्याट की बॉबक्याट? म्हणजे हाऊसक्याट जंगलात काय करत होती?” पोरीने अक्कल पाजळली.&lt;br /&gt;“काळी मांजरी होती म्हणजे बहुधा हाऊसक्याटच.” नवर्‍याने शंकानिरसन केले आणि गाडी सुरू केली.&lt;br /&gt;लॉरेल धबधब्याचा ट्रेक सुरू करण्याच्या ठिकाणी एक मोठा फलक लावला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt;या भागात अस्वलांनी माणसांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. एखादे अस्वल समोर आले तर त्याला पाठ दाखवून पळू नका. अस्वल जर पाय आपटत तुमच्या दिशेने येऊ लागले तर धोका आहे असे समजून अस्वलाच्या डोळ्यांत बघत एक एक पाऊल मागे सरका. छाव्यांसह फिरणार्‍या अस्वलांच्या माद्या या धोकादायक असून त्या माणसांवर हल्ले करण्याची शक्यता अधिक असते.&lt;/div&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt; &lt;/div&gt;&lt;div style="TEXT-ALIGN: center"&gt; &lt;/div&gt;&lt;/strong&gt;&lt;a title="DSC00669 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/2641271309/"&gt;&lt;img height="240" alt="DSC00669" src="http://farm4.static.flickr.com/3063/2641271309_31776506c9_m.jpg" width="180" align="right" /&gt;&lt;/a&gt;लॉरेल धबधब्याचा ट्रेक करून आम्ही दुपारी दोन वाजता डोंगर उतरायला सुरूवात केली. एके ठिकाणी ५० एक माणसे जमून खाली वाकून बघत होती. “अस्वल असणार.” मी कुजबुजले.“अस्वलच आहे. तीन छावे आणि त्यांची आई आहे.” ८-१० वर्षांचा एक चुणचुणीत मुलगा खाली वाकून पाहता पाहता म्हणाला.“दाखव कुठे आहे?” आम्ही त्याला म्हटले तशी त्याने आम्हाला अस्वलं दाखवली. आमच्यापासून सुमारे १०० फुटांवर खाली दरीत अस्वलाची मादी आणि तीन छावे मजेत फिरत होती. त्यांना क्यामेरात बंद करायची वरच्या सर्वांची धांदल सुरू होती परंतु त्या घनदाट वृक्षांच्या छायेत मुक्त बागडणार्‍या छाव्यांना कॅमेरात बंद करणे अतिशय जिकिरीचे होते.सगळे दाबतात म्हणून आम्हीही उगीच आमच्या क्यामेराची बटणे खटाखट दाबून टाकली आणि तिथून काढता पाय घेतला. कॅमेरात काहीही टिपता आलेले नाही हे नक्की होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तिथून स्मोकीच्या परिसरात फिरत, केड्स कोव्हची गाडीतून सफर करत संध्याकाळी ६च्या सुमारास आम्ही गॅटलिनबर्ग परिसरात परत आलो. रात्रीच्या जेवणाची सोय पहायची होती. जेवण प्याक करून कॅबिनमध्ये जावं असं ठरवून समोरच ऍपल बीज रेस्टॉरंट दिसलं म्हणून तिथून जेवण घेऊन आम्ही कॅबिनच्या वाटेला लागलो. सकाळपासून जंगलात सटर फटर खाल्लं होतं पण व्यवस्थित जेवण पोटात न गेल्याने सर्वांना भूक लागली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सातच्या सुमारास कॅबिनपाशी पोहोचलो तर उन्हं उतरली होती. उंचच उंच झाडांच्या सावल्याही उन्हासोबत जमिनीवर अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. मध्येच एखादी उन्हाची तिरिप अद्याप सूर्यास्त न झाल्याची जाणीव करून देत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“आधी आत जावून जेवूया. नंतर गाडीतलं सामान, कॅमेरे इ. बाहेर काढतो.” “ठीक आहे" असं म्हणून आम्ही दोघी डेकच्या वाटेला लागलो. दरवाजा उघडत असताना मागून नवरा धावतच आला आणि म्हणाला "लवकर आत चला. मागे रानात काहीतरी आहे. खसफस ऐकू येत होती.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ते सकाळचं मांजर असेल" मी दरवाजा बंद करता करता म्हटलं आणि लिविंग रूमच्या दुसर्‍या टोकाकडून "डॅडी...इथे बघ बेअर" अशी पोरीची हाक ऐकू आली.&lt;a title="DSC00681 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/2641268779/"&gt;&lt;img height="180" alt="DSC00681" src="http://farm4.static.flickr.com/3107/2641268779_f7489bd158_m.jpg" width="240" align="left" /&gt;&lt;/a&gt;रानाच्या त्या वाटेवरून अस्वलाची मादी आणि तीने छावे आरामात ड्राईव्ह वे वर अवतीर्ण झाले होते. “अरेच्चा! खरंच अस्वल होतं तर. बरं झालं आपण आत पोहोचलो. थोडक्यात चुकामुक झाली वाटतंय.” मी आश्चर्याने म्हटलं.“माझी गाडी.... ही अस्वलं खरवडून तर नाही ना ठेवणार?” ह्याच्या डोक्यात तिसरेच विचार सुरू होते.“अरे ते सकाळी तुला काळं मांजर दिसलं...ते या अस्वलाच्या छाव्या एवढंच होतं का रे?”&lt;br /&gt;अस्वलाच्या मादीने संपूर्ण ड्राईव वे फिरून घेतला. छावेही मस्त बागडत होते. सुदैवाने &lt;span style="color:#999999;"&gt;(नवर्‍याच्या) &lt;/span&gt;आमच्या गाडीत त्यांना काडीचाही इंटरेश्ट नव्हता. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून अस्वलाच्या मादीने चक्क बसकण मारली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a title="DSC00687 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/2641270047/"&gt;&lt;img height="180" alt="DSC00687" src="http://farm4.static.flickr.com/3101/2641270047_866113071f_m.jpg" width="240" align="left" /&gt;&lt;/a&gt;“आता हे रात्रभर इथेच राहिले म्हणजे?” काचेला नाक लावत कन्येने विचारलं.&lt;br /&gt;“काही इथे रात्रभर राहात नाहीत. जंगली प्राणी असे एका जागेवर बसून राहात नाहीत.”&lt;br /&gt;“पण राहिले तर?”&lt;br /&gt;“तर आपण ९११ डायल करू.”&lt;br /&gt;“ह्य॒! ९११ माणसांसाठी असतं, प्राण्यांसाठी नाही काय?”&lt;br /&gt;“बरं बरं! उद्या सकाळचं उद्या सकाळी बघू. कॅमेरा गाडीत राहिला. निदान यांचे फोटो तरी काढता आले असते.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“माझ्याकडे आहेना माझा कॅमेरा. आता काही नाहीतर तोच वापरू,” लेकीने आपल्या कमरेचा कॅमेरा काढून दिला. गेल्यावर्षी तिला एक वापरायला सोपा डिजिटल कॅमेरा घेऊन दिला होता. &lt;a title="DSC00682 by priya_v_p4, on Flickr" href="http://www.flickr.com/photos/96942875@N00/2642096188/"&gt;&lt;img height="180" alt="DSC00682" src="http://farm4.static.flickr.com/3274/2642096188_67139328f4_m.jpg" width="240" align="right" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अस्वलाचे छावे दंगामस्ती करून दमले होते. त्यांच्याही भुकेची वेळ झाली असावी. त्यांनी आईला लुचायला सुरूवात केली. आईही त्यांना प्रेमाने चाटत होती. जंगली प्राण्यांचे असे दृश्य या आधी प्रत्यक्ष डोळ्यांनी कधी बघायला मिळाले नव्हते पण जंगली असो का पाळीव, प्राणी असो का मनुष्य- आईही आईच असते याची जाणीव त्या दृष्यातून होत होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;“मी डेकवर जाऊन फोटो काढतो,” असं म्हणून नवरा हळूच बाहेर सटकला आणि क्षणार्धात परत आला. “तुम्हा दोघींना बाहेर येऊन बघायचे असेल तर आताच या, त्यांचं इतरत्र लक्ष नाही.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्हीही दबकत बाहेर गेलो. अस्वलं आता अगदी जवळून दिसत होती. त्यांना आमच्या अस्तित्वाची कल्पनाही नव्हती. तेवढ्यात&lt;br /&gt;“डॅडी बस हो गया। अब अंदर जायेंगे" आमच्या छाव्याला अद्याप कुठे मोठ्याने बोलावं आणि कुठे कुजबुजावं त्याची अक्कल आलेली नाही पण तो आवाज अस्वलाच्या मादीपर्यंत सहज पोहोचला आणि ती ताडकन उभी राहिली आणि आम्ही पुन्हा आत धूम ठोकली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता काय होणार याची कल्पना करत होतो पण त्या आईला पोरांची भूक महत्वाची असावी. तिने पुन्हा बसकण मारली आणि स्तनपानाला सुरूवात झाली. तिला माणसांची भीती नव्हती की या माणसांना आपण पिंजर्‍यात बंद केलं आहे याची ख
